शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
2
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
3
युद्धबंदीनंतर पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
4
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
5
'युद्धबंदीचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
6
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
7
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
8
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
9
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
10
पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
11
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
12
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धबंदीनंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
13
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
14
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
15
'आम्हाला तिसऱ्या पक्षाची...', ट्रम्प यांनी काश्मीर मुद्दा उपस्थित केल्यावर प्रियंका चतुर्वेदींनी दिले उत्तर
16
पाकिस्तानचे अपयश उघड! बिकानेरमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्र बूस्टर, नोज कॅप सापडले
17
तुमच्या मुलीच्या लग्नासाठी लाखो रुपये जमवायचेत? गुंतवणुकीसाठी 'हे' आहेत ३ बेस्ट पर्याय
18
बोरीवलीच्या नँसी व सुकरवाडी एसटी डेपोसाठी ३ महिन्यांत निविदा काढणार; परिवहन मंत्री सरनाईकांची घोषणा
19
चौकारांच्या हॅटट्रिकसह स्मृती मानधनाने साजरी केली विक्रमी सेंच्युरी!
20
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले

हयातीचा दाखला बदलला; निराधार लाभार्थी बॅंकांमध्येही विनाआधार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 01:25 IST

ठाणे जिल्हा : बँकांकडून दाखला अमान्य, लाभार्थ्यांच्या तक्रारी 

सुरेश लाेखंडेलोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जिल्ह्यात विशेष साहाय्य योजनेंतर्गत अनुदान वाटपाच्या योजना सुरू आहेत. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांच्या यादीत नाव असलेल्या ६५ व ६५ वर्षांवरील वृद्ध व्यक्तींना केंद्र शासनाची इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, राज्य शासनाची श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन व संजय गांधी निराधार अनुदान योजना आदी राबविण्यात येत आहेत. यासाठी लागणारा हयातीचा दाखला प्रशासनाने दिलेला आहे. पण बँकांकडून तो मान्य केला जात नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे या योजनांचे निराधार लाभार्थी सध्या विनाआधार झाले आहेत.

 इंदिरा गांधी  योजनेद्वारे लाभार्थ्यांना प्रतिमहा २०० व ५०० रुपये निवृत्ती वेतन दिले जाते. त्याचा लाभ जिल्ह्यातील ४,२९३ वृद्धांना मिळतो. यंदा ७१ लाखांचे अनुदान प्राप्त झाले होते. त्यातून ऑगस्टपर्यंत ६२ लाख ५१ हजार ५०० पर्यंतचे अनुदान वाटप झाले आहे. गेल्या वर्षी मार्चअखेरपर्यंत एक कोटी पाच लाख ८३ हजारांचे वेतन वाटप झाले आहे. या वेतनाची रक्कम दरमहाऐवजी कधी तीन, पाच तर कधी सहा महिन्यांची रक्कम एकाच वेळी खात्यावर जमा होते. मात्र लाभार्थी दरमहा बँकेत येऊन खात्यात पैसे जमा झाले का, म्हणून विचारणा करतात. श्रावणबाळ योजनेद्वारे दरमहा ५०० व ८०० रुपये मिळतात. या योजनेचे जिल्ह्यात ४,९९६ लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांना दोन्ही योजनांचे दरमहा एक हजार रुपये मिळतात. 

‘मदत दरमहिन्याला वेळच्या वेळी मिळावी’इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतनद्वारे ३०० रुपये दिले जातात. याशिवाय संजय गांधी निराधार योजनेतून ७०० ते ८०० रुपये मिळतात. या योजनांच्या लाभार्थ्यांमध्ये विधवा निवृत्ती वेतनचे ११९ लाभार्थी, तर संजय गांधी निराधारचे नऊ हजार ४५७ लाभार्थी आहेत. मात्र, ही मदत दरमहिन्याला वेळच्या वेळी द्यावी. त्यातून घर चालवता येईल, अशी अपेक्षा लाभार्थ्यांनी व्यक्त केली आहे.

खातेदारांना आम्ही दाखला देतो. त्यासाठी आम्ही स्वत: तहसीलदार कार्यालयात जाऊन या लाभार्थी खातेदारांची समस्या सोडवली आहे. हयातीच्या दाखल्यासाठीही आम्ही सहकार्य करून त्यांचे अनुदान मिळवून देतो.- राजेश घेरा, बॅंक अधिकारीहयातीच्या दाखल्यासाठी कोणाचेही हाल व्हायला नकोत. त्यासाठी आम्ही आधीपासून प्रयत्नशील आहोत. तरीही काहींना दाखल्यासाठी धावपळ करावी लागत आहे. त्यावर लवकरच उपाययोजना केली जाईल.- चेतन पवार, समाजसेवक