शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

‘नागूबाई’च्या कुटुंबीयांना ‘बीएसयूपी’ची घरे, पालकमंत्री शिंदे यांच्या पाठपुराव्याला लाभले यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 05:28 IST

नागूबाई निवास या इमारतीमधील बेघर मध्यमवर्गीय कुटुंबांना बीएसयूपी प्रकल्पात बांधलेली व रिकामी असलेली घरे तात्पुरत्या स्वरूपात वापरण्यास देण्याकरिता राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने विशेष बाब म्हणून मंजुरी दिल्याने येथील ७२ कुटुंबांपैकी ४६ कुटुंबांना अखेर पाच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर निवारा लाभला.

डोंबिवली : नागूबाई निवास या इमारतीमधील बेघर मध्यमवर्गीय कुटुंबांना बीएसयूपी प्रकल्पात बांधलेली व रिकामी असलेली घरे तात्पुरत्या स्वरूपात वापरण्यास देण्याकरिता राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने विशेष बाब म्हणून मंजुरी दिल्याने येथील ७२ कुटुंबांपैकी ४६ कुटुंबांना अखेर पाच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर निवारा लाभला. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केलेली विनंती मान्य झाल्याने या कुटुंबांना घराच्या चाव्यांचे वाटप करताना शिंदे यांनी फडणवीस यांचे विशेष आभार व्यक्त केले.देवीचा चौक येथील इमारत शुक्रवारी रात्री खचली. तेव्हापासून ही कुटुंबे रस्त्यावर आली होती. त्यापैकी काही घरांत विवाहाची तयारी सुरू होती, तर कुणाच्या घरात परीक्षार्थी विद्यार्थी होते. त्यामुळे या कुटुंबीयांनी घराकरिता आर्जवं केली होती. बीएसयूपी योजनेतील घरे या कुटुंबांना देण्याकरिता महापौर राजेंद्र देवळेकर व शिवसेनेचे नेते आग्रही होते. मात्र, केडीएमसीचे आयुक्त वेलरासू व अन्य अधिकारी यांनी नियमानुसार ही घरे मोडकळीस आलेल्या इमारतींमधील रहिवाशांना देता येत नाहीत, या नियमावर बोट ठेवले होते. यामुळे सत्ताधारी व प्रशासन यांच्यात तणाव निर्माण झाला होता. ‘लोकमत’ने या रहिवाशांची व्यथा व तणाव याबाबत सातत्याने वार्तांकन केले होते.अखेर, पालकमंत्री शिंदे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन विशेष बाब म्हणून ही घरे नागूबाईच्या रहिवाशांना देण्याची परवानगी मिळवली. घरांकरिता अर्ज केलेल्या ४६ कुटुंबांना कचोरे येथील निवासनगरमध्ये तात्पुरता निवारा मिळाला. शिंदे यांनी घरांच्या चाव्या रहिवाशांना सुपूर्द केल्या. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे बेघर झालेल्या नागरिकांना निवारा देणे शक्य झाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो, असे ते म्हणाले. रहिवाशांनी फडणवीस आणि शिंदे आगे बढो... असा नारा दिला.घरांचा ताबा देताना घर, परिसर स्वच्छ ठेवा. घाण करू नका, असे आवाहन शिंदे यांनी केले. हा निवारा तात्पुरता असून नागूबाई निवासचे मालक भरत जोशी यांनी तातडीने इमारत उभी करावी. मूळ भाडेकरूंना घरे द्यावी, असे शिंदे यांनी बजावले. महापौर देवळेकर, सभागृह नेते मोरे याकरिता पाठपुरावा करतील, असेही ते म्हणाले. बीएसयूपीची घरे ही तात्पुरती मलमपट्टी असून क्लस्टर डेव्हलपमेंट हाच मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाचा दूरगामी मार्ग असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.असा सुटला तिढादोन दिवसांपासून शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांकडे त्या रहिवाशांना आधार मिळावा, यासाठी पाठपुरावा सुरू ठेवला होता.बुधवारी सकाळी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव संजीवकुमार यांनी बीएसयूपीतील घरे तात्पुरत्या स्वरूपात विशेष बाब म्हणून देण्यास मुख्यमंत्र्यांनी होकार दिल्याचे शिंदे यांना कळवल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.घरांकरिता मंगळवारी रात्रीपर्यंत ४६ कुटुंबांनी अर्ज केले होते. घरे मिळत असल्याचे दिसल्यावर आणखी १५ कुटुबांनी बुधवारी अर्ज केले. त्यांनाही घरे दिली जाणार आहेत.इमारत खचल्यापासून रहिवाशांना घरे मिळेपर्यंत ‘लोकमत’ने सातत्याने पाठपुरावा केल्याबद्दल नागूबाईच्या रहिवाशांनी आभार व्यक्त केले. ‘लोकमत’ची भूमिका महत्त्वाची होती. अन्यथा, पर्यायी निवारा मिळण्यासाठी अडथळे आले असते, असे मत संजय पवार, प्रसाद भानुशाली, चिंतामणी शिदोरे, राशन सावला, संतोष गिट्टे आदींनी व्यक्त केले. महापौर देवळेकर यांनीही लोकमत’चा पाठपुरावा महत्त्वाचा असल्याचे नमूद केले.दरम्यान, कचोºयात चावीवाटपाचा कार्यक्रम सुरू असतानाच धोकादायक नागूबाई निवासचा बहुतांश भाग पाडण्यात आला. गुरुवारी सकाळपर्यंत इमारत पूर्ण पाडण्यात येणार असल्याचे ‘ह’ प्रभाग अधिकारी अरुण वानखेडे यांनी सांगितले.

टॅग्स :dombivaliडोंबिवली