शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

भारत उद्योग कंपनीवरील नागरिकांच्या रोषामुळेच सुप्रीम कंपनीला मिळाले कंत्राट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 23:58 IST

नागरिकांना होत आहे त्रास। मुदत संपून अडीच वर्षे झाली तरी कामे आजही अपूर्णच

भिवंडी : भिवंडीतील चिंचोटी-अंजूरफाटा ते माणकोली असे रस्ता रुंदीकरणाचे व टोलवसुलीचे काम बीओटी तत्त्वावर भारत उद्योग लिमिटेड या कंपनीने सुरुवातीस घेतले होते. मात्र, या कंपनीने रस्ता बनविण्याच्या कामात हलगर्जीपणा केल्यामुळे व नागरिकांच्या रस्त्याच्या नादुरु स्तीबाबत भारत उद्योग कंपनीवरील वाढत्या रोषाने कंत्राट सुप्रीम कंपनीला दिले. सध्या सुप्रीम कंपनीमार्फत रस्त्याची देखभाल दुरु स्ती व टोलवसुली करण्यात येत आहे. भारत उद्योग लिमिटेड कंपनीने रस्ता रुंदीकरण कामाला २८ आॅगस्ट २००९ पासून सुरु वात केली होती. हे काम पूर्ण करण्यासाठी सरकारने कंपनीला दोन वर्षे सहा महिन्यांचा कालावधी दिला होता. परंतु, ही अडीच वर्षांची मुदत पूर्ण होऊनही कंपनीने रस्त्याची आवश्यक असलेली बरीचशी कामे आजपर्यंत अपूर्ण ठेवलेली आहेत.

विशेष म्हणजे कामे अपूर्ण असूनही या कंपनीने १९ जानेवारी २०१२ पासून मोठ्या प्रमाणात टोल वसूल करण्यास सुरुवात केली आहे. तर, २८ फेब्रुवारी २०१२ रोजी कंपनीची रस्ता बनविण्याची सरकारी मुदत संपली आहे. ही मुदत संपली असूनही कंपनीने अजूनही बरीचशी महत्त्वाची कामे अपूर्ण ठेवली आहेत. पावसाळ्यात पाण्याचा निचरा योग्यरीतीने व्हावा, याकरिता आवश्यक असलेले ड्रेनेज वर्क , रस्त्यामध्ये असलेले विजेचे खांब, दुभाजक, वृक्षारोपण, साइन बोर्ड, गार्ड स्टोन, काँक्रिटीकरण, डांबरीकरण आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या रस्त्यामध्ये असलेल्या खारबाव येथील कामवारी नदीच्या पुलाचे काम हे आजही अपूर्ण आहे. त्याचबरोबर माणकोली-अंजूरफाटा मार्गावर अजूनही दुभाजकही लावलेले नाहीत. त्यामुळे या मार्गावर वाहतूककोंडी व अपघात होतात.

अपूर्ण कामे असूनही या कंपनीने १९ जानेवारी २०१२ पासून मोठ्या प्रमाणात टोल वसूल करण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर या कंपनीला टोल वसूल करण्याचे कंत्राट तब्बल २४ वर्षे तीन महिन्यांसाठी देण्यात आले आहे. परंतु, टोलवसुली सुरू केल्यापासून या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे कंपनीने केलेल्या या कामाच्या गुणवत्तेबाबतही अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.एवढे होऊनही सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र कंपनीने केलेल्या कामाची गुणवत्ता योग्यच आहे व रस्त्याची ९८ टक्के कामे पूर्ण असल्याची खोटी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ कार्यालयास व राज्य सरकारला दिली. प्रशासन मात्र कंत्राटदाराविरोधात कुठलीची कारवाई करत नसल्याबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.अपघातात मृत पावलेल्यांना श्रद्धांजलीआंदोलनादरम्यान या महामार्गावरून प्रवास करताना अपघातात जीव गमावलेल्या मृत नागरिकांना आंदोलकांनी श्रद्धांजली वाहिली. तर, आंदोलनावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी भिवंडी तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. तब्बल दोन ते तीन तास चाललेल्या या रास्ता रोको आंदोलनामुळे या मार्गावर कोंडी झाली होती. चार ते पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका