शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी १६३ आणि शिक्षक केवळ एकच

By admin | Updated: April 10, 2017 05:33 IST

भिवंडी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या बोरपाडा या प्राथमिक शाळेत १६३ विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी केवळ एकच

 रोहिदास पाटील / अनगावभिवंडी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या बोरपाडा या प्राथमिक शाळेत १६३ विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी केवळ एकच शिक्षक आहे. यामुळे येथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. पहिली ते सातवीपर्यंत वर्ग असणाऱ्या शाळेत शिक्षकाची नेमणूक करण्यात यावी, याकरिता शिक्षण विभागाकडे लेखी तक्र ारी करूनही नेमणूक न केल्याने शाळा व्यवस्थापन समितीसह पालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.ठाणे जिल्हा परिषद व भिवंडी पंचायत समिती शिक्षण विभागांतर्गत असणाऱ्या बोरपाडा या शाळेत १६३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामध्ये जव्हार, मोखाडा या तालुक्यांतून वीटभट्टीवर स्थलांतरित झालेल्या आदिवासी विद्यार्थ्यांची संख्या ७७ आहे. या सर्व विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी पाच शिक्षकांची गरज असतानाही येथे एकही शिक्षक दिलेला नाही. तीन वर्षांपासून एक शिक्षक आहे. तेच शाळेचे मुख्याध्यापक म्हणूनही काम पाहत आहेत. त्यांना केंद्रातील व पंचायत समिती शिक्षण विभागाच्या बैठका व पत्रव्यवहार करण्याचीही जबाबदारी असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या काळात वर्गाची जबाबदारी मुलावर देत किंवा शाळा सोडली जात असल्याची माहिती पालक व ग्रामस्थांनी दिली. ज्या शाळा कल्याण व ठाणे शहराजवळ आहेत, त्या शाळांमध्ये पटसंख्या कमी असतानाही जास्त शिक्षक आहेत. तेथे शिक्षकांच्या सोयीनुसार पंचायत समिती शिक्षण विभागाने त्यांच्या नियमांना बगल देऊन नियुक्त्या केल्या आहेत. त्या कोणत्या आधारे करण्यात आल्या, हे निदर्शनास आणूनही त्याकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केले जात असल्याची माहिती पालकांनी दिली. शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभारामुळे आदिवासी, कातकरी विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याने या शाळेला शिक्षकाची नेमणूक करावी, अशी मागणी शेलार ग्रामपंचायतीचे सरपंच घनश्याम भोईर यांनी केली आहे. या शाळेस तात्पुरता एक शिक्षक दिला आहे. मात्र, सरकारी परिपत्रकानुसार त्याचे वेतन काल्हेर शाळेत निघते. त्याला लेखी पत्रही दिलेले नाही.तीन वर्षांपासून शाळेत एकच शिक्षक आहे, हे खरे आहे. शिक्षकांच्या नेमणुका व्हाव्यात, याकरिता पत्रव्यवहार केला आहे.- बाबू धापशी, मुख्याध्यापक व शिक्षकबोरपाडा जि.प. शाळेत शिक्षकांच्या नेमणुका कराव्यात, यासाठी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाशी पत्रव्यवहार केला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याकरिता प्रयत्न सुरू आहे.- कैलास सोनावणे, केंद्रप्रमुख