शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णवी मृत्यु प्रकरण : 'कार, दोन पिस्तूल, चांदीची भांडी...' हगवणेंच्या घरून पोलिसांनी जप्त केलं घबाड
2
'...तर कमी लोक मेले असते', पहलगाममध्ये कुंकू पुसलं गेलेल्या महिलांबद्दल भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान
3
केरळजवळच्या समुद्रात बुडतंय परदेशी जहाज, तटरक्षक दलाने ९ जणांना वाचवले 
4
Mahayuti: छगन भुजबळ यांना काटशह देण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून नरेंद्र दराडे, राजकारण काय?
5
"ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’, बावनकुळेंची राहुल गांधींवर बोचरी टीका  
6
"मला बऱ्याच दिवसांपासून हे सांगायचं होतं की, मी अनुष्कासोबत रिलेशनशिपमध्ये'; तेज प्रताप यादवांनी दिली प्रेमाची कबुली
7
Sai Sudharsan: भारतीय संघात निवड झाल्यानंतर साई सुदर्शनची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
8
Crime: लग्न मोडल्याच्या रागातून दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या, घरात घुसून चिरला गळा
9
Karun Nair : रोहित-विराटच्या टेस्ट निवृत्तीनंतर आठवला 'त्रिशतकवीर'! आठ वर्षांनी कमबॅकची संधी
10
'धनंजय मुंडेंना क्लीनचिट मिळाली तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन', मंत्री होताच छगन भुजबळांचे मोठे विधान
11
बंदूक नाही पण निलेश चव्हाणचा लॅपटॉप पोलिसांच्या हाती, आत सापडले… 
12
Mohammed Shami: इंग्लंड दौऱ्यासाठी मोहम्मद शमीची निवड का झाली नाही? अजित आगरकर म्हणाले...
13
मोठी अपडेट : वैष्णवी हगवणे प्रकरणात निलेश चव्हाण सहआरोपी, पोलिसांच्या हाती लागण्याची प्रतिक्षा कायम
14
टीम इंडियातील 'प्रिन्स'च्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ; गंभीर-गिल जोडीसह कसोटीत नवे पर्व
15
एक कोटी ८४ लाखांचे प्रकरण दाबवण्यासाठी गृह खात्याचे गुप्त आदेश; अनिल गोटेंचा आरोप
16
सिंधमध्ये पाकिस्तान सरकारला विरोध तीव्र, बेनझीर भुत्तोंच्या लेकीच्या ताफ्याला घेराव, लाठ्या काठ्यांनी हल्ला   
17
IND vs ENG : इंग्लंड दौऱ्यासाठी कठोर मेहनत; १० किलो वजनही कमी केलं! पण... सरफराजला ते प्रकरण भोवलं?
18
धक्कादायक! ४० हजारांसाठी देशाशी गद्दारी; गुजरातच्या कच्छमधून पाकिस्तानी गुप्तहेराला अटक
19
फायद्याची गोष्ट! रिकाम्या औषधांच्या रॅपरचा मोठा उपयोग; गृहिणी करतात किचनमध्ये क्रिएटिव्ह वापर
20
इंटरनेटची सुविधा नाही, फोनही लागत नाही; भुयारी मेट्रोचा प्रवास ठरतोय त्रासदायक!

‘त्या’ कारखानदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 01:18 IST

एमआयडीसीतील प्रोबेस कंपनीत २६ मे २०१६ ला झालेल्या स्फोटाने डोंबिवली हादरली होती.

डोंबिवली : एमआयडीसीतील प्रोबेस कंपनीत २६ मे २०१६ ला झालेल्या स्फोटाने डोंबिवली हादरली होती. तसेच चार वर्षांपूर्वी याच परिसरात झालेला हिरवा पाऊस चांगलाच गाजला होता. दोन दिवसांपूर्वीच रसायनांच्या उग्रवासाने येथील रहिवाशांना त्रास झाला होता. या परिसरात भोपाळसारखी दुर्घटना आणि प्रदूषणापासून डोंबिवलीला वाचवण्यासाठी केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणाऱ्या कारखान्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी ज्येष्ठ शिवसैनिक प्रफुल देशमुख यांनी केली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाला केलेल्या पत्रव्यवहाराचीही दखल घेतली नसल्याचे त्यांनी सांगितले.केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन व हवामानबदल मंत्रालयाची औद्योगिक प्रदूषणाबाबत काही मार्गदर्शक तत्त्वे आहेत. याबाबत १ जानेवारी २०१५ ला एक मार्गदर्शक पत्रिका केंद्रातर्फे प्रसारित करण्यात आली. यामध्ये कारखान्यांनी घ्यायची सर्वप्रकारच्या खबरदारी व उपाययोजनांची माहिती नमूद केली आहे. त्यात रासायनिक अपघात (नियोजन आणि सज्जता) नियम १९९६ नुसार केंद्र, राज्य, जिल्हा व स्थानिक अशा चार स्तरावर उपाययोजना करणारी यंत्रणा उभारण्याची सक्ती करण्यात आली आहे. सर्व उपाययोजनांच्या देखरेखीसाठी राज्य, जिल्हा तसेच विभागीय स्तरावर समिती स्थापन करण्याचे आदेशही दिलेले आहेत. मात्र या उपाययोजनांकडे दुर्लक्ष होत असून त्याचा त्रास रहिवाशांना सहन करावा लागत आहे, अशी नाराजी देशमुख यांनी व्यक्त केली.>परिपत्रकात सूचवलेल्या उपाययोजनाज्या कारखान्यातून धोकादायक रसायने हाताळली जातात, त्यांची विभागवार यादी प्रसिद्धी माध्यमांद्वारे नागरिकांना अवगत करून द्यावी. तसेच या कारखान्यांची मासिक चाचणी करून सर्व मार्गदर्शक तत्त्वांची उपाययोजना केली आहे का, याची पाहणी करावी. दर सहा महिन्यांत धोकादायक कारखान्यांत विभागवार मॉक ड्रील म्हणजेच आपत्कालीन यंत्रणेचे प्रात्यक्षिक घेणेही आवश्यक आहे. या विभागासाठी आपत्कालीन सेवा आवश्यक आहे, असे केंद्राच्या परिपत्रकात म्हटले आहे.