शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
शुभांशू शुक्ला यांची अंतराळ मोहीम पुन्हा स्थगित; ऑक्सिजन गळतीमुळे मिशनला लागला ब्रेक
4
बॉलिवूड अभिनेत्रीला स्टेज ४ ब्रेस्ट कॅन्सरचं निदान, लेकीला अमेरिकेला पाठवलं; म्हणाली...
5
"हो, मी बाबा होणार आहे...", अरबाज खानने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "नर्व्हस आहेच..."
6
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
7
घरातून पळून जाऊन लग्न करणाऱ्या जोडप्यांना दणका, हायकोर्टाच्या आदेशानंतर नियमात बदल!
8
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
9
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
10
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
11
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
12
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
13
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
14
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
15
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
16
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
17
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
18
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
19
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
20
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार

स्वामी विवेकानंदांच्या विश्‍वबंधुत्वाच्या संकल्पनेला महात्मांच्या विचारांचे अधिष्ठान होते -   धनश्री लेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 16:58 IST

सरस्वती शाळेच्या पटांगणात धनश्री लेले यांनी स्वामी विवेकानंद या विषयावर विवेचन केले.  

ठळक मुद्देरामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेचे पाचवे पुष्प लेले यांनी गुंफलेयुगपुरूष विवेकानंद या विषयावर व्याख्यानरसिकांना केले मंत्रमुग्ध

ठाणे - स्वामी विवेकानंद यांनी सांगितलेल्या विश्‍वबंधुत्वा कल्पनेत संत ज्ञानेश्‍वरांचे पसायदान, संत नामदेवांच्या भक्ती सारखी राष्ट्रभक्ती, संत एकनाथ यांच्यासारखी तोल साधण्याची वृत्ती, समाजात जागृती व्हावी यासाठी संत तुकाराम महाराजांसारखी शब्दांची तळमळ आणि धर्म आणि आत्मोन्नतीचा रामदास स्वामींचा विचार होता. स्वामी विवेकानंदांच्या विश्‍वबंधुत्वाच्या संकल्पनेला या महात्मांच्या विचारांचे अधिष्ठान होते असे मत प्रसिध्द निवेदिका धनश्री लेले यांनी व्यक्त केले.                       रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेचे पाचवे पुष्प लेले यांनी गुंफले. युगपुरूष विवेकानंद या विषयावर त्या बोलत होत्या. युगपुरूष विवेकानंदाच्या कार्यावर त्यांनी आपल्या रसाळ वाणीने प्रकाश टाकत त्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. स्वामी विवेकानंदासाठी भारत हा प्राणधर्म होता. या प्राणधर्माचे प्रत्येकाने उत्तम रितीने पालन केले तर समाजात उद्वेष निर्माण होणार नाही. धर्म हा लोकोपयोगी असतो. उपनिषदातून आलेल्या विश्‍वबंधुत्वाची कल्पना त्यांनी मांडली. बुध्दी प्रामाण्यवादही त्यांनी आपल्याच सांगितले, त्यामुळे स्वामी विवेकानंदाचे विचार समजून घेतांना डावे - उजवे असे करता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. स्वामी  विवेकानंदाच्या व्यापक विचारांकडे दुषित वृत्तीने पाहू नका, त्यांच्या विचारांकडे स्वच्छ दृष्टीने पाहणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.आपल्या संस्कृतीत  धर्म, विज्ञान आणि अध्यात्म एकच संकल्पना स्पष्ट आहेत. आपली संस्कृती सर्व धर्मांना सामावून घेते. आपल्या संस्कृतीला आपल्या धर्माची परंपरा आहे, वैविध्याशिवाय समाजाची प्रगती होणार नाही, हा त्यांचा विचार होता. शिक्षणपध्दती केवळ माहिती म्हणजे ज्ञान नाही तर शिक्षण घेण्यासाठी मनाची दारे उघडी ठेवण्याची गरज आहे. शाळांमधून धर्मांचे शिक्षण दिले गेले तर अंधश्रध्दा दूर होतील, असे मत त्यांनी व्यक्त केले. आपण ज्या राष्ट्रात राहतो, त्या राष्ट्राप्रती कृतज्ञतेची भावना असलीच पाहिजे, तसेच आपल्याला मानवता धर्माचा आणि राष्ट्रीयत्वाच्या भावनाचा विसर पडता कामा नये, यासाठी स्वामी विवेकानंद यांनी अखंड प्रयत्न केले. त्यांच्या विचारांचे स्मरण आपण प्रत्येकांनेच केले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अद्वैता बापट यांनी वंदे मातरम सादर केले. विद्या नानल यांनी विवेकानंद केंद्राच्या कार्याचा परिचय करून दिला. नंदिनी गोरे यांनी स्वागत केले.आमदार संजय केळकर, समितीचे सचिव शरद पुरोहित व मान्यवर उपस्थितीत होते.

टॅग्स :thaneठाणेSwami Vivekanandaस्वामी विवेकानंदcultureसांस्कृतिक