शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
2
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
3
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
4
मेस्सीचा इव्हेंट फसला, स्टेडियममध्ये मोठा गोंधळ झाला होता; बंगालच्या क्रीडामंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला
5
IPL 2026 Auction: विस्फोटक फलंदाज आयपीएल २०२६ च्या मेगा ऑक्शनमध्ये अनसोल्ड, नाव ऐकून चकीत व्हाल!
6
सोनं १३०६ रुपयांनी स्वस्त, चांदीही घसरली; पटापट चेक करा कॅरेटनिहाय लेटेस्ट रेट
7
Jara Hatke: अजब प्रथा: 'या' गावात लग्नाआधी तोडले जातात वधूचे दात; पण का??? वाचा 
8
मनोज जरांगे पाटील यांनी दिल्ली गाठली; अमित शाह यांच्याकडे केली मोठी मागणी, नेमके काय घडतेय?
9
IPL Auction 2026 LIVE: केकेआरचा मोठा डाव, कॅमरून ग्रीनपाठोपाठ पतिरानावर लावली विक्रमी बोली
10
Budh Pradosh 2025: इंग्रजी वर्ष २०२५ मधील शेवटचे प्रदोष व्रत; कर्जमुक्ती, संतान प्राप्तीसाठी करा 'हे' उपाय
11
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉसह सरफराज खानला कुणीच दिला नाही भाव; सलग दुसऱ्यांदा 'अनसोल्ड'चा ठपका
12
खळबळजनक! लेकीच्या कस्टडीसाठी पतीने रचला भयंकर प्लॅन; टीव्ही अभिनेत्री पत्नीला केलं किडनॅप
13
नाईट क्लब आग प्रकरणी फरार लुथरा बंधूंना दिल्लीत आणले; थायलंडला पळून गेले होते
14
कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! मार्च २०२६ पूर्वी मिळणार मोठं गिफ्ट, सरकारनं दिली महत्त्वाची माहिती
15
सेकंदात तयार होणारी मॅगी कॅप्सूल खरी की खोटी? ४० मिलियन लोकांनी बघितलेल्या व्हिडीओचं सत्य काय?
16
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' जन्मतारखेच्या लोकांनी पायात काळा धागा बांधू नये; होतो दुष्परिणाम!
17
क्रीडा मंत्री माणिकराव कोकटे यांना कुठल्याही क्षणी अटक होणार?; जिल्हा कोर्टाने सुनावला निकाल
18
IPL 2026 Auction : कॅमरुन ग्रीनसह BCCI ही मालामाल! ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लागली रेकॉर्ड ब्रेकिंग बोली
19
रिअलमीचा धमाका! ७०००mAh बॅटरीसह Realme Narzo 90 सिरीज भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत
20
हायड्रोजन कारची जगातील पहिली क्रॅश टेस्ट झाली; ह्युंदाई नेक्सो किती आहे सुरक्षित...
Daily Top 2Weekly Top 5

सुरेश टावरेंच्या उमेदवारीमुळे होती काँग्रेसमध्ये नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2019 01:14 IST

भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेच्यावेळी भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघ निर्माण झाला.

- पंढरीनाथ कुंभारभिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेच्यावेळी भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघ निर्माण झाला. त्यानंतर, झालेल्या पहिल्या निवडणुकीत समाजवादी पक्षाचे अबू आसीम आझमी निवडून आले होते. परंतु, ते मुंबईतील गोवंडी येथे निवडून आल्याने त्यांनी या जागेचा राजीनामा दिला. त्यामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीत आझमी यांचा मुलगा फरहान आझमी यांनी निवडणूक लढवली. त्यावेळी भाजप-सेना युतीचे उमेदवार रूपेश म्हात्रे निवडून आले. त्यानंतर, २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत सेना व भाजप युती नव्हती. तरीही, शिवसेनेचे म्हात्रे भाजप व समाजवादी पक्षाच्या उमेदवारास पराभूत करून निवडून आले. त्यामुळे या विधानसभा क्षेत्रातून समाजवादीचे उमेदवार डॉ. नुरूद्दीन अन्सारी यांना चांगली मते मिळणे अपेक्षित होते. परंतु, त्यांना केवळ ६८५ मते मिळाली. यावरून भिवंडी पूर्व मतदारसंघातील समाजवादी पक्षाचा प्रभाव संपुष्टात आला, असे अनुमान काढता येईल.समाजवादीला मिळणारी मतेही अपेक्षेप्रमाणे काँग्रेसला मिळालेली नाहीत. याचे कारण म्हणजे काँग्रेसचे कार्यकर्ते मतदारांपर्यंत पोहोचले नाहीत. भिवंडी लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांना पक्षश्रेष्ठींनी उमेदवारी दिल्याने नगरसेवकांमध्ये नाराजी पसरली होती. त्यांनी बंडखोरी केली होती. त्याचप्रमाणे काँग्रेस शहराध्यक्ष शोएब गुड्डू यांनीही या वस्तुस्थितीकडे फारसे लक्ष न देता त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला नाही. मतदारसंघात काँग्रेसने सेलिब्रेटींच्या सभा घेतल्या नाहीत. परिणामी, काँग्रेसचा प्रचार मतदारांपर्यंत पोहोचला नाही. त्यामुळे या मतदारसंघातील मतदान कपिल पाटील यांना मिळालेल्या मतांपेक्षा २३ हजारांनी वाढलेले दिसले, तरी अपेक्षेप्रमाणे ते कमी झाल्याचे दिसून येते. त्याउलट, या मतदारसंघातील मतदान मिळवण्यासाठी पाटील व सेनेचे म्हात्रे यांनी चांगलेच प्रयत्न केले. येत्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने आमदार म्हात्रे यांनी आपले वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे पाटील यांना ४७,०१८ मते मिळाली. तर, वंचित आघाडीचे कार्यकर्ते मतदारांपर्यंत न पोहोचल्याने ३८०३ मतांवर समाधान मानावे लागले.>विधानसभेला काँग्रेसलायश मिळणे कठीणलोकसभा निवडणुकीत उमेदवार कपिल पाटील यांच्याविरोधात शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने बंड पुकारले. त्याचा परिणाम होऊ न देता शिवसेनेचे आमदार व नगरसेवकांनी या मतदारसंघात चांगले काम केले. त्याप्रमाणे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनीही मते मिळवण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे ही जागा पुढील निवडणुकीत युतीकडे राहण्याच्या अपेक्षा वाढल्या आहेत. एकूणच काँग्रेसला या मतदारसंघात कितपत यश मिळेल, हे काळच ठरवणार आहे. पक्षातील अंतर्गत गटबाजी शमणे अत्यंत गरजेचे आहे.>की फॅक्टर काय ठरला?काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांना पक्षातील गटाचा विरोध असताना त्यांनी विश्वासातील कार्यकर्त्यांना हाताशी धरून मते मिळवली.शिवसेना आमदार रूपेश म्हात्रे यांनी विधानसभेची संधी पुन्हा मिळवण्यासाठी भाजप उमेदवार कपिल पाटील यांचे काम करत युतीधर्म टिकवला.या मतदारसंघातील काही काँग्रेस नगरसेवक व नाराज गटांनी काम न केल्याने भाजप उमेदवाराला अपेक्षेपेक्षा लीड कमी मिळाले.