शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

सुरेश द्वादशीवार यांच्या वक्तव्याचा अखिल भारतीय साहित्य परिषदेकडून निषेध

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: October 13, 2022 17:20 IST

Suresh Dwadashiwar: “ललित साहित्याचे बहुतांश लेखक हे उच्चवर्णीय होते त्यामुळे त्यांच्यावर सावरकरांच्या विचारांचा पगडा असल्याने ते गांधी विरोधी होते.” असे वक्तव्य केल्याने प्रा. सुरेश द्वादशीवार यांचा अखिल भारतीय साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश त्यांच्या वक्तव्याचा निषेध करत आहे.

- प्रज्ञा म्हात्रे ठाणे : “ललित साहित्याचे बहुतांश लेखक हे उच्चवर्णीय होते त्यामुळे त्यांच्यावर सावरकरांच्या विचारांचा पगडा असल्याने ते गांधी विरोधी होते.” असे वक्तव्य केल्याने प्रा. सुरेश द्वादशीवार यांचा अखिल भारतीय साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश त्यांच्या वक्तव्याचा निषेध करत आहे. तसे पत्र त्यांनी प्रसिद्ध केले आहे. अशी द्वेषमुलक भाषणे करणाऱ्या आणि तशीच मते असणाऱ्या माणसांना साहित्य संमेलनाचे अध्यक्ष केले जाऊ नये असे अखिल भारतीय साहित्य परिषदेचे स्पष्ट मत आहे असल्याचे त्यांनी या पत्रात म्हटले आहे. 

वर्धा येथे होणाऱ्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेने ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक द्वादशीवार, लेखक अच्युत गोडबोले आणि ज्येष्ठ कवी प्रा. प्रविण दवणे यांची नावे सुचविलेली आहेत. गोवा, फोंडा येथे  शनिवार १५ बर ऑक्टोबर रोजी होणाऱ्या बैठकीत एकमताने अध्यक्षपदाची निवड होणार आहे. या अध्यक्षपदाच्या स्पर्धेत असणाऱ्या द्वादशीवार यांच्या वक्तव्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आपल्यातील जात धर्म यांचे भेदाभेद मिटवून आपण एकत्र आले पाहिजे असा लोकांना उपदेश करणारे द्वादशीवार यांनी स्वतःच्या भाषणात मात्र भेदभावाला खतपाणीच घातले आहे. मराठीतील बहुतांश ललित लेखक हे ब्राह्मण होते, ललित साहित्याचे बहुतांश लेखक हे उच्चवर्णीय होते. त्यामुळे त्यांच्यावर सावरकरांच्या विचारांचा पगडा असल्याने ते गांधी विरोधी होते आणि त्यांनी महात्मा गांधींना न्याय दिला नाही असे वर्णभेद निर्माण करणारे, भावना भडकावून दुही माजवणारे विखारी भाषण त्यांनी केले.

दक्षिणायन महाराष्ट्र या संस्थेच्या नागपूर येथील कार्यक्रमात ते बोलत होते असे अखिल भारतीय साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. नरेंद्र पाठक यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे. आपल्या भाषणात खांडेकर ते प्र.के. अत्रे यांच्यापर्यंत अनेकांची निंदा करत त्यांनी न्यायालयांवरही टीका केली. न्यायालये सुद्धा सध्या स्वच्छ राहिली नाहीत, हिंदू मताची झाली आहेत असे म्हणत अत्यंत अवमानकारक भाषण केले. अशी भाषणे करून समाजातील भेदांना उत्तेजन देणाऱ्या विषारी प्रवृत्तीचा अखिल भारतीय साहित्य परिषद तीव्र निषेध करत आहे असे पाठक म्हणाले. साहित्याच्या उद्देश समाज तोडणे नसून समाज जोडणे आहे हे विसरून चालणार नाही. साहित्य संमेलनाचा अध्यक्षच जर भेदाला उत्तेजन देणारा असेल तर ते साहित्य संमेलन समाजाला कोणती दिशा दाखवणारे असेल? असा सवाल पाठक यांनी परिषदेच्यावतीने उपस्थित केला आहे.

टॅग्स :marathiमराठीthaneठाणे