शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मध्य रेल्वेची ठाणे ते सीएसएमटी दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद
2
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
3
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
4
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
5
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
6
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
7
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
8
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
9
'हिंदुस्तान झिदाबाद...' तिरंग्यासाठी लंडनमध्ये पाकिस्तानींशी भिडल्या भारतीय तरुणी, पाहा VIDEO
10
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
12
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
13
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
14
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
15
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
16
चिपळुणात वाशिष्ठी नदीने ओलांडली इशारा पातळी; पूरसदृश स्थितीमुळे कामाशिवाय घराबाहेर न पडण्याची सूचना
17
"२६ जुलैचा जलप्रलय, तुम्ही मला...", वीणा जामकरने सांगितली ज्योती चांदेकरांची भावुक आठवण
18
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
19
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
20
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी

आणीबाणीचे समर्थक हे देशातील लोकशाहीचे शत्रू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : इंदिरा गांधी सरकारविरोधातील जनआक्रोश दाबण्यासाठी, स्वतःची सत्ता टिकवण्यासाठी, न्यायालयापेक्षा आपण मोठे आहोत आणि देशापेक्षाही ...

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : इंदिरा गांधी सरकारविरोधातील जनआक्रोश दाबण्यासाठी, स्वतःची सत्ता टिकवण्यासाठी, न्यायालयापेक्षा आपण मोठे आहोत आणि देशापेक्षाही व्यक्ती आणि व्यक्तीची सत्ता मोठी या विचारांतून आणीबाणी लादली गेली. याकाळात प्रसारमाध्यमांची गळचेपी, दडपशाहीचे राजकारण झाले. सामाजिक संघटनांवरही बंदी घालण्यात आली. साडेचार लाख लोकांना अटक करण्यात आली, न्यायालयाचे पंख छाटण्यात आले. त्यामुळे २५ जून १९७५ला लादलेली आणीबाणी ही लोकशाहीसाठी काळी घटना असल्याचे मत आमदार पराग आळवणी यांनी व्यक्त केले.

भाजपतर्फे शुक्रवारी आणीबाणी काळा दिवस पाळण्यात आला. यानिमित्त कल्याण जिल्ह्यातर्फे शुक्रवारी झालेल्या ऑनलाइन कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. ते पुढे म्हणाले, जयप्रकाश नारायण, अटलबिहारी वाजपेयी, मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली आणीबाणी विरोधात आंदोलनाने राष्ट्रीय स्वरूप घेतले. देशभरात विद्यार्थी, युवक, महिला, कामगार असे विविध घटक आंदोलनात सहभागी झाल्याने जनक्षोभ वाढला. देशातील लोकांचा मूळ स्वभाव हा लोकशाही मानणारा आहे. परंतु, इंदिराजींनी लोकांचा विरोध दाबून टाकायचा निर्णय घेतला. रातोरात २७ संघटनांवर बंदी घातली. विरोधी पक्षांच्या नेत्यांपासून, कार्यकर्त्यांचे अटकसत्र चालू झाले. एक लाख ३० हजार मीसा कायदा लावून अटक केली तर तीन लाख लोकांना विविध कायद्याखाली अटक केली.

प्रदेश सरचिटणीस आमदार रवींद्र चव्हाण यांनीही कार्यक्रमाच्या निमित्ताने युवकांनी आणीबाणीचा काळ कसा होता याची माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन केले. या कार्यक्रमाचे संयोजक, भाजयुमो कल्याण जिल्हाध्यक्ष मिहीर देसाई यांनी प्रास्ताविक आणि आभारप्रदर्शन केले. भाजप कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, माजी आमदार नरेंद्र पवार, आमदार गणपत गायकवाड, प्रदेश आणि जिल्हा कार्यालयमंत्री आशिष पावसकर तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पेन्शन केली रद्द

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना आणीबाणी काळात तुरुंगवास भोगलेल्या महाराष्ट्रातील सर्वांना पेन्शन योजना लागू केली होती. परंतु, ठाकरे सरकारने ती योजना बंद केली. याचा आम्ही निषेध करतो, असे आळवणी यावेळी म्हणाले.

----------------