शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! ३७ जणांना अटक
2
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
3
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
4
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
5
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
6
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
7
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
8
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
9
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
10
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
11
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
12
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
13
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
14
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
15
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
16
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
17
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
18
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
19
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
20
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...

सवरांचा डम्पर पैसा हानाया जाय!

By admin | Updated: July 28, 2016 03:38 IST

टोपलीत पापड्या कडाडविल्या, पालकमंत्र्यांच्या तडाडविल्या, कसाट्याची पाटी लवत जाय, विष्णू सवरांचा डम्पर पैसा हानाया जाय, वनगाचा डम्पर खाली कराया जाय

भिवंडी : टोपलीत पापड्या कडाडविल्या, पालकमंत्र्यांच्या तडाडविल्या, कसाट्याची पाटी लवत जाय, विष्णू सवरांचा डम्पर पैसा हानाया जाय, वनगाचा डम्पर खाली कराया जाय, पालघरला खाली कराया जाय...अशा खास आदिवासी गाण्यांची बरसात भिवंडीत झाली. स्वतंत्र ग्रामपंचायतीच्या मागणीसाठी विक्रमगडहून विधानभवनावर निघालेल्या आदिवासीबांधवांनी भिवंडीतील गाजेंगी हॉलमध्ये मंगळवारी रात्री ठेका धरला.आदिवासीबांधव दिवसभर काम केल्यानंतर शीण घालवण्यासाठी आपल्या वस्तीत गाणी म्हणतात. मात्र, येथे त्यांना वाजवण्याकरिता ढोल नसल्याने चक्क प्लास्टिकच्या बादलीवर ठेका धरला.आदिवासीबांधवांच्या विकासासाठी सरकारने ठाणे जिल्ह्यातील आदिवासी तालुक्यांचा समावेश करत पालघर जिल्हा वेगळा केला. तर, जव्हार तालुक्याच्या विकासासाठी विक्रमगड ग्रामपंचायत वेगळी केली. मात्र, यानंतरही परिसरातील आदिवासींचा विकास झाला का, हा प्रश्न आदिवासी नागरिकांना भेडसावत आहे.आदिवासी ग्रामपंचायतीचा दर्जा असलेल्या विक्रमगड ग्रामपंचायतीला चिमूटभर बिगर आदिवासींच्या मागणीनुसार सरकारने विक्रमगड नगरपंचायत म्हणून जाहीर केले. या नगरपंचायतीचे आर्थिक पडसाद सोसावे लागू नये तसेच सरकारी योजनेपासून वंचित राहू नये म्हणून विक्रमगड ग्रुपग्रामपंचायतीतील यशवंतनगर व वाकडूपाडा या गावपाड्यांतील आदिवासीबांधवांनी विरोध केला. यशवंतनगर या गावात नऊ तर वाकडूपाड्यामध्ये सात पाडे आहेत. या दोन्ही गावपाड्यांचा नगरपंचायतीत समावेश करू नये, म्हणून वाकडूपाडा कृती समिती व यशवंतनगर स्वतंत्र ग्रामपंचायत कृती समिती स्थापन केली. स्वतंत्र ग्रामपंचायतीच्या मागणीसाठी विक्रमगड ते विधानभवन असा लाँगमार्च रविवारपासून सुरू केला. या लाँगमार्चमध्ये लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सहभागी झाले. हे आदिवासी शहरातील गाजेंगी हॉलमध्ये रात्रभर थांबून त्यांनी बुधवारी सकाळी नारपोलीमार्गे ठाणे-मुंबईच्या दिशेने निघाले. (प्रतिनिधी)अंथरण्यासाठी प्लास्टिकचा वापरआदिवासीबांधवांनी पावसापासून बचावासाठी अंगावर घेतलेले प्लास्टिक कापड जमिनीवर अंथरले आणि त्यावर ते झोपले होते.पालखीत संविधानाची प्रतआंदोलनकारी आदिवासींनी न्याय मागण्यासाठी पालखीत संविधानाची प्रत ठेवून कायद्याची पालखी वाहिली.आजही संघर्ष सुरूच वयोवृद्ध शंकर भोये यांनी भूमिपुत्रांना ग्राम पंचायतीसाठी आजही संघर्ष करावा लागत आहे, असे सांगत खंत व्यक्त केली.सवरांना निवेदन देऊनही फायदा नाहीवाकडूपाडा व यशवंतनगर या दोन्ही गावांच्या स्वतंत्र ग्रामपंचायती करण्याच्या निमित्ताने पालकमंत्री विष्णू सवरा यांना निवेदने देऊनही त्याची दखल त्यांनी घेतली नाही,असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.आंदोलनात एमबीए झालेली तरुणीया आंदोलनात एमबीए झालेली आदिवासी तरुणी दीपाली श्रीधर पऱ्हाडे हिने आपला लढा आदिवासीबांधवांकरिता असल्याचे सांगितले. त्यासाठी जिद्दीने प्रयत्न करणार असल्याचे ती म्हणाली.