शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

स्वामी विवेकानंद यांच्या विचाराने विश्व बंधुत्वाचा मार्ग प्रशस्त - मकरंद मुळे

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: September 11, 2023 16:45 IST

विवेकानंद केंद्र कन्याकुमारीच्या ठाणे शाखेतर्फे विश्व बंधुत्वाच्या पूर्वसंध्येला विश्वबंधुत्व काळाची गरज यावर मकरंद मुळे यांचे भाषण आयोजित करण्यात आले होते.

ठाणे : स्वामी विवेकानंद यांनी अमेरिकेत शिकागो येथे धर्मसभेत केलेल्या भाषणाने समृद्ध हिंदू विचारांचे दर्शन जगाला घडले होते. जगण्याचा आधार ठरणाऱ्या भारतीय तत्वज्ञानाचे महत्व जागतिक स्तरावर मान्य झाले होते. बंधुभावाच्या, निरपेक्ष स्नेहाच्या आधारे मानवी जीवन विकसित होऊ शकते याचा जागतिक समुदायात विश्वास जागला होता असे प्रतिपादन राजकीय-सामाजिक विश्लेषक मकरंद मुळे यांनी केले. 

विवेकानंद केंद्र कन्याकुमारीच्या ठाणे शाखेतर्फे विश्व बंधुत्वाच्या पूर्वसंध्येला विश्वबंधुत्व काळाची गरज यावर मकरंद मुळे यांचे भाषण आयोजित करण्यात आले होते. ठाणे नौपाडा येथील मराठी ग्रंथ संग्रहालय सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात व्यासपीठावर विवेकानंद केंद्र कोकण प्रांत प्रमुख दीपक नामजोशी होते. 

शिकागो येथील जागतिक धर्मसभेत ११ सप्टेंबर १८९३ रोजी स्वामी विवेकानंद यांचे ऐतिहासिक भाषण झाले होते. भाषणाच्या सुरवातीचे दोन शब्दांनी स्वामी विवेकानंद यांनी जगाचा मानवी नाते संबंधांकडे बघण्याच्या दृष्टीकोनात मूलभूत बदल घडवला होता. त्या सर्वस्वी वेगळ्या भाषणाचे स्मरण म्हणून दरवर्षी ११ सप्टेंबर विश्व बंधुत्व दिन म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्त मकरंद मुळे बोलत होते. ते म्हणाले, सद्य स्थितीत स्वामी विवेकानंद यांचे विचार जगाला तारू शकतील. स्वामी विवेकानंद यांनी दिलेला संदेश आधार ठरेल.

नुकतीच आपल्या देशात यशस्वी झालेली जी-वीस परिषद हे स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचे प्रकटीकरण आहे. १८९३ ची शिकागो सर्वधर्म सभा ते २०२३ भारतातील जी-ट्वेन्टी परिषद हा प्रवास हे हिंदू विचार सामर्थ्याचे विशाल दर्शन आहे. स्वामी विवेकानंद यांनी विदेशात उच्चारलेले बंधू-भगिनी हे दोन शब्द आणि जी-वीस जागतिक परिषदेसाठी वापरलेले वसुधैव कुटुंबकम् हे दोन शब्द भारतीय तत्वज्ञान आहे. असे आपल्या भाषणाच्या शेवटी मुळे यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणे