शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
2
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
3
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
4
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
5
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
6
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
7
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
8
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
11
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
12
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
13
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
14
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
15
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
16
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
17
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
18
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
19
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
20
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

जलजीवन मिशनद्वारे जिल्ह्यातील २७ हजार घरांना नळपाणी पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जिल्ह्यातील गावखेड्यांमधील रहिवाशांना मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने जलजीवन मिशन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : जिल्ह्यातील गावखेड्यांमधील रहिवाशांना मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने जलजीवन मिशन हाती घेतले आहे. या मिशनद्वारे जून महिन्यापर्यंत २७ हजारपेक्षा अधिक घरांना नळपाणीपुरवठा सुरू केल्याचा दावा जिल्हा परिषदेने केला आहे.

जिल्ह्यातील गावपाड्यांमधील ग्रामस्थ आजही नदी, नाला आणि विहिरीच्या पाण्याचा वापर करीत आहेत. या रहिवाशांना मुबलक व स्वच्छ, निर्मळ पाणी मिळवून देण्याचे नियोजन ठाणे जिल्हा परिषदेने केले आहे. यानुसार केंद्र शासनाचे जलजीवन मिशन हाती घेतले. त्याद्वारे लाखो रुपये खर्च करून जून महिन्यापर्यंत २७ हजार ४२० घरांना नळाद्वारे मुबलक, स्वच्छ पाणीपुरवठा करण्यात ठाणे जिल्हा परिषदेला यश मिळाले आहे. यापैकी डिसेंबर ते मार्चपर्यंत २४ हजार ७५९ घरांना आधी नळजोडणी देण्यात आली आहे.‌ याशिवाय एप्रिलपासून जूनअखेरपर्यंत दोन हजार ६६१ घरांना नळजोडण्या देण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे.

जिल्ह्यात राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाच्या माध्यमातून नळपाणीपुरवठा योजना हाती घेतल्या होत्या. याअंतर्गत दीर्घ काळापासून अपूर्ण राहिलेल्या ३९ योजना रखडल्या होत्या. यापैकी ३५ योजनांची कामे पूर्ण करण्यात आली. त्याद्वारे २७ हजार ४२० घरांमध्ये नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला आहे. जिल्ह्यात ‌ठिकठिकाणी अपूर्ण राहिलेल्या ३९ योजनांच्या कामांपैकी ३५ कामे पूर्ण करण्यात जिल्हा परिषदेला यश आले आहे. त्यामुळे यंदा जिल्ह्यातील २७ हजार ४२० ग्रामस्थांना नळाद्वारे पाणी पुरवठा करणे शक्य झाले आहे. यामुळे जिल्ह्यातील ६१ महसुली गावांना १०० टक्के नळजोडणी पूर्ण करण्यात आली आहे.

-----जोड आहे

‌‌