शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

उल्हासनगरमध्ये पालिका विद्यार्थ्यांचे सुरू आहे गळक्या वर्गांत शिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 00:19 IST

शिक्षण मंडळाचा सावळागोंधळ। नवी इमारत ताब्यात घेण्याचे आयुक्तांचे आदेश

- सदानंद नाईकउल्हासनगर : महापालिका शाळा क्रमांक ८ व २९ मधील शेकडो मुले नवीन इमारतीऐवजी जुन्या गळक्या व धोकादायक शाळेत जीव धोक्यात घालून धडे गिरवत आहेत. या प्रकाराने पालकांनी संताप व्यक्त केला असून नवीन इमारत ताब्यात घेण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत. तर, इमारत बांधकामाचे बिल न दिल्याने हस्तांतर रेंगाळल्याचे बोलले जात आहे.

उल्हासनगर पालिकेच्या दोन शाळांच्या इमारती धोकादायक होऊन गळती लागल्याने नवीन इमारतीच्या बांधकामाला तीन वर्षांपूर्वी पािलकेने मंजुरी दिली. गेल्यावर्षीच बांधलेल्या नव्या इमारतीचे हस्तांतर व्हायला हवे होते. मात्र, महापालिका व शिक्षण मंडळातील सावळ्यागोंधळामुळे इमारतीचे बांधकाम रेंगाळले. दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी रगडे यांना शाळा क्रमांक २९ ला गळती लागून मुले पावसात भिजत शिक्षण घेत असल्याची माहिती मिळाली. रगडे यांनी शनिवारी दुपारी शाळेला भेट दिली असता शेकडो मुले गळक्या व धोकादायक शाळेत शिक्षण घेत असल्याचे चित्र दिसले. तसेच समोरच शाळेची नवीन इमारत बांधून तयार आहे. मात्र, कंत्राटदाराला बिल न मिळाल्याने इमारतीचे हस्तांतर झाले नाही, अशी माहिती त्यांना मिळाली. या प्रकाराबाबत रगडे यांनी संताप व्यक्त करत सर्व प्रकार आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या कानांवर घातला. महापालिकेला इमारत हस्तांतरित करण्यास तयार असून बिल दिले गेले नाही, हे कारण नसल्याचे कंत्राटदाराने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले. एकूणच सावळ्यागोंधळामुळे मुले धोकादायक व गळक्या शाळेत शिक्षण घेत आहेत.

शेकडो मुलांचा जीव धोक्यातमहापालिकेच्या अनेक शाळांच्या इमारती ६० वर्षांपूर्वीच्या असून त्यांना गळती लागून धोकादायक झाल्या आहेत. अशा शाळेत शेकडो मुले जीव धोक्यात घालून शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. शाळा क्रमांक २९ व ८ ची नवीन इमारत उभी असताना मुले जुन्या इमारतीत शिक्षण घेत असल्याने, शिक्षणाप्रति महापालिकेची आस्था उघड झाली आहे.

विद्यार्थी नव्या इमारतीऐवजी धोकादायक व गळक्या इमारतीत शिक्षण घेत असल्याचा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर आयुक्त देशमुख यांनी दखल घेऊन नवीन इमारत ताब्यात घेण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तर, शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी एस.बी. मोहिते यांनी कंत्राटदाराचे बिल न दिल्याने, इमारतीचे हस्तांतर मंडळाकडे झाले नसल्याचे सांगितले. तसेच उपलेखा अधिकारी नीलम कदम यांनी इमारतीचे १० टक्के काम शिल्लक राहिल्याने इमारतीचे हस्तांतर झाले नाही, अशी माहिती दिली. विद्यार्थ्यांना गळक्या वर्गात शिक्षण घ्यावे लागत असल्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.