शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
3
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
4
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
5
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
6
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
7
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
8
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
9
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
10
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
11
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
12
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
13
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
14
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
16
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
17
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
18
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
19
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
20
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."

उल्हासनगरमध्ये पालिका विद्यार्थ्यांचे सुरू आहे गळक्या वर्गांत शिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 00:19 IST

शिक्षण मंडळाचा सावळागोंधळ। नवी इमारत ताब्यात घेण्याचे आयुक्तांचे आदेश

- सदानंद नाईकउल्हासनगर : महापालिका शाळा क्रमांक ८ व २९ मधील शेकडो मुले नवीन इमारतीऐवजी जुन्या गळक्या व धोकादायक शाळेत जीव धोक्यात घालून धडे गिरवत आहेत. या प्रकाराने पालकांनी संताप व्यक्त केला असून नवीन इमारत ताब्यात घेण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत. तर, इमारत बांधकामाचे बिल न दिल्याने हस्तांतर रेंगाळल्याचे बोलले जात आहे.

उल्हासनगर पालिकेच्या दोन शाळांच्या इमारती धोकादायक होऊन गळती लागल्याने नवीन इमारतीच्या बांधकामाला तीन वर्षांपूर्वी पािलकेने मंजुरी दिली. गेल्यावर्षीच बांधलेल्या नव्या इमारतीचे हस्तांतर व्हायला हवे होते. मात्र, महापालिका व शिक्षण मंडळातील सावळ्यागोंधळामुळे इमारतीचे बांधकाम रेंगाळले. दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी रगडे यांना शाळा क्रमांक २९ ला गळती लागून मुले पावसात भिजत शिक्षण घेत असल्याची माहिती मिळाली. रगडे यांनी शनिवारी दुपारी शाळेला भेट दिली असता शेकडो मुले गळक्या व धोकादायक शाळेत शिक्षण घेत असल्याचे चित्र दिसले. तसेच समोरच शाळेची नवीन इमारत बांधून तयार आहे. मात्र, कंत्राटदाराला बिल न मिळाल्याने इमारतीचे हस्तांतर झाले नाही, अशी माहिती त्यांना मिळाली. या प्रकाराबाबत रगडे यांनी संताप व्यक्त करत सर्व प्रकार आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या कानांवर घातला. महापालिकेला इमारत हस्तांतरित करण्यास तयार असून बिल दिले गेले नाही, हे कारण नसल्याचे कंत्राटदाराने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले. एकूणच सावळ्यागोंधळामुळे मुले धोकादायक व गळक्या शाळेत शिक्षण घेत आहेत.

शेकडो मुलांचा जीव धोक्यातमहापालिकेच्या अनेक शाळांच्या इमारती ६० वर्षांपूर्वीच्या असून त्यांना गळती लागून धोकादायक झाल्या आहेत. अशा शाळेत शेकडो मुले जीव धोक्यात घालून शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. शाळा क्रमांक २९ व ८ ची नवीन इमारत उभी असताना मुले जुन्या इमारतीत शिक्षण घेत असल्याने, शिक्षणाप्रति महापालिकेची आस्था उघड झाली आहे.

विद्यार्थी नव्या इमारतीऐवजी धोकादायक व गळक्या इमारतीत शिक्षण घेत असल्याचा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर आयुक्त देशमुख यांनी दखल घेऊन नवीन इमारत ताब्यात घेण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तर, शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी एस.बी. मोहिते यांनी कंत्राटदाराचे बिल न दिल्याने, इमारतीचे हस्तांतर मंडळाकडे झाले नसल्याचे सांगितले. तसेच उपलेखा अधिकारी नीलम कदम यांनी इमारतीचे १० टक्के काम शिल्लक राहिल्याने इमारतीचे हस्तांतर झाले नाही, अशी माहिती दिली. विद्यार्थ्यांना गळक्या वर्गात शिक्षण घ्यावे लागत असल्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.