शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

ग्रामीण भागात एक लाख ८६ हजार कुटुंबांचे सर्वेक्षण; जिल्हा परिषदेची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 00:30 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाचे प्रयत्न

ठाणे : दोन ते तीन महिन्यांपासून ग्रामीण भागात आटोक्यात आलेल्या कोरोनाने पुन्हा डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात आजही रुग्णांची संख्या आटोक्यात आहे. असे असले तरी, ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, याकरिता जिल्हा आरोग्य विभागाने विविध उपाययोजना आखण्यास सुरुवात केली असून, रुग्ण सापडलेल्या ठिकाणाचा परिसर कंटेन्टमेंट झोन म्हणून घोषित करण्यात येत आहे. या क्षेत्रात ४१९ सर्वेक्षण पथकांच्या माध्यमातून आतापर्यंत एक लाख ८६ हजार घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.

ठाणे जिल्ह्यात मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा शिरकाव झाला. ग्रामीण भागात या आजाराचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहे. त्यात सध्याच्या घडीला मुरबाड, अंबरनाथ, शहापूर, कल्याण, भिवंडी या ग्रामीण भागात आतापर्यंत २० हजार ६६० जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आतापर्यंत १९ हजार ३२४ जणांनी कोरोनावर मात केली असली तरी, या आजाराने ६०५ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. सध्या ७३१ जण विविध रुग्णालय, कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष सुषमा लोणे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे, उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना करण्याचे काम ग्रामपंचायतनिहाय केले जात आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी 

डॉ. मनिष रेंघे यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य अधिकारी आणि विविध कर्मचारी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुरबाड, अंबरनाथ, शहापूर, कल्याण, भिवंडी तालुक्यात कार्यरत आहेत. दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येत आहे. यासाठी आरोग्याच्या कर्मचाऱ्यांसह, महिला व बालविकास विभागाच्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा कार्यकर्ती अशा एकूण ४१९ सर्वेक्षण पथकांच्या माध्यमातून सर्वेक्षणाचे काम सुरू असून, आतापर्यंत एक लाख ८६ हजार ४६० नागरिकांचे सर्वेक्षण केल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाने दिली.