शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

दुष्काळ निवारणासाठी शाश्वत उपाय आवश्यक; पाणीतज्ज्ञांचा सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 00:33 IST

डोंबिवलीत जलजागरण अभियानांतर्गत चर्चासत्र; विविध विभागांतील मान्यवर सहभागी

डोंबिवली : दुष्काळाची समस्या स्वीकारून त्यावर शाश्वत उपाययोजना शोधणे आवश्यक आहे. पाणीबचतीसाठी भौगोलिक परिस्थितीचा नीट अभ्यास केल्यास हे सोपे होईल. असे झाले तरच महाराष्टÑ टॅँकरमुक्त होईल, अन्यथा एक दिवस पाणी विकत घेण्याची वेळ येईल, असे मत जलतज्ज्ञांनी व्यक्त केले.

न्यास ट्रस्ट, डोंबिवली यांच्यातर्फे एकदिवसीय जलजागर हा कार्यक्रम रविवारी आनंद बालभवनमध्ये झाला. अविनाश कुबल यांच्या ‘आज भी खरे ही तालाब’ आणि ‘जल थल मल’ या पुस्तकाचे प्रकाशनही झाले. या कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात जलसाक्षरतेची गरज, महाराष्ट्रातील पाणीप्रश्न, जलसंवर्धन व सद्य:स्थिती यावर विभागवार चर्चा करण्यात आली. दुसऱ्या सत्रात पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठावाडा, यवतमाळ येथील जलप्रश्नांवर चर्चा झाली. या चर्चासत्राला पाणीतज्ज्ञ अविनाश कुबल, डॉ. उमेश मुंडल्ये, चैतराम पवार, रवींद्र धारिया, डॉ. अजित गोखले, मनीष राजनकर, रमाकांत कुलकर्णी, डॉ. योगिनी डोळके आदी मान्यवर उपस्थित होते. न्यास संस्थेचे विश्वास भावे यावेळी उपस्थित होते.

मुंडल्ये म्हणाले की, पाणी अडवणे हे खरे यश नाही. त्या पाण्याचे नियोजन कसे होते, यावर ते अवलंबून असते. शेतकऱ्यांचा वापर राजकीय फायद्यासाठी केला गेला. ग्रामीण भागातील स्त्री पिण्याच्या पाण्यासाठी एक वर्षात साधारण साडेतीन हजार किलोमीटर पायपीट करते. ही पायपीट एका पृथ्वी प्रदक्षिणेएवढी आहे. दुसरीकडे विकासाबाबत आपण बोलतो, हा विरोधाभास आहे. योजना चालू ठेवण्यासाठी खर्च करावा लागत नाही, अशा योजना राबवल्या जातात. सध्या बोअरवेल ही संकल्पना फोफावत आहे. त्यांनाही पाणी लागत नसल्याचे ते म्हणाले.

धारिया म्हणाले की, पश्चिम महाराष्ट्रात पाणी नसतानाही शेतकºयांनी त्याचे नियोजन करून बागा फुलवल्या आहेत. लोकांच्या गरजा वाढत चाललेल्या आहेत. त्यामुळे एक काळ असा येईल की, पाणीही विकत घ्यावे लागेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.उत्तर महाराष्ट्रात काम करणारे चैत्राम पवार यांनी सुधारणा करताना लोकसंघटन किती महत्त्वाचे आहे, हे पटवून दिले. अजित गोखले म्हणाले की, तरुण पिढीच्या इंटरनेटवेडामुळे मोठ्या प्रमाणावर पाणीवापर होतो. डाटा सेंटरमध्ये तापमान काटेकोर सांभाळावे लागते. तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी वीज लागते. विजेसाठी पाणी लागते. त्यामुळे शहरातील माणूस गावातील माणसांपेक्षा जास्त पाणी वापरतो. तरुण पिढीने इंटरनेटचा वापर कमी करावा. शहरात तलाव सुशोभीकरणाचे एक फॅड आले आहे. त्यासाठी पाणी आटवले जाते. त्यामुळे नुकसान होत आहे. मनीष राजनकर म्हणाले की, शासन फक्त पाण्याचे वेगवेगळ्या नावाने योजना आणते. त्यात केवळ ठेकेदाराचा फायदा होता. जलयुक्त शिवार ही सरकारची महत्त्वाकांक्षी योजना होती. पण, तिचा लेखाजोखा घेण्याची गरज आहे. या योजनेची विभागवार मांडणी करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.

टॅग्स :Waterपाणी