शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

विद्यार्थ्यांनी उद्याचं राजकारण ताब्यात घ्यावं !

By admin | Updated: September 15, 2015 23:12 IST

समोर विद्यार्थी बसलेले असल्यामुळे मी राजकारणावर काही बोलणार नाही, पण तुम्ही खूप मोठे व्हा आणि राजकारण ताब्यात घ्या, असं आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

डोंबिवली : समोर विद्यार्थी बसलेले असल्यामुळे मी राजकारणावर काही बोलणार नाही, पण तुम्ही खूप मोठे व्हा आणि राजकारण ताब्यात घ्या, असं आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी येथे केले. कल्याण-डोंबिवलीतील विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्याअंतर्गत सावित्रीबाई फुले नाट्यगृहात झालेल्या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी डोंबिवलीतील शाळांमधील आठवीच्या विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्याचे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. ते पूर्ण करण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेने आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना टॅब वाटपाचा उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे. त्याअंतर्गत मंगळवारी हे वाटप करण्यात आले. कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने २५ रुग्णवाहिकांचे लोकार्पणही याप्रसंगी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हा बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला मंत्र शिवसैनिकांनी आजही प्राणपणाने जपला आहे, असे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रसंगी सांगितले. शिवसेनेचे समाजकार्य शाखांच्या माध्यमातून २४ तास सुरू असते, असेही ते म्हणाले.महाराष्ट्राच्या भावी विकासाचे ग्रोथ इंजिन म्हणून ओळखल्या जाणा-या कल्याण आणि डोंबिवली या शहरांमध्ये मंगळवारी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रमुख प्रकल्पांचे लोकार्पण व भूमिपूजन झाले. त्यात अग्निशमन दलात नव्याने दाखल झालेल्या जपानी बनावटीच्या अत्याधुनिक ५५ मीटर उंच शिडी असलेले अग्निशमन वाहन, आधारवाडी येथील सिव्हरेज ट्रीटमेंट प्लांट (एसटीपी), कल्याण स्पोर्ट्स क्लब येथील जलतरण तलाव, बैलबाजार येथे माजी कामगार मंत्री साबिरभाई शेख उद्यान, चिकणघर येथील उद्यान, डोंबिवली पूर्व येथील सार्वजनिक ग्रंथालयाची नवीन इमारत आदींचे लोकार्पण करण्यात आले. भाजपासह आयुक्तांनी फिरवली पाठ : या सर्व उपक्रमांना भाजपासह केडीएमसीच्या आयुक्तांनी अनुपस्थित होते. कल्याणच्या जलतरण तलावात पाणी कुठुन आले, महाराष्ट्रात दुष्काळ असतांना शिवसेना हे काय करत आहे. आगामी काळातील निवडणुकांमध्ये मतदार हे सर्व लक्षात ठेवतील असे, आमदार नरेंद्र पवार म्हणाले.