शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

शिळफाटा जंक्शन येथे उड्डाणपूल उभारण्याची सुभाष भोईर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 16:58 IST

कल्याणफाटा व शिळफाटा जंक्शन येथील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आज नागपूर अधिवेशनात माजी आमदार सुभाष भोईर यांनी शिळफाटा जंक्शन येथे उड्डाणपूल उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. 

डोंबिवली - जुना मुंबई ते पुणे रोड म्हणून ओळखला जाणारा मुंब्रा बायपास, तसेच शिळ महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी होत असते. या महामार्गावरील कल्याणफाटा व शिळफाटा जंक्शन येथील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आज नागपूर अधिवेशनात माजी आमदार सुभाष भोईर यांनी शिळफाटा जंक्शन येथे उड्डाणपूल उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. या महामार्गावरून जे.एन.पी.टी. बंदरातून दररोज सुमारे वीस ते पंचवीस हजार कंटेनर, अवजड वाहने  नाशिक, गुजरात तसेच इतर राज्यांमध्ये येत- जात असल्यामुळे वाहतूक कोंडीचा अत्यंत त्रास सहन करावा लागतो.  दक्षिणेकडून उत्तरेकडे जाणारा हा एकमेव महामार्ग आहे. या महामार्गावर अपघात झाल्यास अनेक वेळा या माहामार्गावर तासंतास वाहने उभी करून वाहन चालकांना तसेच प्रवाशांना रस्त्यात अडकून पडावे लागते त्यामुळे छोट्या वाहनांना जीव धोक्यात घालून वाहने चालवावी लागतात. तसेच वाहतूक कोंडीचा त्रास नोकरदार, व्यावसायिक तसेच वाहन चालकांना होत आहे.याच महामार्गावरून नवी मुंबईकडे लहान मोठी व अवजड वाहने सतत ये- जा करीत असतात. सद्य स्थितीत  नवीमुंबईकडे जाण्यासाठी शिळ- म्हापे हा एकमेव रस्ता असून या रस्त्यावर नेहमी वाहतूक कोंडी होत असते त्यामुळे प्रवाशांनाफारचत्रास सहन करावा लागतो. या महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मुंब्रा वाय जंक्शन येथे व कल्याण फाटा जंक्शन येथे उड्डाणपुलाचे काम हाती घेतले आहे. त्याचप्रमाणे एमएमआरडीएमार्फत ऐरोली काटई या भुयारी मार्ग व रस्त्याचे बांधकाम सुरु आहे. याकरिता शिळफाटा येथे उड्डाणपुल उभारल्यास मुंब्रा बायपास जंक्शन ते कल्याणफाटा जंक्शन या दरम्यान अवजड वाहतूक सुरळीत होवून ती उड्डाणपुलामार्गे निघून जाईल व या संपूर्ण परिसरात राहणाऱ्या लोकांकरिता खालील सेवारस्ते वाहतुकीस मोकळे होतील व या संपूर्ण परिसरातील वाहतुकीची कोंडी सुटणार आहे. त्यामुळे शिळ फाटा येथे उड्डाणपूल उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून काम सुरु करण्याची मागणी भोईर यांनी पत्राद्वारे केली आहे.  भारत गिअर्स ते एरोली भुयारी मार्गास गती द्यावी  जुना मुंबई - पुणे महामार्गावरून नवी मुंबईकडे लहान मोठी व अवजड वाहने सतत ये- जा करीत असतात. सद्य स्थितीत  नवी मुंबईकडे जाण्यासाठी शिळ- म्हापे हा एकमेव रस्ता असून या रस्त्यावर नेहमी वाहतूक कोंडी होत असते त्यामुळे प्रवाशांना फारच त्रास सहन करावा लागतो. त्याकरिता नवी मुंबई व मुंबईला जोडणाऱ्या सर्वात जवळचा रस्ता तयार करण्यासाठी एमएमआरडीए ने प्रस्तावित केलेला भारत गिअर्स ते एरोली भुयारी मार्ग तयार करण्याचे काम सुरु आहे त्यासाठी एमएमआरडीए मार्फत २३७ कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. मात्र सदरचे काम संथ गतीने होत असल्यामुळे निर्धारित वेळेत भुयारी मार्ग पूर्ण होणार नाही. याकरिता भारत गियर्स ते ऐरोली भुयारी मार्गास गती देण्याची मागणी भोईर यांनी ठाकरे यांच्याकडे केली.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकkalyanकल्याण