शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
3
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
4
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
5
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
6
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
7
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
8
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
9
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
10
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
11
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
12
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
13
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
14
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
15
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
16
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
17
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
18
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
19
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
20
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...

अग्निशमनच्या विलंबामुळे रौद्ररूप, कंपनीमालकाचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 00:06 IST

कंपनीमालकाचा आरोप : आगीत १५० कोटींचे नुकसान, उत्पादन जपान येथे निर्यात होते

अनिकेत घमंडी

डोंबिवली : ‘मेट्रोपॉलिटन एक्झिमकेम’ या कंपनीला मंगळवारी लागलेली आग सुरुवातीला कमी होती. कंपनीतील आगप्रतिबंधक यंत्रणेद्वारे ही आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला. अग्निशमन दलाला याबाबत माहिती दिल्यानंतर पाऊ ण तासानंतर त्यांची पहिली गाडी घटनास्थळी पोहोचली. तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. त्यामुळे अग्निशमन दलाच्या विलंबामुळेच आग वाढल्याचा आरोप या कंपनीचे मालक राजीव सेठ यांनी बुधवारी केला.सेठ म्हणाले की, अग्निशमन दलाची पहिली गाडी आली. त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला; मात्र बंबातील पाणीच संपले. त्यामुळे त्यांना पाणी भरण्यासाठी जावे लागले. त्यानंतर दुसरी गाडी आली तरी यंत्रणा कामाला लागण्यासाठी सुमारे २५ मिनिटांचा अवधी लागला. त्यामुळेच आगीने रौद्र रूप धारण केले. कंपनीत सुमारे ५०० हून अधिक कामगार काम करतात. तीन पाळ्यांमध्ये काम चालत असून येथील उत्पादन जपान व इतर देशांमध्ये निर्यात केले जाते. २५ वर्षांहून अधिक जुन्या असलेल्या या कंपनीत सुरक्षाविषयक सर्व उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. या आगीमध्ये कंपनीचे सुमारे १५० कोटींचे नुकसान झाले.

स्टोअर रूममधील कच्चा माल, साधनसामग्री याबाबतचे रेकॉर्ड तपासण्याचे सध्या काम सुरू आहे. तसेच आगीमागचे कारणही शोधले जात आहे. त्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांतील चित्रीकरण तपासण्यात येणार आहे. त्यातून नेमके कारण उघड होऊ शकेल, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, कंपनीच्या स्टोअर विभागातील कामगाराने सांगितले की, कंपनीच्या विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. त्यासाठी वेल्डिंग सुरू होते. काही गडबड होऊ न ही आग लागली असावी, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. ‘लोकमत’ने आगीविषयी हाच अंदाज वर्तवण्यात आला होता.आगीची माहिती मिळताच पलावा, एमआयडीसी केंद्रातून अग्निशमनच्या गाड्या, कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले. तिथे पोहोचेपर्यंत आम्हाला जो वेळ लागला तोच. मात्र, अग्निशमनच्या विलंबामुळे आग वाढली, असे म्हणणे चुकीचे आहे. मी स्वत: घटनास्थळी उपस्थित होतो. आमचे अधिकारी, कर्मचारी आग विझवण्यासाठी झटत होते.- दिलीप गुंड, मुख्य अधिकारी, अग्निशमन दल, केडीएमसी