शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

सरस्वती छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी केली तांदळाची लावणी

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: July 21, 2024 17:13 IST

'लावणी ते कापणी' या शैक्षणिक उपक्रमाचा शुभारंभ

ठाणे: गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर, "निसर्ग माझा गुरू" या संकल्पनेखाली, ठाण्यातील येऊर येथील निसर्गरम्य परीसरात विद्यार्थ्यांना भात लावणीचे प्रशिक्षण देण्यात आले. हे प्रशिक्षण नौपाडा येथील सुप्रसिद्ध सरस्वती विद्या मंदिर शाळेतर्फे आयोजित करण्यात आले होते. या उपक्रमात सरस्वती छात्र सेनेचे ५० विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांना अनुभवी शेतकऱ्यांनी भात लावणीची योग्य तंत्रे शिकवली. विद्यार्थ्यांनी उत्सुकतेने आणि आनंदाने भात रोपांची रोपणी केली.

स्वातंत्र्य सैनिक दत्ताजी ताम्हणे यांनी स्थापन केलेल्या येऊर येथील अनंताश्रम संस्थेच्या आवारातील शेतात, सरस्वती मंदिरच्या छात्र सनिकानी अनोखी पद्धतीने गुरू पौर्णिमा संपन्न केली. अनंताश्रम संस्थेचे चालक लाड त्यांच्या सहकार्याने हा उपक्रम आयोजित केला गेला होता. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना भात लावणीचे प्रशिक्षण दिले. या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना निसर्गाशी जोडणे आणि त्यांना कृषी क्षेत्राबद्दल जागरूक करणे हा होता. यातून विद्यार्थ्यांना शेतीबद्दल ज्ञान, अन्नधान्याची किंमत आणि शेतकऱ्यांच्या कष्टाचे महत्त्व समजून घेण्यास मदत झाली.कार्यक्रमाच्या समारोपाच्या वेळी, संस्थेचे कार्यकारी विश्वस्त. सुरेंद्र दिघे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. त्यांनी विद्यार्थ्यांना निसर्गाचे रक्षण करण्याचे आणि कृषी क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमाला शाळेच्या माजी विद्यार्थिनी तसेच कृषी शास्त्रात सुवर्णपदक विजेत्या सीमा हर्डीकर यांनी विद्यार्थ्यांना भात लावणीचे योग्य मार्गदर्शन केले. या उपक्रमात शाळेचे माजी विद्यार्थी तसेच येऊर एंव्हायर्नमेंटल सोसायटीचे अध्यक्ष रोहित जोशी उपस्थित होते. अनंताश्रमाचे कर्मचारी संकेत आणि सूरज यांनी या उपक्रमास सक्रिय सहकार्य केले. "निसर्ग माझा गुरू" या संकल्पनेखाली आयोजित केलेल्या या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना निसर्गाशी जोडण्यास आणि त्यांना कृषी क्षेत्राबद्दल जागरूक करण्यास मदत झाली. भविष्यात नवीन शिक्क्षण धोरणास अंतर्गत कौशल्य विकसित अभ्यासक्रमा साठी ठाण्यातील शालेय विद्यार्थ्यांना शेतकी कौशल्य विकसित करण्यास संधी मिळेल. या कार्यक्रमाचा विद्यार्थ्यांवर सकारात्मक परिणाम होईल आणि ते भविष्यात निसर्गाशी जोडले गेलेले सक्षम नागरिक बनतील अशी अपेक्षा आहे. असे दिघे यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणे