शहरं
Join us  
Trending Stories
1
"सकाळी उठा, व्होटर डेलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
2
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
3
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
4
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
5
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
6
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
7
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
8
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
9
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
10
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
11
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
12
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
13
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
14
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
15
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
16
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
17
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
18
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
19
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
20
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल

स्वामी विवेकानंदांच्या विश्‍वबंधुत्वाच्या संकल्पनेला महात्मांच्या विचारांचे अधिष्ठान होते -   धनश्री लेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 16:58 IST

सरस्वती शाळेच्या पटांगणात धनश्री लेले यांनी स्वामी विवेकानंद या विषयावर विवेचन केले.  

ठळक मुद्देरामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेचे पाचवे पुष्प लेले यांनी गुंफलेयुगपुरूष विवेकानंद या विषयावर व्याख्यानरसिकांना केले मंत्रमुग्ध

ठाणे - स्वामी विवेकानंद यांनी सांगितलेल्या विश्‍वबंधुत्वा कल्पनेत संत ज्ञानेश्‍वरांचे पसायदान, संत नामदेवांच्या भक्ती सारखी राष्ट्रभक्ती, संत एकनाथ यांच्यासारखी तोल साधण्याची वृत्ती, समाजात जागृती व्हावी यासाठी संत तुकाराम महाराजांसारखी शब्दांची तळमळ आणि धर्म आणि आत्मोन्नतीचा रामदास स्वामींचा विचार होता. स्वामी विवेकानंदांच्या विश्‍वबंधुत्वाच्या संकल्पनेला या महात्मांच्या विचारांचे अधिष्ठान होते असे मत प्रसिध्द निवेदिका धनश्री लेले यांनी व्यक्त केले.                       रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेचे पाचवे पुष्प लेले यांनी गुंफले. युगपुरूष विवेकानंद या विषयावर त्या बोलत होत्या. युगपुरूष विवेकानंदाच्या कार्यावर त्यांनी आपल्या रसाळ वाणीने प्रकाश टाकत त्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. स्वामी विवेकानंदासाठी भारत हा प्राणधर्म होता. या प्राणधर्माचे प्रत्येकाने उत्तम रितीने पालन केले तर समाजात उद्वेष निर्माण होणार नाही. धर्म हा लोकोपयोगी असतो. उपनिषदातून आलेल्या विश्‍वबंधुत्वाची कल्पना त्यांनी मांडली. बुध्दी प्रामाण्यवादही त्यांनी आपल्याच सांगितले, त्यामुळे स्वामी विवेकानंदाचे विचार समजून घेतांना डावे - उजवे असे करता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. स्वामी  विवेकानंदाच्या व्यापक विचारांकडे दुषित वृत्तीने पाहू नका, त्यांच्या विचारांकडे स्वच्छ दृष्टीने पाहणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.आपल्या संस्कृतीत  धर्म, विज्ञान आणि अध्यात्म एकच संकल्पना स्पष्ट आहेत. आपली संस्कृती सर्व धर्मांना सामावून घेते. आपल्या संस्कृतीला आपल्या धर्माची परंपरा आहे, वैविध्याशिवाय समाजाची प्रगती होणार नाही, हा त्यांचा विचार होता. शिक्षणपध्दती केवळ माहिती म्हणजे ज्ञान नाही तर शिक्षण घेण्यासाठी मनाची दारे उघडी ठेवण्याची गरज आहे. शाळांमधून धर्मांचे शिक्षण दिले गेले तर अंधश्रध्दा दूर होतील, असे मत त्यांनी व्यक्त केले. आपण ज्या राष्ट्रात राहतो, त्या राष्ट्राप्रती कृतज्ञतेची भावना असलीच पाहिजे, तसेच आपल्याला मानवता धर्माचा आणि राष्ट्रीयत्वाच्या भावनाचा विसर पडता कामा नये, यासाठी स्वामी विवेकानंद यांनी अखंड प्रयत्न केले. त्यांच्या विचारांचे स्मरण आपण प्रत्येकांनेच केले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अद्वैता बापट यांनी वंदे मातरम सादर केले. विद्या नानल यांनी विवेकानंद केंद्राच्या कार्याचा परिचय करून दिला. नंदिनी गोरे यांनी स्वागत केले.आमदार संजय केळकर, समितीचे सचिव शरद पुरोहित व मान्यवर उपस्थितीत होते.

टॅग्स :thaneठाणेSwami Vivekanandaस्वामी विवेकानंदcultureसांस्कृतिक