शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर सुरमणी पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक आशिष साबळे यांच्या संगीत लहरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 16:35 IST

३५९ व्या  क्रमांकाच्या अभिनय कट्टयावर सुरमणी आशिष साबळे यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. रसिकांना यावेळी शास्त्रीय संगीत जगतातील भूपाळी, भैरवी, यमन कल्याण या रागांच्या आस्वादासोबतच  संगीताचे एकूणच मानवी जीवनाशी आणि विज्ञानाशी असणारे नातेसंबंध याची उकल यावेळी अनुभवायला मिळाली.

ठळक मुद्देअभिनय कट्ट्यावर सुरमणी पुरस्कार विजेते आशिष साबळे शास्त्रीय संगीत सादर निवेदनाची धुरा अभिनय कट्ट्याचे संचालक किरण नाकती यांनी सांभाळली

ठाणे : मकर संक्रांतीचे औचित्य साधत रविवारी संक्रांतसंध्या गोड करण्यासाठी ३५९ क्रमांकाच्या कट्टयावर संगीत लहरी या शास्त्रीय गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ईश्वराच्या आराधने नंतर आशिष साबळे आणि त्यांच्या पत्नी स्मिता साबळे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन पार पडले. अभिनय कट्ट्याचे अध्यक्ष दिग्दर्शक किरण नाकती यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगताना आशिष साबळे यांचं व्यक्तिमत्त्व प्रेक्षकांसमोर मांडले.

       यानंतर लागलीच कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली. संगीत लहरी - स्पंदनांकडून चेतनेकडे या विषयाला धरून सुरमणी आशिष साबळे यांनी शास्त्रीय संगीत सादर केले. हा केवळ गायनाचा कार्यक्रम नसून शास्त्रीय संगीतातील सामर्थ्य, गोडवा आणि खोली हि सर्वांना आनंद आणि मानसिक शांती देणारी आहे हे आशिष साबळे यांनी सुरवातीलाच स्पष्ट केले. गेल्या २० वर्षापासून आग्रा घराण्यातील उस्ताद मोहसीन अहमद खान यांच्याकडून ते शास्त्रीय संगीत शिकत आहेत. केवळ आवड म्हणून जोपासलेला छंद आणि त्यासाठी आवश्यक असलेला रियाज  गेल्या २० वर्षापासून ते नियमितपणे करीत आहेत. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत, नव्याने उलगडलेले विज्ञान आणि अध्यात्म यांचा समन्वय साधून या कार्यक्रमाची प्रस्तुती त्यांनी केली. गायक आशिष साबळे यांच्या मतानुसार प्रत्येक जीवात एक सूर असतो आणि त्या सुरांवर संस्कार होणे हे सदैव आनंदी राहण्यासाठी  गरजेचे असते. संगीताचे संस्कार हे फक्त याच जन्मासाठी नसून जन्मजन्मासाठी असतात, आणि अशा संस्काराअभावी असू-या प्रवृत्ती जन्म घेतात. आपल्या मधील सूर बळकट केले तर आत्मबळ हि वाढेल आणि आपल्यात दिसणारी अशांती हि नाहीशी होईल असा आशावाद हि त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, सुरांवरची बळकटी असलेले यमन, मालकंस, भोपाली असे खास आग्रा शैलीची गायकी प्रधान असलेले राग  आणि त्यावरील भजने त्यांनी सादर केली. यावेळी त्यांना अशोक शिंदे यांनी तबल्यावर तर विनोद पडगे  यांनी हार्मोनियम  वर साथ दिली. संक्रांति निमित्त सादर झालेल्या या कार्यक्रमात गोड बोलण्याचा व पवित्र भावनेचा आपल्या जीवनावर कसा प्रभाव पडतो हे समजावून सांगत असताना जपान येथील मासरू ईमिटो या शास्त्रज्ञाने केलेल्या प्रयोगाचा पुरावा दिला. या प्रयोगाने भारतीय संस्कृतीमध्ये असलेले संस्कार प्रकृतीशी किती जुळलेले आहेत या बद्दलचा रसिकांच्या मनातील विश्वास अधिकच दृढ केला. शेवटी मनुष्य जन्म दुर्लभ असून जगात शांतता प्रस्थापित करण्याचे सामर्थ्य हे फक्त मनुष्य जीवात आहे आणि त्यामुळेच प्रकृतीने मनुष्याला जन्माला  घातले हा आशय ठामपणे सांगणा-या “ धन्य भाग सेवा का अवसर पाया” यातील संदर्भ आणि अर्थ समजावून देत त्यांनी भैरवीने कार्यक्रमाची सांगता केली. सदर कट्ट्याच्या निवेदनाची धुरा अभिनय कट्ट्याचे संचालक किरण नाकती यांनी सांभाळली होती. कार्यक्रमाअंती आशिष साबळे आणि त्यांच्या साथीदारांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या नंतर सर्व प्रेक्षकांना तिळाचे लाडू व मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देत कट्ट्याच्या पुढील कार्यक्रमाला सुद्धा याच संख्येने उपस्थित राहून आनंद लुटण्याचे आवाहन अध्यक्ष किरण नाकती यांनी करत कार्यक्रमाची सांगता केली.

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकentertainmentकरमणूक