शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

सरस्वती छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी केली तांदळाची लावणी

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: July 21, 2024 17:13 IST

'लावणी ते कापणी' या शैक्षणिक उपक्रमाचा शुभारंभ

ठाणे: गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर, "निसर्ग माझा गुरू" या संकल्पनेखाली, ठाण्यातील येऊर येथील निसर्गरम्य परीसरात विद्यार्थ्यांना भात लावणीचे प्रशिक्षण देण्यात आले. हे प्रशिक्षण नौपाडा येथील सुप्रसिद्ध सरस्वती विद्या मंदिर शाळेतर्फे आयोजित करण्यात आले होते. या उपक्रमात सरस्वती छात्र सेनेचे ५० विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांना अनुभवी शेतकऱ्यांनी भात लावणीची योग्य तंत्रे शिकवली. विद्यार्थ्यांनी उत्सुकतेने आणि आनंदाने भात रोपांची रोपणी केली.

स्वातंत्र्य सैनिक दत्ताजी ताम्हणे यांनी स्थापन केलेल्या येऊर येथील अनंताश्रम संस्थेच्या आवारातील शेतात, सरस्वती मंदिरच्या छात्र सनिकानी अनोखी पद्धतीने गुरू पौर्णिमा संपन्न केली. अनंताश्रम संस्थेचे चालक लाड त्यांच्या सहकार्याने हा उपक्रम आयोजित केला गेला होता. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना भात लावणीचे प्रशिक्षण दिले. या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना निसर्गाशी जोडणे आणि त्यांना कृषी क्षेत्राबद्दल जागरूक करणे हा होता. यातून विद्यार्थ्यांना शेतीबद्दल ज्ञान, अन्नधान्याची किंमत आणि शेतकऱ्यांच्या कष्टाचे महत्त्व समजून घेण्यास मदत झाली.कार्यक्रमाच्या समारोपाच्या वेळी, संस्थेचे कार्यकारी विश्वस्त. सुरेंद्र दिघे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. त्यांनी विद्यार्थ्यांना निसर्गाचे रक्षण करण्याचे आणि कृषी क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमाला शाळेच्या माजी विद्यार्थिनी तसेच कृषी शास्त्रात सुवर्णपदक विजेत्या सीमा हर्डीकर यांनी विद्यार्थ्यांना भात लावणीचे योग्य मार्गदर्शन केले. या उपक्रमात शाळेचे माजी विद्यार्थी तसेच येऊर एंव्हायर्नमेंटल सोसायटीचे अध्यक्ष रोहित जोशी उपस्थित होते. अनंताश्रमाचे कर्मचारी संकेत आणि सूरज यांनी या उपक्रमास सक्रिय सहकार्य केले. "निसर्ग माझा गुरू" या संकल्पनेखाली आयोजित केलेल्या या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना निसर्गाशी जोडण्यास आणि त्यांना कृषी क्षेत्राबद्दल जागरूक करण्यास मदत झाली. भविष्यात नवीन शिक्क्षण धोरणास अंतर्गत कौशल्य विकसित अभ्यासक्रमा साठी ठाण्यातील शालेय विद्यार्थ्यांना शेतकी कौशल्य विकसित करण्यास संधी मिळेल. या कार्यक्रमाचा विद्यार्थ्यांवर सकारात्मक परिणाम होईल आणि ते भविष्यात निसर्गाशी जोडले गेलेले सक्षम नागरिक बनतील अशी अपेक्षा आहे. असे दिघे यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणे