शहरं
Join us  
Trending Stories
1
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
2
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
3
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
4
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
5
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
6
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
7
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
8
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
9
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
10
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 
11
ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
12
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मद्य घोटाळ्यात ईडीची अटक; छत्तीसगडमध्ये चैतन्य बघेल यांना कोठडी
13
आव्हाड घुसले पोलिस कारखाली, ओढून काढावे लागले बाहेर
14
महाराष्ट्र, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल ; विशेष न्यायालय स्थापना प्रस्तावासाठी शेवटची संधी
15
ड्युक्स कंपनीने तपासणीसाठी कसोटी चेंडू परत मागितले; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चर्चेचा विषय
16
बीसीसीआय मालमाल झाली! ₹ ९,६४१ कोटींची केली रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई
17
भारतीय महिला संघ लॉर्ड्स वनडे जिंकण्यास सज्ज; इंग्लंडविरुद्ध दुसरा सामना आज
18
मुंबईची सारा जामसुतकर ठरली ‘चॅम्पियन’
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

अग्निशमनच्या विलंबामुळे रौद्ररूप, कंपनीमालकाचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 00:06 IST

कंपनीमालकाचा आरोप : आगीत १५० कोटींचे नुकसान, उत्पादन जपान येथे निर्यात होते

अनिकेत घमंडी

डोंबिवली : ‘मेट्रोपॉलिटन एक्झिमकेम’ या कंपनीला मंगळवारी लागलेली आग सुरुवातीला कमी होती. कंपनीतील आगप्रतिबंधक यंत्रणेद्वारे ही आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला. अग्निशमन दलाला याबाबत माहिती दिल्यानंतर पाऊ ण तासानंतर त्यांची पहिली गाडी घटनास्थळी पोहोचली. तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. त्यामुळे अग्निशमन दलाच्या विलंबामुळेच आग वाढल्याचा आरोप या कंपनीचे मालक राजीव सेठ यांनी बुधवारी केला.सेठ म्हणाले की, अग्निशमन दलाची पहिली गाडी आली. त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला; मात्र बंबातील पाणीच संपले. त्यामुळे त्यांना पाणी भरण्यासाठी जावे लागले. त्यानंतर दुसरी गाडी आली तरी यंत्रणा कामाला लागण्यासाठी सुमारे २५ मिनिटांचा अवधी लागला. त्यामुळेच आगीने रौद्र रूप धारण केले. कंपनीत सुमारे ५०० हून अधिक कामगार काम करतात. तीन पाळ्यांमध्ये काम चालत असून येथील उत्पादन जपान व इतर देशांमध्ये निर्यात केले जाते. २५ वर्षांहून अधिक जुन्या असलेल्या या कंपनीत सुरक्षाविषयक सर्व उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. या आगीमध्ये कंपनीचे सुमारे १५० कोटींचे नुकसान झाले.

स्टोअर रूममधील कच्चा माल, साधनसामग्री याबाबतचे रेकॉर्ड तपासण्याचे सध्या काम सुरू आहे. तसेच आगीमागचे कारणही शोधले जात आहे. त्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांतील चित्रीकरण तपासण्यात येणार आहे. त्यातून नेमके कारण उघड होऊ शकेल, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, कंपनीच्या स्टोअर विभागातील कामगाराने सांगितले की, कंपनीच्या विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. त्यासाठी वेल्डिंग सुरू होते. काही गडबड होऊ न ही आग लागली असावी, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. ‘लोकमत’ने आगीविषयी हाच अंदाज वर्तवण्यात आला होता.आगीची माहिती मिळताच पलावा, एमआयडीसी केंद्रातून अग्निशमनच्या गाड्या, कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले. तिथे पोहोचेपर्यंत आम्हाला जो वेळ लागला तोच. मात्र, अग्निशमनच्या विलंबामुळे आग वाढली, असे म्हणणे चुकीचे आहे. मी स्वत: घटनास्थळी उपस्थित होतो. आमचे अधिकारी, कर्मचारी आग विझवण्यासाठी झटत होते.- दिलीप गुंड, मुख्य अधिकारी, अग्निशमन दल, केडीएमसी