शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

टीजेएसबीमध्ये जमा झाले शिक्षकांचे पगार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 22:32 IST

ठाणे, दि. 30 - एकीकडे ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शिक्षकांचे पगार आपल्याच बँकेतून होण्याची परंपरा कायम ठेवण्यासाठी राज्य शासनाला साकडे घातले असतानाच आता ठाणे जनता सहकारी बँकेत (टीजेएसबी) शिक्षकांचे पगार १ तारखेपूर्वीच जमा झाले असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे न्यायालयाने जरी कोणत्या बँकेत शिक्षकांनी खाती उघडावीत याची सक्ती नसावी, ...

ठाणे, दि. 30 - एकीकडे ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शिक्षकांचे पगार आपल्याच बँकेतून होण्याची परंपरा कायम ठेवण्यासाठी राज्य शासनाला साकडे घातले असतानाच आता ठाणे जनता सहकारी बँकेत (टीजेएसबी) शिक्षकांचे पगार १ तारखेपूर्वीच जमा झाले असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे न्यायालयाने जरी कोणत्या बँकेत शिक्षकांनी खाती उघडावीत याची सक्ती नसावी, असा आदेश दिला असला तरी टीजेएसबीतून पगार होण्यासाठी राज्य शासनाकडून चाललेला आटापिटा पाहता शिक्षक मात्र अजूनही संभ्रमात आहेत.गेल्या ४० वर्षांपासून ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (टीडीसी) बँकेत जिल्ह्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचा-यांचे पगार विनाअडथळा होत आहेत. या वेतपापोटी थकीत असलेले सुमारे पाच कोटींचे कमिशनही बँकेने काही वर्षांपूर्वीच माफ केले आहे. गेल्या १२ वर्षांपासून कोणत्याही मोबदल्याविना सुमारे २० हजार शिक्षकांचे ७० कोटींचे पगार या बँकेतूनच होत आहेत. आता अचानक राज्य शासनाच्या परिपत्रकामुळे शिक्षकांना टीजेएसबीमध्ये खाती उघडण्यास भाग पाडून तिकडे वेतन करणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे १४ हजार ५०० शिक्षकांनी टीजेएसबी बॅकेत खाती उघडली. त्यामुळे आता ज्या शाळांनी टीजेएसबीच्या नावे पगाराचे विवरण पत्र (पे बिल) शासनाकडे सुपूर्द केले होेते, त्यांचे धनादेश शासनाकडून मिळाल्यावर अवघ्या २४ तासांमध्ये त्या शाळांमधील सर्व शिक्षकांच्या टीजेएसबीच्या खात्यात पगार जमा केल्याचा दावा टीजेएसबीचे व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील साठे यांनी केला आहे. तसेच वेतन खात्यात जमा होण्यापूर्वीच शिक्षकांना त्यांचे एटीएम कार्ड आणि चेकबुकही व्यक्तिश: देण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे.दरम्यान, टीजेएसबी बँकेत जरी १४ हजार ५०० शिक्षकांनी खाती उघडली असली तरी त्यांच्यासह २० हजार शिक्षकांची खाती ही टीडीसी मध्येच आहेत. शिवाय, त्यांच्यावर सक्ती करण्यात येऊ नये असे मुंबई उच्च न्यायालयानेच स्पष्ट केले आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील शिक्षकांचे वेतन येत्या काही दिवसांमध्ये टीडीसी बँकेतच पूर्वीप्रमाणे होईल, असा दावा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भगिरीथ भोईर यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.