शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण रेतीबंदरवरील कारवाईस स्थगिती

By admin | Updated: April 15, 2017 03:21 IST

कल्याण खाडीतून रेतीउपसा करणाऱ्या रेती व्यावसायिकांच्या विरोधात जिल्हाधिकारी व तहसीलदारांनी धडक कारवाई केली होती. त्यात रेती व साधनसामग्री अशी ७२ कोटींची

कल्याण : कल्याण खाडीतून रेतीउपसा करणाऱ्या रेती व्यावसायिकांच्या विरोधात जिल्हाधिकारी व तहसीलदारांनी धडक कारवाई केली होती. त्यात रेती व साधनसामग्री अशी ७२ कोटींची मालमत्ता जप्त केली. साधनसाम्रगी नष्ट केल्याने रेती व्यावसायिकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर, सुनावणी करताना न्यायालयाने रेती व्यावसायिकांविरोधातील कारवाईस २५ एप्रिलपर्यंत स्थगिती दिली आहे. तसेच कल्याणच्या तहसीलदारांना आठ दिवसांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले.कल्याण रेतीबंदरामध्ये रेती व्यावसायिकांकडून बेकायदा रेतीउपसा केला जात असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचा ताफा घेऊन तहसीलदार व प्रांत अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत स्वत: दिवसरात्र उभे राहून कारवाई केली होती. या वेळी रेती, रेती व्यावसायिकांचे सक्शन पंप, रेती काढणारे ड्रेझर जप्त केले. या कारवाईनंतर दंडात्मक रक्कम आकारून ते साहित्य संबंधितांच्या ताब्यात देण्याऐवजी ते स्क्रॅप केले. तसेच त्याचे तुकडे आणि रेतीही पुन्हा खाडीतच टाकली. या पाच तासांच्या शॉर्ट पिरीअड नोटिशीच्या कारवाईविरोधात रेती व्यावसायिक युनायटेड कंपनी आणि अशफाक डोण, सलीम खोत यांनी मिळून उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी याचिका दाखल केली. न्यायालयाने रेती व्यावसायिकांच्या विरोधातील महसूल विभागाच्या कारवाईस २५ एप्रिलपर्यंत स्थगिती आदेश दिले आहेत. रेती व्यावसायिकांनी लिलावात एक कोटी ९५ लाख रुपयांची रेती घेतली होती. ती देखील कारवाईच्या वेळी खाडीत फेकून दिली. हे नुकसान कोणाचे झाले, रेती लिलावातून होणारा सरकारी महसूल बुडाला आहे की नाही, असा सवालही न्यायालयाने केला आहे. तसेच या कारवाईमुळे रेती व्यावसायातील पाच हजार कामगारांचा रोजगार ठप्प झाला आहे. (प्रतिनिधी)उशिरापर्यंत कधी काम केले?इतक्या अल्प कालावधीत दिलेल्या नोटीसवरून प्रत्यक्ष धडक कारवाई सुरू केल्याने तहसीलदारांनी नागरिकांच्या कामासाठी तहसील कार्यालयात रात्री १० वाजेपर्यंत बसून किती वेळा व किती दिवस काम केले आहे, असा जाब न्यायालयाने विचारला आहे. तहसीलदारांनी तीन वर्षांत काय काम केले, हे प्रतिज्ञापत्राद्वारे आठ दिवसांच्या आत सादर करावे, असे आदेश तहसीलदारांना दिले आहेत.