शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

सवरांचा डम्पर पैसा हानाया जाय!

By admin | Updated: July 28, 2016 03:38 IST

टोपलीत पापड्या कडाडविल्या, पालकमंत्र्यांच्या तडाडविल्या, कसाट्याची पाटी लवत जाय, विष्णू सवरांचा डम्पर पैसा हानाया जाय, वनगाचा डम्पर खाली कराया जाय

भिवंडी : टोपलीत पापड्या कडाडविल्या, पालकमंत्र्यांच्या तडाडविल्या, कसाट्याची पाटी लवत जाय, विष्णू सवरांचा डम्पर पैसा हानाया जाय, वनगाचा डम्पर खाली कराया जाय, पालघरला खाली कराया जाय...अशा खास आदिवासी गाण्यांची बरसात भिवंडीत झाली. स्वतंत्र ग्रामपंचायतीच्या मागणीसाठी विक्रमगडहून विधानभवनावर निघालेल्या आदिवासीबांधवांनी भिवंडीतील गाजेंगी हॉलमध्ये मंगळवारी रात्री ठेका धरला.आदिवासीबांधव दिवसभर काम केल्यानंतर शीण घालवण्यासाठी आपल्या वस्तीत गाणी म्हणतात. मात्र, येथे त्यांना वाजवण्याकरिता ढोल नसल्याने चक्क प्लास्टिकच्या बादलीवर ठेका धरला.आदिवासीबांधवांच्या विकासासाठी सरकारने ठाणे जिल्ह्यातील आदिवासी तालुक्यांचा समावेश करत पालघर जिल्हा वेगळा केला. तर, जव्हार तालुक्याच्या विकासासाठी विक्रमगड ग्रामपंचायत वेगळी केली. मात्र, यानंतरही परिसरातील आदिवासींचा विकास झाला का, हा प्रश्न आदिवासी नागरिकांना भेडसावत आहे.आदिवासी ग्रामपंचायतीचा दर्जा असलेल्या विक्रमगड ग्रामपंचायतीला चिमूटभर बिगर आदिवासींच्या मागणीनुसार सरकारने विक्रमगड नगरपंचायत म्हणून जाहीर केले. या नगरपंचायतीचे आर्थिक पडसाद सोसावे लागू नये तसेच सरकारी योजनेपासून वंचित राहू नये म्हणून विक्रमगड ग्रुपग्रामपंचायतीतील यशवंतनगर व वाकडूपाडा या गावपाड्यांतील आदिवासीबांधवांनी विरोध केला. यशवंतनगर या गावात नऊ तर वाकडूपाड्यामध्ये सात पाडे आहेत. या दोन्ही गावपाड्यांचा नगरपंचायतीत समावेश करू नये, म्हणून वाकडूपाडा कृती समिती व यशवंतनगर स्वतंत्र ग्रामपंचायत कृती समिती स्थापन केली. स्वतंत्र ग्रामपंचायतीच्या मागणीसाठी विक्रमगड ते विधानभवन असा लाँगमार्च रविवारपासून सुरू केला. या लाँगमार्चमध्ये लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सहभागी झाले. हे आदिवासी शहरातील गाजेंगी हॉलमध्ये रात्रभर थांबून त्यांनी बुधवारी सकाळी नारपोलीमार्गे ठाणे-मुंबईच्या दिशेने निघाले. (प्रतिनिधी)अंथरण्यासाठी प्लास्टिकचा वापरआदिवासीबांधवांनी पावसापासून बचावासाठी अंगावर घेतलेले प्लास्टिक कापड जमिनीवर अंथरले आणि त्यावर ते झोपले होते.पालखीत संविधानाची प्रतआंदोलनकारी आदिवासींनी न्याय मागण्यासाठी पालखीत संविधानाची प्रत ठेवून कायद्याची पालखी वाहिली.आजही संघर्ष सुरूच वयोवृद्ध शंकर भोये यांनी भूमिपुत्रांना ग्राम पंचायतीसाठी आजही संघर्ष करावा लागत आहे, असे सांगत खंत व्यक्त केली.सवरांना निवेदन देऊनही फायदा नाहीवाकडूपाडा व यशवंतनगर या दोन्ही गावांच्या स्वतंत्र ग्रामपंचायती करण्याच्या निमित्ताने पालकमंत्री विष्णू सवरा यांना निवेदने देऊनही त्याची दखल त्यांनी घेतली नाही,असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.आंदोलनात एमबीए झालेली तरुणीया आंदोलनात एमबीए झालेली आदिवासी तरुणी दीपाली श्रीधर पऱ्हाडे हिने आपला लढा आदिवासीबांधवांकरिता असल्याचे सांगितले. त्यासाठी जिद्दीने प्रयत्न करणार असल्याचे ती म्हणाली.