शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूवर सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
2
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
3
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
4
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
5
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
6
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
7
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
8
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
9
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
10
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
11
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
12
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
13
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
14
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
15
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
16
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
17
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
18
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
19
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
20
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?

एसटी कर्मचाऱ्यांचे अचानक आंदोलन

By admin | Updated: February 11, 2017 05:08 IST

भिवंडीत रिक्षाचालकांकडून एसटीचालकाला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ शुक्रवारी ठाण्यात एसटीच्या कर्मचाऱ्यांनी अचानक कामबंद आंदोलन केले

ठाणे : भिवंडीत रिक्षाचालकांकडून एसटीचालकाला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ शुक्रवारी ठाण्यात एसटीच्या कर्मचाऱ्यांनी अचानक कामबंद आंदोलन केले. यामुळे ठाणे आगार-१ आणि २ येथून सुटणारी एकही एसटी बस रस्त्यावर न उतरल्याने एसटी आगार आणि खोपट डेपोत बस उभ्या होत्या. मात्र, इतर ठिकाणांहून येणाऱ्या गाड्या ठाण्यातून पुढे गेल्या असल्या तरी, आंदोलनाचा फटका ३८ ते ४० हजार प्रवाशांना बसला. एसटीचे सुमारे २० लाखांचे नुकसान झाल्याची माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली. ठाण्यात निवडणुकीचे वातावरण असल्याने अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी वेळीच धाव घेऊन आंंदोलनकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु, कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने ग्रामीण आणि शहरी भागांत धावणाऱ्या दिवसभराच्या शेड्युलमधील सुमारे १८० गाड्या रस्त्यावर उतरल्याच नाहीत. यामुळे प्रवाशांचे हाल झाले. तर, दुसरीकडे मारहाण करणाऱ्या मारेकरी रिक्षाचालकाला अटक करून त्याला फाशी द्यावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी लावून धरताना, इतरही मागण्यांचे निवेदन दिले.एसटी बस स्थानकावरील व रस्त्यांवरील रिक्षा आणि खाजगी चालक यांची अरेरावी आणि त्यातच भिवंडी येथे एसटीचालक आणि रिक्षाचालकाशी वाद झाल्याने भिवंडी आगाराचे प्रभाकर गायकवाड या चालकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे त्याचा परिणाम आगारातील एसटीचालकांच्या मानसिकतेवर होऊन कर्मचाऱ्यांनी बंद पुकारला. हा बंद अचानक पुकारल्याने प्रवाशांचे हाल झाले. सकाळच्या पहिल्या फेरीपासून एकही बस न सोडण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतला. त्यामुळे ठाणे आगार क्रमांक-१ आणि २ या शहरी आणि ग्रामीण भागांत धावणाऱ्या दिवसभरातील शेड्युलच्या सुमारे १९० बसेस रस्त्यावर न धावता तेथे उभ्या राहिल्या होत्या. (प्रतिनिधी) आगाराच्या मुख्य गेटपासून मुख्य रस्त्यापर्यंत, रस्त्याच्या कडेस दोन्ही बाजूंची खाजगी वाहने दूर करावीत. वंदना बस स्थानकात येणाऱ्या रिक्षांना प्रतिबंध करावा. वंदना आणि रेल्वे स्टेशन बस स्थानक, बोरीवली-भार्इंदर या ठिकाणी कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त मिळावा. संबंध नसताना चालकांना अपघात केसेसमध्ये गुंतवून कारवाई केली जाते. त्याची सखोल चौकशी करावी. भिवंडीत झालेल्या प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी. कर्मचाऱ्यांना सन्मानाने वागवावे आदी.या आगारांतून एकही बस धावली नाहीआगार क्रमांक-१ येथून सुटणाऱ्या बेळगाव, सातारा, जुन्नर, नगर, नाशिक, शिर्डी, ठाणे-पुणे, बागमांडळा, पिंपळोली आदी लांब मार्गांवरील बसेसप्रमाणे बोरीवली, भार्इंदर, तर आगार क्रमांक-२ येथून सुटणाऱ्या ठाणे-भिवंडी, पनवेल, मंत्रालय, कल्याण, विठ्ठलवाडी, वाडा, मुरबाड, शहापूर या मार्गांवर एकही बस धावली नाही.