शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
4
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
5
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
6
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
7
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
8
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
9
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
10
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
11
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
12
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
13
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
14
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
15
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
16
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
17
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
18
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
19
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
20
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
Daily Top 2Weekly Top 5

सवरांचा डम्पर पैसा हानाया जाय!

By admin | Updated: July 28, 2016 03:38 IST

टोपलीत पापड्या कडाडविल्या, पालकमंत्र्यांच्या तडाडविल्या, कसाट्याची पाटी लवत जाय, विष्णू सवरांचा डम्पर पैसा हानाया जाय, वनगाचा डम्पर खाली कराया जाय

भिवंडी : टोपलीत पापड्या कडाडविल्या, पालकमंत्र्यांच्या तडाडविल्या, कसाट्याची पाटी लवत जाय, विष्णू सवरांचा डम्पर पैसा हानाया जाय, वनगाचा डम्पर खाली कराया जाय, पालघरला खाली कराया जाय...अशा खास आदिवासी गाण्यांची बरसात भिवंडीत झाली. स्वतंत्र ग्रामपंचायतीच्या मागणीसाठी विक्रमगडहून विधानभवनावर निघालेल्या आदिवासीबांधवांनी भिवंडीतील गाजेंगी हॉलमध्ये मंगळवारी रात्री ठेका धरला.आदिवासीबांधव दिवसभर काम केल्यानंतर शीण घालवण्यासाठी आपल्या वस्तीत गाणी म्हणतात. मात्र, येथे त्यांना वाजवण्याकरिता ढोल नसल्याने चक्क प्लास्टिकच्या बादलीवर ठेका धरला.आदिवासीबांधवांच्या विकासासाठी सरकारने ठाणे जिल्ह्यातील आदिवासी तालुक्यांचा समावेश करत पालघर जिल्हा वेगळा केला. तर, जव्हार तालुक्याच्या विकासासाठी विक्रमगड ग्रामपंचायत वेगळी केली. मात्र, यानंतरही परिसरातील आदिवासींचा विकास झाला का, हा प्रश्न आदिवासी नागरिकांना भेडसावत आहे.आदिवासी ग्रामपंचायतीचा दर्जा असलेल्या विक्रमगड ग्रामपंचायतीला चिमूटभर बिगर आदिवासींच्या मागणीनुसार सरकारने विक्रमगड नगरपंचायत म्हणून जाहीर केले. या नगरपंचायतीचे आर्थिक पडसाद सोसावे लागू नये तसेच सरकारी योजनेपासून वंचित राहू नये म्हणून विक्रमगड ग्रुपग्रामपंचायतीतील यशवंतनगर व वाकडूपाडा या गावपाड्यांतील आदिवासीबांधवांनी विरोध केला. यशवंतनगर या गावात नऊ तर वाकडूपाड्यामध्ये सात पाडे आहेत. या दोन्ही गावपाड्यांचा नगरपंचायतीत समावेश करू नये, म्हणून वाकडूपाडा कृती समिती व यशवंतनगर स्वतंत्र ग्रामपंचायत कृती समिती स्थापन केली. स्वतंत्र ग्रामपंचायतीच्या मागणीसाठी विक्रमगड ते विधानभवन असा लाँगमार्च रविवारपासून सुरू केला. या लाँगमार्चमध्ये लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सहभागी झाले. हे आदिवासी शहरातील गाजेंगी हॉलमध्ये रात्रभर थांबून त्यांनी बुधवारी सकाळी नारपोलीमार्गे ठाणे-मुंबईच्या दिशेने निघाले. (प्रतिनिधी)अंथरण्यासाठी प्लास्टिकचा वापरआदिवासीबांधवांनी पावसापासून बचावासाठी अंगावर घेतलेले प्लास्टिक कापड जमिनीवर अंथरले आणि त्यावर ते झोपले होते.पालखीत संविधानाची प्रतआंदोलनकारी आदिवासींनी न्याय मागण्यासाठी पालखीत संविधानाची प्रत ठेवून कायद्याची पालखी वाहिली.आजही संघर्ष सुरूच वयोवृद्ध शंकर भोये यांनी भूमिपुत्रांना ग्राम पंचायतीसाठी आजही संघर्ष करावा लागत आहे, असे सांगत खंत व्यक्त केली.सवरांना निवेदन देऊनही फायदा नाहीवाकडूपाडा व यशवंतनगर या दोन्ही गावांच्या स्वतंत्र ग्रामपंचायती करण्याच्या निमित्ताने पालकमंत्री विष्णू सवरा यांना निवेदने देऊनही त्याची दखल त्यांनी घेतली नाही,असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.आंदोलनात एमबीए झालेली तरुणीया आंदोलनात एमबीए झालेली आदिवासी तरुणी दीपाली श्रीधर पऱ्हाडे हिने आपला लढा आदिवासीबांधवांकरिता असल्याचे सांगितले. त्यासाठी जिद्दीने प्रयत्न करणार असल्याचे ती म्हणाली.