शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वच्छ भारत’ पुरस्कारासाठी जिल्ह्यातून ४८ शाळांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 00:43 IST

‘स्वच्छ भारत, स्वच्छ विद्यालय’ पुरस्कार २०१७-१८ साठी ठाणे जिल्ह्यातील ४८ शाळांची निवड झाली आहे. यामध्ये ठाणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि माध्यमिक विभागाच्या प्रत्येकी

ठाणे : ‘स्वच्छ भारत, स्वच्छ विद्यालय’ पुरस्कार २०१७-१८ साठी ठाणे जिल्ह्यातील ४८ शाळांची निवड झाली आहे. यामध्ये ठाणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि माध्यमिक विभागाच्या प्रत्येकी तीन आणि शहरी भागातील प्राथमिक आणि माध्यमिक विभागाच्या प्रत्येकी एक अशा ८ शाळांनी पहिल्या तीनमध्ये क्र मांक मिळवला आहे. पहिल्या तीन क्रमांकांत निवड झालेल्या शाळांमध्ये ग्रामीण भागातील शाळांचा मुख्यत्वे समावेश आहे. त्या सर्व शाळांची नावे राज्यस्तरीय पुरस्कारासाठी पाठवण्यात येणार आहे.राज्य शासनाने आॅनलाइन पद्धतीने या पुरस्कारासाठी अर्ज भरून घेतले होते. जिल्हा परिषदेच्या आणि महापालिकांच्या एकूण ४११ शाळांनी अर्ज केले होते. त्यापैकी ४८ शाळांची निवड झाली आहे. शाळेचा परिसर स्वच्छ असणे, विद्यार्थ्यांना स्वच्छ पाणी पिण्यास उपलब्ध असणे, शाळेतील स्वच्छतागृहांची योग्य निगा राखली जाणे, अपंग विद्यार्थ्यांसाठी विशेष व्यवस्था असणे, शाळेच्या आवारात हात धुण्यासाठी साबण अथवा हॅण्डवॉश असणे, माध्यमिक शाळेतील विद्यार्थिनींसाठी सॅनिटरी नॅपकीन मशीन असणे आदी बाबींची माहिती शाळांनी अर्जात नमूद केली होती.वरील निकषांवर जिल्हा परिषदेच्या सात शाळांसह नवी मुंबई महापालिकेतील एका प्राथमिक व एका माध्यमिक शाळांनी ९० पेक्षा अधिक गुण मिळवल्याने त्या शाळांची निवड ग्रीन गटात झाली. ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने या शाळांची तपासणी करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांच्या अध्यक्षतेखाली तालुका व जिल्हा समिती तयार केली होती.जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्राथमिक विभागाच्या जि.प. शाळा जांभूळवाडी हिने प्रथम, कातबाव द्वितीय क्र मांक आणि उसघरने तृतीय क्र मांक पटकावला.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान