शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
6
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
7
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
8
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
9
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
10
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
11
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
12
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
13
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
14
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
15
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
16
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
17
Ladki Bahin Yojana: अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
18
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
19
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
20
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR

जलजीवन मिशनद्वारे जिल्ह्यातील २७ हजार घरांना नळपाणी पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जिल्ह्यातील गावखेड्यांमधील रहिवाशांना मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने जलजीवन मिशन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : जिल्ह्यातील गावखेड्यांमधील रहिवाशांना मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने जलजीवन मिशन हाती घेतले आहे. या मिशनद्वारे जून महिन्यापर्यंत २७ हजारपेक्षा अधिक घरांना नळपाणीपुरवठा सुरू केल्याचा दावा जिल्हा परिषदेने केला आहे.

जिल्ह्यातील गावपाड्यांमधील ग्रामस्थ आजही नदी, नाला आणि विहिरीच्या पाण्याचा वापर करीत आहेत. या रहिवाशांना मुबलक व स्वच्छ, निर्मळ पाणी मिळवून देण्याचे नियोजन ठाणे जिल्हा परिषदेने केले आहे. यानुसार केंद्र शासनाचे जलजीवन मिशन हाती घेतले. त्याद्वारे लाखो रुपये खर्च करून जून महिन्यापर्यंत २७ हजार ४२० घरांना नळाद्वारे मुबलक, स्वच्छ पाणीपुरवठा करण्यात ठाणे जिल्हा परिषदेला यश मिळाले आहे. यापैकी डिसेंबर ते मार्चपर्यंत २४ हजार ७५९ घरांना आधी नळजोडणी देण्यात आली आहे.‌ याशिवाय एप्रिलपासून जूनअखेरपर्यंत दोन हजार ६६१ घरांना नळजोडण्या देण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे.

जिल्ह्यात राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाच्या माध्यमातून नळपाणीपुरवठा योजना हाती घेतल्या होत्या. याअंतर्गत दीर्घ काळापासून अपूर्ण राहिलेल्या ३९ योजना रखडल्या होत्या. यापैकी ३५ योजनांची कामे पूर्ण करण्यात आली. त्याद्वारे २७ हजार ४२० घरांमध्ये नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला आहे. जिल्ह्यात ‌ठिकठिकाणी अपूर्ण राहिलेल्या ३९ योजनांच्या कामांपैकी ३५ कामे पूर्ण करण्यात जिल्हा परिषदेला यश आले आहे. त्यामुळे यंदा जिल्ह्यातील २७ हजार ४२० ग्रामस्थांना नळाद्वारे पाणी पुरवठा करणे शक्य झाले आहे. यामुळे जिल्ह्यातील ६१ महसुली गावांना १०० टक्के नळजोडणी पूर्ण करण्यात आली आहे.

-----जोड आहे

‌‌