शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण रेतीबंदरवरील कारवाईस स्थगिती

By admin | Updated: April 15, 2017 03:21 IST

कल्याण खाडीतून रेतीउपसा करणाऱ्या रेती व्यावसायिकांच्या विरोधात जिल्हाधिकारी व तहसीलदारांनी धडक कारवाई केली होती. त्यात रेती व साधनसामग्री अशी ७२ कोटींची

कल्याण : कल्याण खाडीतून रेतीउपसा करणाऱ्या रेती व्यावसायिकांच्या विरोधात जिल्हाधिकारी व तहसीलदारांनी धडक कारवाई केली होती. त्यात रेती व साधनसामग्री अशी ७२ कोटींची मालमत्ता जप्त केली. साधनसाम्रगी नष्ट केल्याने रेती व्यावसायिकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर, सुनावणी करताना न्यायालयाने रेती व्यावसायिकांविरोधातील कारवाईस २५ एप्रिलपर्यंत स्थगिती दिली आहे. तसेच कल्याणच्या तहसीलदारांना आठ दिवसांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले.कल्याण रेतीबंदरामध्ये रेती व्यावसायिकांकडून बेकायदा रेतीउपसा केला जात असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचा ताफा घेऊन तहसीलदार व प्रांत अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत स्वत: दिवसरात्र उभे राहून कारवाई केली होती. या वेळी रेती, रेती व्यावसायिकांचे सक्शन पंप, रेती काढणारे ड्रेझर जप्त केले. या कारवाईनंतर दंडात्मक रक्कम आकारून ते साहित्य संबंधितांच्या ताब्यात देण्याऐवजी ते स्क्रॅप केले. तसेच त्याचे तुकडे आणि रेतीही पुन्हा खाडीतच टाकली. या पाच तासांच्या शॉर्ट पिरीअड नोटिशीच्या कारवाईविरोधात रेती व्यावसायिक युनायटेड कंपनी आणि अशफाक डोण, सलीम खोत यांनी मिळून उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी याचिका दाखल केली. न्यायालयाने रेती व्यावसायिकांच्या विरोधातील महसूल विभागाच्या कारवाईस २५ एप्रिलपर्यंत स्थगिती आदेश दिले आहेत. रेती व्यावसायिकांनी लिलावात एक कोटी ९५ लाख रुपयांची रेती घेतली होती. ती देखील कारवाईच्या वेळी खाडीत फेकून दिली. हे नुकसान कोणाचे झाले, रेती लिलावातून होणारा सरकारी महसूल बुडाला आहे की नाही, असा सवालही न्यायालयाने केला आहे. तसेच या कारवाईमुळे रेती व्यावसायातील पाच हजार कामगारांचा रोजगार ठप्प झाला आहे. (प्रतिनिधी)उशिरापर्यंत कधी काम केले?इतक्या अल्प कालावधीत दिलेल्या नोटीसवरून प्रत्यक्ष धडक कारवाई सुरू केल्याने तहसीलदारांनी नागरिकांच्या कामासाठी तहसील कार्यालयात रात्री १० वाजेपर्यंत बसून किती वेळा व किती दिवस काम केले आहे, असा जाब न्यायालयाने विचारला आहे. तहसीलदारांनी तीन वर्षांत काय काम केले, हे प्रतिज्ञापत्राद्वारे आठ दिवसांच्या आत सादर करावे, असे आदेश तहसीलदारांना दिले आहेत.