शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
2
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
3
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
4
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
5
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
6
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
7
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
8
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
9
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
10
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
11
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
12
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
13
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
14
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
15
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
16
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
17
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
19
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
20
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?

‘त्या’ कारखानदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 01:18 IST

एमआयडीसीतील प्रोबेस कंपनीत २६ मे २०१६ ला झालेल्या स्फोटाने डोंबिवली हादरली होती.

डोंबिवली : एमआयडीसीतील प्रोबेस कंपनीत २६ मे २०१६ ला झालेल्या स्फोटाने डोंबिवली हादरली होती. तसेच चार वर्षांपूर्वी याच परिसरात झालेला हिरवा पाऊस चांगलाच गाजला होता. दोन दिवसांपूर्वीच रसायनांच्या उग्रवासाने येथील रहिवाशांना त्रास झाला होता. या परिसरात भोपाळसारखी दुर्घटना आणि प्रदूषणापासून डोंबिवलीला वाचवण्यासाठी केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणाऱ्या कारखान्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी ज्येष्ठ शिवसैनिक प्रफुल देशमुख यांनी केली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाला केलेल्या पत्रव्यवहाराचीही दखल घेतली नसल्याचे त्यांनी सांगितले.केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन व हवामानबदल मंत्रालयाची औद्योगिक प्रदूषणाबाबत काही मार्गदर्शक तत्त्वे आहेत. याबाबत १ जानेवारी २०१५ ला एक मार्गदर्शक पत्रिका केंद्रातर्फे प्रसारित करण्यात आली. यामध्ये कारखान्यांनी घ्यायची सर्वप्रकारच्या खबरदारी व उपाययोजनांची माहिती नमूद केली आहे. त्यात रासायनिक अपघात (नियोजन आणि सज्जता) नियम १९९६ नुसार केंद्र, राज्य, जिल्हा व स्थानिक अशा चार स्तरावर उपाययोजना करणारी यंत्रणा उभारण्याची सक्ती करण्यात आली आहे. सर्व उपाययोजनांच्या देखरेखीसाठी राज्य, जिल्हा तसेच विभागीय स्तरावर समिती स्थापन करण्याचे आदेशही दिलेले आहेत. मात्र या उपाययोजनांकडे दुर्लक्ष होत असून त्याचा त्रास रहिवाशांना सहन करावा लागत आहे, अशी नाराजी देशमुख यांनी व्यक्त केली.>परिपत्रकात सूचवलेल्या उपाययोजनाज्या कारखान्यातून धोकादायक रसायने हाताळली जातात, त्यांची विभागवार यादी प्रसिद्धी माध्यमांद्वारे नागरिकांना अवगत करून द्यावी. तसेच या कारखान्यांची मासिक चाचणी करून सर्व मार्गदर्शक तत्त्वांची उपाययोजना केली आहे का, याची पाहणी करावी. दर सहा महिन्यांत धोकादायक कारखान्यांत विभागवार मॉक ड्रील म्हणजेच आपत्कालीन यंत्रणेचे प्रात्यक्षिक घेणेही आवश्यक आहे. या विभागासाठी आपत्कालीन सेवा आवश्यक आहे, असे केंद्राच्या परिपत्रकात म्हटले आहे.