शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर सुरमणी पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक आशिष साबळे यांच्या संगीत लहरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 16:35 IST

३५९ व्या  क्रमांकाच्या अभिनय कट्टयावर सुरमणी आशिष साबळे यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. रसिकांना यावेळी शास्त्रीय संगीत जगतातील भूपाळी, भैरवी, यमन कल्याण या रागांच्या आस्वादासोबतच  संगीताचे एकूणच मानवी जीवनाशी आणि विज्ञानाशी असणारे नातेसंबंध याची उकल यावेळी अनुभवायला मिळाली.

ठळक मुद्देअभिनय कट्ट्यावर सुरमणी पुरस्कार विजेते आशिष साबळे शास्त्रीय संगीत सादर निवेदनाची धुरा अभिनय कट्ट्याचे संचालक किरण नाकती यांनी सांभाळली

ठाणे : मकर संक्रांतीचे औचित्य साधत रविवारी संक्रांतसंध्या गोड करण्यासाठी ३५९ क्रमांकाच्या कट्टयावर संगीत लहरी या शास्त्रीय गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ईश्वराच्या आराधने नंतर आशिष साबळे आणि त्यांच्या पत्नी स्मिता साबळे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन पार पडले. अभिनय कट्ट्याचे अध्यक्ष दिग्दर्शक किरण नाकती यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगताना आशिष साबळे यांचं व्यक्तिमत्त्व प्रेक्षकांसमोर मांडले.

       यानंतर लागलीच कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली. संगीत लहरी - स्पंदनांकडून चेतनेकडे या विषयाला धरून सुरमणी आशिष साबळे यांनी शास्त्रीय संगीत सादर केले. हा केवळ गायनाचा कार्यक्रम नसून शास्त्रीय संगीतातील सामर्थ्य, गोडवा आणि खोली हि सर्वांना आनंद आणि मानसिक शांती देणारी आहे हे आशिष साबळे यांनी सुरवातीलाच स्पष्ट केले. गेल्या २० वर्षापासून आग्रा घराण्यातील उस्ताद मोहसीन अहमद खान यांच्याकडून ते शास्त्रीय संगीत शिकत आहेत. केवळ आवड म्हणून जोपासलेला छंद आणि त्यासाठी आवश्यक असलेला रियाज  गेल्या २० वर्षापासून ते नियमितपणे करीत आहेत. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत, नव्याने उलगडलेले विज्ञान आणि अध्यात्म यांचा समन्वय साधून या कार्यक्रमाची प्रस्तुती त्यांनी केली. गायक आशिष साबळे यांच्या मतानुसार प्रत्येक जीवात एक सूर असतो आणि त्या सुरांवर संस्कार होणे हे सदैव आनंदी राहण्यासाठी  गरजेचे असते. संगीताचे संस्कार हे फक्त याच जन्मासाठी नसून जन्मजन्मासाठी असतात, आणि अशा संस्काराअभावी असू-या प्रवृत्ती जन्म घेतात. आपल्या मधील सूर बळकट केले तर आत्मबळ हि वाढेल आणि आपल्यात दिसणारी अशांती हि नाहीशी होईल असा आशावाद हि त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, सुरांवरची बळकटी असलेले यमन, मालकंस, भोपाली असे खास आग्रा शैलीची गायकी प्रधान असलेले राग  आणि त्यावरील भजने त्यांनी सादर केली. यावेळी त्यांना अशोक शिंदे यांनी तबल्यावर तर विनोद पडगे  यांनी हार्मोनियम  वर साथ दिली. संक्रांति निमित्त सादर झालेल्या या कार्यक्रमात गोड बोलण्याचा व पवित्र भावनेचा आपल्या जीवनावर कसा प्रभाव पडतो हे समजावून सांगत असताना जपान येथील मासरू ईमिटो या शास्त्रज्ञाने केलेल्या प्रयोगाचा पुरावा दिला. या प्रयोगाने भारतीय संस्कृतीमध्ये असलेले संस्कार प्रकृतीशी किती जुळलेले आहेत या बद्दलचा रसिकांच्या मनातील विश्वास अधिकच दृढ केला. शेवटी मनुष्य जन्म दुर्लभ असून जगात शांतता प्रस्थापित करण्याचे सामर्थ्य हे फक्त मनुष्य जीवात आहे आणि त्यामुळेच प्रकृतीने मनुष्याला जन्माला  घातले हा आशय ठामपणे सांगणा-या “ धन्य भाग सेवा का अवसर पाया” यातील संदर्भ आणि अर्थ समजावून देत त्यांनी भैरवीने कार्यक्रमाची सांगता केली. सदर कट्ट्याच्या निवेदनाची धुरा अभिनय कट्ट्याचे संचालक किरण नाकती यांनी सांभाळली होती. कार्यक्रमाअंती आशिष साबळे आणि त्यांच्या साथीदारांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या नंतर सर्व प्रेक्षकांना तिळाचे लाडू व मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देत कट्ट्याच्या पुढील कार्यक्रमाला सुद्धा याच संख्येने उपस्थित राहून आनंद लुटण्याचे आवाहन अध्यक्ष किरण नाकती यांनी करत कार्यक्रमाची सांगता केली.

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकentertainmentकरमणूक