शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
2
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
3
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
4
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
5
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
6
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
7
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
8
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
9
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
10
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
11
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
12
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
13
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
14
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
15
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
16
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
17
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
18
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
19
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
20
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल

विद्यार्थी तणावात, पालक चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : एकीकडे कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने पुन्हा काही शहरे लाॅकडाऊनच्या तयारीत आहेत. मात्र, अशातच दहावी-बारावीच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : एकीकडे कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने पुन्हा काही शहरे लाॅकडाऊनच्या तयारीत आहेत. मात्र, अशातच दहावी-बारावीच्या परीक्षा प्रत्यक्ष केंद्रावरच होणार असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केल्याने बहुतांश परीक्षार्थी विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आधीच वर्षभर प्रत्यक्ष शाळा नसल्याने अभ्यासाची नसलेली लिंक, परीक्षेबाबतचा गोंधळ आणि आता परीक्षेसाठी बाहेर पडताना कोरोनाची धास्ती या सगळ्यांमुळे विद्यार्थी तणावात आहेत.

कोरोनाचा संसर्ग काहीसा कमी झाला म्हणून मागील महिन्यापासून शासनाने ९ वी ते १२ वीच्या प्रत्यक्ष शाळा सुरू केल्या. त्यानंतर ५ वी ते ८ वीच्या शाळाही काही जिल्ह्यांत सुरू करण्यात आल्या. मात्र, गेल्या आठवडाभरापासून राज्यात पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पुन्हा काही जिल्ह्यांत शाळा ६ मार्चपर्यंत बंद केल्या आहेत. ग्रामीण ठाणे जिल्ह्यात सुरू झालेल्या शाळा पुन्हा पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी आढावा बैठकीत दिले. मात्र आता त्यातच दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाइन घेण्याच्या शासनाच्या निर्णयाने विद्यार्थ्यांसह पालक संभ्रमित झाले आहेत.

--------

एकीकडे कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे सर्वांनाच घरात थांबायचे आवाहन केले जात आहे. मग दहावीच्या परीक्षा ऑफलाइन घेऊन विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी का खेळत आहेत?

- दिनकर पेडणे, पालक

---------

दहावीच्या परीक्षा ऑफलाइन घेण्याचा निर्णय हा सरकारच्या दृष्टीने योग्य असेल, पण मग विद्यार्थ्यांना संपर्कातून काही त्रास झाला तर ते फारच धोकादायक ठरेल.

- मनोहर राजुर, पालक

-------

आतापर्यंत वर्षभरात अभ्यास जसा ऑनलाइन झाला किंवा इतर काही इयत्तांच्या, शाखांच्या परीक्षा ऑनलाइन झाल्या तसेच दहावीच्या परीक्षाही ऑनलाइन घेणे शक्य आहे का, हे शासनाने आधी एकदा पडताळून पाहून नंतरच निर्णय घेतला असता तर बरे झाले असते.

- हिमानी सवाखंडे, पालक

------

बारावीच्या ऑफलाइन परीक्षा घेण्याचा निर्णय तसा चुकीचा नाही. मात्र, कोरोनाचे वाढते संकट पाहता त्याला पर्याय काही असेल का, हे पाहायला हवे.

- माधव जिनकर, पालक

------

दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाइन घेऊन विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात टाकणे चुकीचे आहे. विद्यार्थ्यांना शासनाने परीक्षेबाबत काही अंशी सवलत द्यायला हवी होती.

- विद्या रहाटे, पालक

---------

कोरोनाची रुग्णसंख्या परत वाढते आहे. परीक्षा एप्रिल मे महिन्यात आहे. तोपर्यंत काय स्थिती असेल माहीत नाही. मात्र, अशा धोकादायक स्थितीत मुलांना परीक्षेसाठी घराबाहेर पाठवणे तरी धोक्याचे वाटते. येत्या महिनाभरात कोरोना रुग्णसंख्या कमी होईल अशी अपेक्षा आहे.

- मंजुळा रेळे, पालक