शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
2
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
3
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
4
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
5
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका
6
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
7
भारताला लाल डोळे दाखवणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था कोलमडली? लोकं पैसे खर्च करायलाच तयार नाही
8
Viral Video : 'ओ काका ही ट्रेन किती अ‍ॅवरेज देते?'; तरुणाच्या प्रश्नावर लोकोपायलटने दिले भन्नाट उत्तर! म्हणाले... 
9
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
10
गर्भवतीची प्रसुती होत असताना प्रसुतीगृहातच एकमेकींशी भिडल्या इंटर्न डॉक्टर, त्यानंतर...  
11
सुपर मॉम! २६ दिवसांच्या लेकीला कुशीत घेऊन दिला इंटरव्ह्यू; आता झाली DSP, पतीने दिली साथ
12
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
13
ओप्पोचा मोठा धमाका! जबरदस्त फीचर्ससह ३ फोन केले लॉन्च; जाणून घ्या किंमत
14
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
15
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
16
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
17
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
18
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
19
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
20
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...

मर्जीतील नावांसाठी स्थायीची सभा तहकूब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 01:20 IST

आठ नव्या सदस्यांची निवड करण्यासाठी गुरुवारी आचार्य अत्रे रंगमंदिरात आयोजित सभा मर्जीतील सदस्यांची नावे न आल्याने तहकूब करण्यात आली आहे.

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या स्थायी समितीतील आठ सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांच्या जागी अन्य आठ नव्या सदस्यांची निवड करण्यासाठी गुरुवारी आचार्य अत्रे रंगमंदिरात आयोजित सभा मर्जीतील सदस्यांची नावे न आल्याने तहकूब करण्यात आली आहे. ही सभा महापालिकेच्या कोणत्या अधिनियमानुसार रद्द केली, असा सवाल शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक व स्थायी समिती सदस्य वामन म्हात्रे यांनी केला आहे.महापालिकेच्या सदस्यांची मुदत एका वर्षाने संपुष्टात येणार आहे. त्यामुळे जानेवारीत स्थायी समिती सभापतीपदासाठी निवडणूक होणार आहे. विद्यमान सभापती दीपेश म्हात्रे यांचा कालावधी ३ जानेवारीला संपुष्टात येत आहे. त्याआधी निवृत्त झालेल्या आठ सदस्यांच्या जागी नव्या सदस्यांची निवड करण्यासाठी गुरुवारी अत्रे रंगमंदिरात सभा आयोजित केली होती. मात्र, ही सभा गणसंख्येअभावी तहकूब करण्यात आली.दरम्यान, सध्या पत्रीपुलावरील वाहतूक सुरळीत असली तरी, येथील वाहतूककोंडीत सदस्य अडकून पडल्याने ते वेळेवर पोहोचू शकले नाही. त्यामुळे गणसंख्येची पूर्ती होऊ शकली नाही, असेही कारण सांगितले गेले. मनसे आणि भाजपने आपल्या सदस्यांची नावे सुचविली होती. मात्र, सभा गणसंख्येअभावी तहकूब केली गेली. त्यावर म्हात्रे यांनी आक्षेप घेतला आहे. सचिवांनी कोणत्या अधिनियमाखाली ही सभा तहकूब केली, असा प्रश्न केला आहे. निवड अर्थात निवडणूकच असते. मात्र, त्यासाठी बोलावलेली सभा गणसंख्येअभावी रद्द करता येत नाही. तेथे मतदानाची प्रक्रिया नसून प्रत्येक पक्षाच्या गटनेत्याकडून सदस्यांच्या सुचविलेल्या नावाचा बंद लिफाफा महापौरांना सुपूर्द केला जातो. महासभेत तो उघडला जाऊन नावाची घोषणा महापौर करतात. त्यामुळे त्याला गणसंख्येची गरज भासत नाही, याकडे म्हात्रे यांनी लक्ष वेधले आहे. विशेष म्हणजे, गणसंख्येचे कारण हे दुय्यम असून, सभा तहकूब करून मर्जीतील सदस्यांच्या नावासाठी प्रशासनानेच संधी दिल्याचा आरोप म्हात्रे यांनी केला. मात्र गणसंख्येअभावी सभा तहकूूब करता येते, उपसचिव किशोर शेळके यांनी सांगितले.>१शेवटचे वर्ष राहिल्याने स्थायी समिती सदस्यपदाची संधी मिळावी, यासाठी प्रत्येक पक्षात चुरस आहे. स्थायीत प्रवेश झाल्यावर सभापतीपदाचा दावाही केला जाऊ शकतो. परंतु, स्थायी समिती सदस्यपदाचा निर्णय हा पक्षाचे श्रेष्ठी घेताहेत.२शिवसेनेचा निर्णय ठाणे जिल्ह्याचे नेते एकनाथ शिंदे यांच्या हाती असतो. त्यांच्याकडून बंद लिफाफ्यात सदस्याचे नाव आल्यानंतर तो लिफाफा सभागृह नेत्याच्या आदेशानुसार महापौरांकडे सपूर्द केला जातो.३ शिवसेनेकडून इच्छुकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे नेमके कोणाचे नाव द्यायचे, यावर एकमत होऊ शकले नाही. शिंदे हे राज्याच्या सत्ता समीकरणात व्यस्त असल्याने त्यांच्याकडून स्थायी समिती सदस्यांचा निर्णय घेतला गेला नसावा, असे सांगण्यात येत आहे.