शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
2
मतचोरी करूनच मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झालेत..; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप
3
निवडणूक आयोगाविरोधात १ नोव्हेंबरला मुंबईत निघणार विराट मोर्चा; सर्वपक्षीय विरोधकांची घोषणा
4
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियाला पराभवाचा धक्का; ऑस्ट्रेलियानं पर्थच्या मैदानात जिंकला पहिला सामना
5
दिवाळीपूर्वी बाजारात 'लक्ष्मी दर्शन'! टॉप १० कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये २.१६ लाख कोटींची वाढ, सर्वाधिक कुठे?
6
लव्ह ट्रँगलचा भयंकर शेवट! माजी लिव्ह-इन पार्टनरने केली गर्भवतीची हत्या, पतीने घेतला आरोपीचा जीव
7
जियोफायनान्सकडून डिजिटल गोल्ड खरेदीवर २% सोने मोफत; सोबत १० लाख रुपयांपर्यंतची बक्षिसेही
8
Mitchell Starc Bowling Speed : स्टार्कनं खरंच रोहितला 'वर्ल्ड रेकॉर्ड' सेट करणारा वेगवान चेंडू टाकला?
9
सोमवारी बँक सुरू की बंद? दिवाळीच्या दिवशी बँकेत जाण्यापूर्वी RBI ची सुट्टीची यादी नक्की तपासा!
10
IND vs AUS 1st ODI : गिलनं साधला मोठा डाव! महेंद्र सिंह धोनीचा कॅप्टन्सीतील रेकॉर्ड मोडला
11
Parineeti Chopra : परिणीती चोप्रा-राघव चड्ढा झाले आईबाबा, अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्याचे आगमन
12
संतापजनक! अमृत भारत एक्स्प्रेसमध्ये वापरलेल्या प्लेट्स धुवून दिलं जेवण, प्रवाशांच्या जीवाशी खेळ
13
'द केरला स्टोरी' फेम अदा शर्माचं खरं नाव माहितीये? वेगळं नाव का वापरावं लागलं? म्हणाली...
14
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियानं केल्या १३६ धावा, पण ऑस्ट्रेलियाला मिळालं १३१ धावांचं टार्गेट; कारण...
15
IAS Pawan Kumar : आईने विकले दागिने, वडिलांनी मजुरी करून शिकवलं; लेकाने IAS होऊन कष्टाचं सोनं केलं
16
"गोंद्या आला रे...पुष्पा आला रे...", बोगस मतदान रोखण्यासाठी मनसेचा कोडवर्ड; अविनाश जाधव, राजू पाटलांनी सांगितला प्लान!
17
एका घोटाळ्यामुळे ११७ वर्षांचा इतिहास संपुष्टात! 'हा' शेअर बाजार कायमचा बंद होणार; सेबीची विक्रीला मंजुरी
18
फक्त टार्गेट वाढतं, पगार नाही; कर्मचाऱ्याचा राजीनामा होतोय तुफान व्हायरल, कंपनी म्हणते...
19
"आम्ही ९ ते ५ जॉब करणाऱ्यांपेक्षा जास्त मेहनत करतो...", काजोल बरळली, म्हणाली- "आम्हाला १२-१४ तास..."
20
Raj Thackeray: तो मतदार आला की पकडलाच म्हणून समजा...! मनसेने रचला सापळा; राज ठाकरेंचे घणाघाती भाषण...

सुरेश टावरेंच्या उमेदवारीमुळे होती काँग्रेसमध्ये नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2019 01:14 IST

भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेच्यावेळी भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघ निर्माण झाला.

- पंढरीनाथ कुंभारभिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेच्यावेळी भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघ निर्माण झाला. त्यानंतर, झालेल्या पहिल्या निवडणुकीत समाजवादी पक्षाचे अबू आसीम आझमी निवडून आले होते. परंतु, ते मुंबईतील गोवंडी येथे निवडून आल्याने त्यांनी या जागेचा राजीनामा दिला. त्यामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीत आझमी यांचा मुलगा फरहान आझमी यांनी निवडणूक लढवली. त्यावेळी भाजप-सेना युतीचे उमेदवार रूपेश म्हात्रे निवडून आले. त्यानंतर, २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत सेना व भाजप युती नव्हती. तरीही, शिवसेनेचे म्हात्रे भाजप व समाजवादी पक्षाच्या उमेदवारास पराभूत करून निवडून आले. त्यामुळे या विधानसभा क्षेत्रातून समाजवादीचे उमेदवार डॉ. नुरूद्दीन अन्सारी यांना चांगली मते मिळणे अपेक्षित होते. परंतु, त्यांना केवळ ६८५ मते मिळाली. यावरून भिवंडी पूर्व मतदारसंघातील समाजवादी पक्षाचा प्रभाव संपुष्टात आला, असे अनुमान काढता येईल.समाजवादीला मिळणारी मतेही अपेक्षेप्रमाणे काँग्रेसला मिळालेली नाहीत. याचे कारण म्हणजे काँग्रेसचे कार्यकर्ते मतदारांपर्यंत पोहोचले नाहीत. भिवंडी लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांना पक्षश्रेष्ठींनी उमेदवारी दिल्याने नगरसेवकांमध्ये नाराजी पसरली होती. त्यांनी बंडखोरी केली होती. त्याचप्रमाणे काँग्रेस शहराध्यक्ष शोएब गुड्डू यांनीही या वस्तुस्थितीकडे फारसे लक्ष न देता त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला नाही. मतदारसंघात काँग्रेसने सेलिब्रेटींच्या सभा घेतल्या नाहीत. परिणामी, काँग्रेसचा प्रचार मतदारांपर्यंत पोहोचला नाही. त्यामुळे या मतदारसंघातील मतदान कपिल पाटील यांना मिळालेल्या मतांपेक्षा २३ हजारांनी वाढलेले दिसले, तरी अपेक्षेप्रमाणे ते कमी झाल्याचे दिसून येते. त्याउलट, या मतदारसंघातील मतदान मिळवण्यासाठी पाटील व सेनेचे म्हात्रे यांनी चांगलेच प्रयत्न केले. येत्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने आमदार म्हात्रे यांनी आपले वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे पाटील यांना ४७,०१८ मते मिळाली. तर, वंचित आघाडीचे कार्यकर्ते मतदारांपर्यंत न पोहोचल्याने ३८०३ मतांवर समाधान मानावे लागले.>विधानसभेला काँग्रेसलायश मिळणे कठीणलोकसभा निवडणुकीत उमेदवार कपिल पाटील यांच्याविरोधात शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने बंड पुकारले. त्याचा परिणाम होऊ न देता शिवसेनेचे आमदार व नगरसेवकांनी या मतदारसंघात चांगले काम केले. त्याप्रमाणे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनीही मते मिळवण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे ही जागा पुढील निवडणुकीत युतीकडे राहण्याच्या अपेक्षा वाढल्या आहेत. एकूणच काँग्रेसला या मतदारसंघात कितपत यश मिळेल, हे काळच ठरवणार आहे. पक्षातील अंतर्गत गटबाजी शमणे अत्यंत गरजेचे आहे.>की फॅक्टर काय ठरला?काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांना पक्षातील गटाचा विरोध असताना त्यांनी विश्वासातील कार्यकर्त्यांना हाताशी धरून मते मिळवली.शिवसेना आमदार रूपेश म्हात्रे यांनी विधानसभेची संधी पुन्हा मिळवण्यासाठी भाजप उमेदवार कपिल पाटील यांचे काम करत युतीधर्म टिकवला.या मतदारसंघातील काही काँग्रेस नगरसेवक व नाराज गटांनी काम न केल्याने भाजप उमेदवाराला अपेक्षेपेक्षा लीड कमी मिळाले.