शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

रिक्षा-टॅक्सींच्या परवानेवाटपाला स्थगिती द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 02:28 IST

दिवसागणिक भरमसाट वाढत जाणारी रिक्षा-टॅक्सींची संख्या पाहता परवानेवाटप विनाविलंब बंद करा, अन्यथा त्याला पाच ते दहा वर्षे स्थगिती द्या, अशी मागणी शनिवारी कोकण विभाग रिक्षा-टॅक्सी महासंघाच्या वतीने परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याकडे केली.

कल्याण : दिवसागणिक भरमसाट वाढत जाणारी रिक्षा-टॅक्सींची संख्या पाहता परवानेवाटप विनाविलंब बंद करा, अन्यथा त्याला पाच ते दहा वर्षे स्थगिती द्या, अशी मागणी शनिवारी कोकण विभाग रिक्षा-टॅक्सी महासंघाच्या वतीने परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याकडे केली. या प्रमुख मागणीसह कल्याणकारी महामंडळ, भाडेदरवाढ देणे, ओला-उबेर आणि अवैध प्रवासी वाहतुकीला प्रतिबंध करणे, योग्यता प्रमाणपत्रास होणारा विलंब, या बाबींकडेही रावते यांचे लक्ष वेधले.ठाणे जिल्हा, कोकण विभाग, एमएमआरडीए क्षेत्रातील रिक्षा-टॅक्सीचालक-मालकांच्या विविध समस्या, प्रलंबित मागण्यांसंदर्भात न्याय मागण्याच्या अनुषंगाने कोकण विभाग रिक्षा-टॅक्सी महासंघाचे अध्यक्ष प्रकाश पेणकर यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह परिवहनमंत्री रावते यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. राज्यात सरकारने आॅटोरिक्षा, टॅक्सी परवाने खुले केले आहेत. मागेल त्याला परवाना, प्रथम येईल त्याला परवाना आणि प्राधान्य अशी जाहिरात करून महसुलात वाढ व्हावी, हा एकमेव उद्देश ठेवत परवाने खिरापतीसारखे वाटले जात आहेत. सरसकट परवाने दिले जात असल्याने रिक्षा-टॅक्सी यांच्या संख्येत कमालीची वाढ झाली असून वाहन पार्क करायला आता जागा उरलेली नाही. परिणामी, रिक्षा स्टॅण्ड, रस्ते, पार्किंग, वाहतूकव्यवस्था, वाहतूक पोलीस यंत्रणा आणि पायाभूत सोयीसुविधा यांच्यावर प्रचंड प्रमाणात ताण येत असल्याकडे महासंघाने लक्ष वेधले आहे. परवाने देताना ठरावीक निकष लावावेत. वाढत्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी दोन ते पाच वर्षे जुन्या बॅजधारक व्यक्तीलाच आॅटोरिक्षा, टॅक्सी परवाने देण्यात यावेत, अशी मागणी या वेळी करण्यात आली. आॅटोरिक्षा, टॅक्सीचालक आणि मालकांना माथाडी कामगारांच्या धर्तीवर सोयीसुविधा प्राप्त करण्यासाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्यात यावे, ही मागणी अनेक वर्षांपासून होते आहे. यासाठी विधिमंडळ अधिवेशनात स्थापना आणि निधीची तरतूद केली आहे. याची विनाविलंब अंमलबजावणी आणि पारदर्शकता यासाठी महामंडळावर आयएएस दर्जाचा अधिकारी आणि कोकण विभागीय, ठाणे रिक्षा महासंघाचा प्रतिनिधी यांची नेमणूक करावी, अशी मागणी महासंघाने केली.आॅटोरिक्षा, टॅक्सी योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणात (पासिंग) होणारा विलंब पाहता ठोस उपाययोजना व्हाव्यात, याबरोबरच ओला, उबेर यांचे वाढलेले प्रस्थ आणि अवैध बेकायदेशीर प्रवासी वाहतुकीमुळे रिक्षा आणि टॅक्सीच्या व्यवसायावर परिणाम होत असून ओला, उबेर खाजगी कंपनीला प्रवासी वाहतूक कायद्याच्या कक्षेत घ्यावे आणि नवीन मोबाइल अ‍ॅप टॅक्सी कंपनीला परवानगी देऊ नये, अशीही मागणी रावते यांना सादर केलेल्या निवेदनात केली आहे.>महासंघाला हवी रिक्षा-टॅक्सी भाडेदरवाढरिक्षा-टॅक्सी दरपत्रात वाढ करून मिळावी, याकरिता महासंघाच्या वतीने सातत्याने मागणी होत आहे. आॅटोरिक्षा, टॅक्सी भाडेसूत्र ठरवणारी हकीम समिती तडकाफडकी बरखास्त करून सरकारने चारसदस्यीय खटुआ समिती गठीत केली आहे. परंतु, ही समिती विलंब तसेच वेळकाढूपणा करत आहे. आजतागायत समितीने काहीएक केले नाही. सरकारला अहवाल सादर केलेला नाही. गेली तीन वर्षे सरकार तसेच परिवहन प्रशासनाने महागाईनुसार भाडेवाढ दिलेली नाही, ही बाब खेदजनक असल्याचे महासंघाचे म्हणणे आहे.विचाराअंती निर्णय देऊ : महासंघाने केलेल्या परवानाबंदच्या प्रमुख मागणीबाबत बोलताना परिवहनमंत्री रावते यांनी विचाराअंती निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिल्याची माहिती महासंघाचे अध्यक्ष प्रकाश पेणकर यांनी दिली.