शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

विद्यार्थी १६३ आणि शिक्षक केवळ एकच

By admin | Updated: April 10, 2017 05:33 IST

भिवंडी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या बोरपाडा या प्राथमिक शाळेत १६३ विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी केवळ एकच

 रोहिदास पाटील / अनगावभिवंडी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या बोरपाडा या प्राथमिक शाळेत १६३ विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी केवळ एकच शिक्षक आहे. यामुळे येथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. पहिली ते सातवीपर्यंत वर्ग असणाऱ्या शाळेत शिक्षकाची नेमणूक करण्यात यावी, याकरिता शिक्षण विभागाकडे लेखी तक्र ारी करूनही नेमणूक न केल्याने शाळा व्यवस्थापन समितीसह पालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.ठाणे जिल्हा परिषद व भिवंडी पंचायत समिती शिक्षण विभागांतर्गत असणाऱ्या बोरपाडा या शाळेत १६३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामध्ये जव्हार, मोखाडा या तालुक्यांतून वीटभट्टीवर स्थलांतरित झालेल्या आदिवासी विद्यार्थ्यांची संख्या ७७ आहे. या सर्व विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी पाच शिक्षकांची गरज असतानाही येथे एकही शिक्षक दिलेला नाही. तीन वर्षांपासून एक शिक्षक आहे. तेच शाळेचे मुख्याध्यापक म्हणूनही काम पाहत आहेत. त्यांना केंद्रातील व पंचायत समिती शिक्षण विभागाच्या बैठका व पत्रव्यवहार करण्याचीही जबाबदारी असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या काळात वर्गाची जबाबदारी मुलावर देत किंवा शाळा सोडली जात असल्याची माहिती पालक व ग्रामस्थांनी दिली. ज्या शाळा कल्याण व ठाणे शहराजवळ आहेत, त्या शाळांमध्ये पटसंख्या कमी असतानाही जास्त शिक्षक आहेत. तेथे शिक्षकांच्या सोयीनुसार पंचायत समिती शिक्षण विभागाने त्यांच्या नियमांना बगल देऊन नियुक्त्या केल्या आहेत. त्या कोणत्या आधारे करण्यात आल्या, हे निदर्शनास आणूनही त्याकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केले जात असल्याची माहिती पालकांनी दिली. शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभारामुळे आदिवासी, कातकरी विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याने या शाळेला शिक्षकाची नेमणूक करावी, अशी मागणी शेलार ग्रामपंचायतीचे सरपंच घनश्याम भोईर यांनी केली आहे. या शाळेस तात्पुरता एक शिक्षक दिला आहे. मात्र, सरकारी परिपत्रकानुसार त्याचे वेतन काल्हेर शाळेत निघते. त्याला लेखी पत्रही दिलेले नाही.तीन वर्षांपासून शाळेत एकच शिक्षक आहे, हे खरे आहे. शिक्षकांच्या नेमणुका व्हाव्यात, याकरिता पत्रव्यवहार केला आहे.- बाबू धापशी, मुख्याध्यापक व शिक्षकबोरपाडा जि.प. शाळेत शिक्षकांच्या नेमणुका कराव्यात, यासाठी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाशी पत्रव्यवहार केला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याकरिता प्रयत्न सुरू आहे.- कैलास सोनावणे, केंद्रप्रमुख