शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
3
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
4
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
5
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
6
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
7
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
8
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
9
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
10
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
11
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
12
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
13
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
14
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
15
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
16
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
17
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
18
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
19
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
20
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान

ठाणे-पालघरच्या १२८ शेतकरी वारसांना मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 02:11 IST

ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये शेतीकामे करताना झालेल्या दुर्दैवी घटनांमध्ये मागील आठ वर्षांत १२८ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाला आहे.

ठाणे : ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये शेतीकामे करताना झालेल्या दुर्दैवी घटनांमध्ये मागील आठ वर्षांत १२८ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. त्यांच्या वारसांना शेतकरी जनता अपघात विमा योजनेंतर्गत मदत देण्यात आली आहे. यामध्ये २०१४-१५ पर्यंत १०७ जणांना प्रत्येकी एक लाख तसेच २०१५-१६ मध्ये योजनेला गोपीनाथ मुंडे यांचे नाव देण्यात आले. २०१६-१७ पर्यंत जिल्ह्यातील २१ शेतक ºयांना प्रत्येकी दोन लाखांची मदतवाटप केल्याची माहिती जिल्हा कृषी विभागाने दिली.शेतात पाणी सोडण्यासाठी शेतकरी रात्रीच्यावेळी जात असतात. त्यावेळी अनेकदा अपघात होऊन त्यात त्यांचा मृत्यू अथवा गंभीर दुखापत होण्याच्या घटना घडतात. ही बाब लक्षात घेऊन शासनाने शेतकरी अपघात विमा योजना २००५-०६ पासून सुरू केली. त्यानंतर, २००९ पासून या योजनेचे नाव बदलून शेतकरी जनता अपघात विमा योजना केले होते. दरम्यान, २००९-१० पासून ते २०१४-१५ या कालावधीत ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील १३ तालुक्यांतील १०७ शेतकºयांच्या अपघातांसंदर्भात विविध प्रस्ताव मंजूर करण्यात आले. तसेच त्या वर्षीच्या योजनेनुसार त्यांच्या वारसांना प्रत्येकी एक लाखाची मदत सुपूर्द केली आहे.त्यानंतर, २०१५-१६ मध्ये या योजनेतील मदतही दुप्पट केली. अपघाती मृतांना मिळणारी मदत दोन लाख तर, जखमी होऊन एक अवयव निकामी झाल्यावर एक लाख किंवा दोन्ही अवयव निकामी झाल्यास दोन लाख अशी मदत देण्यास सुरु वात केली. त्यात गोपीनाथ मुंडे शेतकरी जनता अपघात विमा योजना लागू झाल्यानंतर २०१६-१७ आणि २०१७-१८ या दोन वर्षांत जिल्ह्यातील २१ शेतकºयांच्या वारसांना मदतीचे वाटप केले.