शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

साखरेचे भाव स्थिर; पण तीळ, गुळाचे दर वाढल्याने खरेदीवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2021 00:39 IST

महागाईमुळे संक्रांतीचा गोडवा यंदा कमी होणार ? गेल्या वर्षभरात कोरोनामुळे अनेक सण उत्सव साजरे करता आले नाही.

स्नेहा पावसकरलोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : कोरोनाची लोकांच्या मनातील भीती आता हळूहळू कमी होत आहे. त्यातच नवे वर्ष नव्या आशा, अपेक्षा घेऊन आले आहे. या नव्या वर्षाचा पहिला सण मकरसंक्रांत अगदी आठ दिवसांवर आला आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू झालेली नसली तरी गूळ, साखर, तीळ आणि अन्य वस्तू बाजारात विक्रीसाठी आल्या असून साखर वगळता इतर वस्तूंचे दर वाढलेले आहेत. त्यामुळे यंदा संक्रांतीचा गोडवा कमी होण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षभरात कोरोनामुळे अनेक सण उत्सव साजरे करता आले नाही. मात्र वर्षातला पहिला संक्रांतीचा सण अनेक जण साजरा करतात. महिलांना तर हळदी कुंकू आणि तीळगुळाची आवड. या तीळगुळाची बाजारात विक्री सुरू झाली असून त्याच्या दरातही वाढ झाली आहे. साखरेचे भाव गेल्या महिन्याइतके स्थिर असून तीळगुळाच्या दरामध्ये २० ते ४० रुपयांची वाढ झाली आहे.

तिळाचे दरतिळाचे प्रकार असतात. लाडू, चिक्कीसाठी पाॅलिशचा चांगला तीळ वापरला जातो. त्याचा दर २५०-२६० रुपये किलो आहे. साधे तीळ २०० - २१० रुपये किलो आहेत. गुळाचे दरगूळ साधारणपणे अनेक पदार्थांत वापरला जातो. गुळाच्या किमती मात्र गेल्या महिन्यापेक्षा वाढल्या आहेत. साधा गूळ सध्या ७० ते ८० रुपये किलो आहे. चिकीचा गूळ ८० ते १०० रुपये किलो आहे.साखरेचे भावसाखरेचे दर गेल्या महिन्याइतकेच स्थिर आहेत. सुदैवाने त्यात सध्या तरी वाढ झालेली नाही. किरकोळ दुकानातही ती ४० ते ४२ रुपये किलो आहे. त्यामुळे सक्रांतीत ग्राहकांना तेवढाच काय तो दिलासा म्हणावा लागेल.

मकरसंक्रांत म्हटली की तिळगुळाशिवाय कोणताच पदार्थ होत नाही. त्यामुळे तीळगूळ लागतोच. परंतु त्याचे वाढलेले दर पाहता यंदा सण जरा आवरता घ्यावा लागेल.-दिव्याक्षी मांडवकर, गृहिणी

साखरेचे भाव वगळता तीळगुळाचे दर वाढले आहेत. अजून महिलावर्गाकडून फारशी मागणी सुरु झालेली नाही. वाढते दर पाहता तीळगुळासाठी ग्राहक किती येतील, याची खात्री नाही.-देवीदास चाैहान, किराणा दुकानदार