शहरं
Join us  
Trending Stories
1
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
2
मोठा गाजावाजा करत मुंबईकडे कूच करणार त्याआधीच वैभव खेडेकरांचा भाजपा पक्षप्रवेश स्थगित; कारण काय?
3
नाशिक मंडळ : अल्प उत्पन्न गटासाठी म्हाडाची ४७८ घरे
4
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
5
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
7
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
8
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
9
शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
10
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
11
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
12
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
13
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
14
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
15
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
16
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
17
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
18
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
19
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
20
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?

स्वामी विवेकानंद यांच्या विचाराने विश्व बंधुत्वाचा मार्ग प्रशस्त - मकरंद मुळे

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: September 11, 2023 16:45 IST

विवेकानंद केंद्र कन्याकुमारीच्या ठाणे शाखेतर्फे विश्व बंधुत्वाच्या पूर्वसंध्येला विश्वबंधुत्व काळाची गरज यावर मकरंद मुळे यांचे भाषण आयोजित करण्यात आले होते.

ठाणे : स्वामी विवेकानंद यांनी अमेरिकेत शिकागो येथे धर्मसभेत केलेल्या भाषणाने समृद्ध हिंदू विचारांचे दर्शन जगाला घडले होते. जगण्याचा आधार ठरणाऱ्या भारतीय तत्वज्ञानाचे महत्व जागतिक स्तरावर मान्य झाले होते. बंधुभावाच्या, निरपेक्ष स्नेहाच्या आधारे मानवी जीवन विकसित होऊ शकते याचा जागतिक समुदायात विश्वास जागला होता असे प्रतिपादन राजकीय-सामाजिक विश्लेषक मकरंद मुळे यांनी केले. 

विवेकानंद केंद्र कन्याकुमारीच्या ठाणे शाखेतर्फे विश्व बंधुत्वाच्या पूर्वसंध्येला विश्वबंधुत्व काळाची गरज यावर मकरंद मुळे यांचे भाषण आयोजित करण्यात आले होते. ठाणे नौपाडा येथील मराठी ग्रंथ संग्रहालय सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात व्यासपीठावर विवेकानंद केंद्र कोकण प्रांत प्रमुख दीपक नामजोशी होते. 

शिकागो येथील जागतिक धर्मसभेत ११ सप्टेंबर १८९३ रोजी स्वामी विवेकानंद यांचे ऐतिहासिक भाषण झाले होते. भाषणाच्या सुरवातीचे दोन शब्दांनी स्वामी विवेकानंद यांनी जगाचा मानवी नाते संबंधांकडे बघण्याच्या दृष्टीकोनात मूलभूत बदल घडवला होता. त्या सर्वस्वी वेगळ्या भाषणाचे स्मरण म्हणून दरवर्षी ११ सप्टेंबर विश्व बंधुत्व दिन म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्त मकरंद मुळे बोलत होते. ते म्हणाले, सद्य स्थितीत स्वामी विवेकानंद यांचे विचार जगाला तारू शकतील. स्वामी विवेकानंद यांनी दिलेला संदेश आधार ठरेल.

नुकतीच आपल्या देशात यशस्वी झालेली जी-वीस परिषद हे स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचे प्रकटीकरण आहे. १८९३ ची शिकागो सर्वधर्म सभा ते २०२३ भारतातील जी-ट्वेन्टी परिषद हा प्रवास हे हिंदू विचार सामर्थ्याचे विशाल दर्शन आहे. स्वामी विवेकानंद यांनी विदेशात उच्चारलेले बंधू-भगिनी हे दोन शब्द आणि जी-वीस जागतिक परिषदेसाठी वापरलेले वसुधैव कुटुंबकम् हे दोन शब्द भारतीय तत्वज्ञान आहे. असे आपल्या भाषणाच्या शेवटी मुळे यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणे