शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

‘स्वच्छ भारत’ पुरस्कारासाठी जिल्ह्यातून ४८ शाळांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 00:43 IST

‘स्वच्छ भारत, स्वच्छ विद्यालय’ पुरस्कार २०१७-१८ साठी ठाणे जिल्ह्यातील ४८ शाळांची निवड झाली आहे. यामध्ये ठाणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि माध्यमिक विभागाच्या प्रत्येकी

ठाणे : ‘स्वच्छ भारत, स्वच्छ विद्यालय’ पुरस्कार २०१७-१८ साठी ठाणे जिल्ह्यातील ४८ शाळांची निवड झाली आहे. यामध्ये ठाणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि माध्यमिक विभागाच्या प्रत्येकी तीन आणि शहरी भागातील प्राथमिक आणि माध्यमिक विभागाच्या प्रत्येकी एक अशा ८ शाळांनी पहिल्या तीनमध्ये क्र मांक मिळवला आहे. पहिल्या तीन क्रमांकांत निवड झालेल्या शाळांमध्ये ग्रामीण भागातील शाळांचा मुख्यत्वे समावेश आहे. त्या सर्व शाळांची नावे राज्यस्तरीय पुरस्कारासाठी पाठवण्यात येणार आहे.राज्य शासनाने आॅनलाइन पद्धतीने या पुरस्कारासाठी अर्ज भरून घेतले होते. जिल्हा परिषदेच्या आणि महापालिकांच्या एकूण ४११ शाळांनी अर्ज केले होते. त्यापैकी ४८ शाळांची निवड झाली आहे. शाळेचा परिसर स्वच्छ असणे, विद्यार्थ्यांना स्वच्छ पाणी पिण्यास उपलब्ध असणे, शाळेतील स्वच्छतागृहांची योग्य निगा राखली जाणे, अपंग विद्यार्थ्यांसाठी विशेष व्यवस्था असणे, शाळेच्या आवारात हात धुण्यासाठी साबण अथवा हॅण्डवॉश असणे, माध्यमिक शाळेतील विद्यार्थिनींसाठी सॅनिटरी नॅपकीन मशीन असणे आदी बाबींची माहिती शाळांनी अर्जात नमूद केली होती.वरील निकषांवर जिल्हा परिषदेच्या सात शाळांसह नवी मुंबई महापालिकेतील एका प्राथमिक व एका माध्यमिक शाळांनी ९० पेक्षा अधिक गुण मिळवल्याने त्या शाळांची निवड ग्रीन गटात झाली. ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने या शाळांची तपासणी करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांच्या अध्यक्षतेखाली तालुका व जिल्हा समिती तयार केली होती.जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्राथमिक विभागाच्या जि.प. शाळा जांभूळवाडी हिने प्रथम, कातबाव द्वितीय क्र मांक आणि उसघरने तृतीय क्र मांक पटकावला.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान