शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

ठाणे महापालिकेचा आकृतीबंध अडकला शासनाच्या लालफितीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 04:24 IST

ठाणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे प्रमाण काही वर्षांपासून वाढले आहे. पुढील वर्षी तर अर्ध्याहून अधिक महापालिका रिकामी होणार आहे.

ठाणे - ठाणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे प्रमाण काही वर्षांपासून वाढले आहे. पुढील वर्षी तर अर्ध्याहून अधिक महापालिका रिकामी होणार आहे. त्यामुळे महापालिकेचा कारभार सुरळीत चालावा, यासाठी प्रशासनाने २०१६ मध्ये आकृतीबंध तयार करून तो शासनाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवला आहे. परंतु, दीड वर्ष उलटूनही त्याला मंजुरी न मिळाल्याने पालिकेच्या कारभाराचा डोलारा दोलायमान झाला आहे.महापालिकेच्या सेवेतून मागील २०१५ ते मे २०१८ पर्यंत ६६६ हून अधिक कर्मचारी-अधिकारी सेवानिवृत्त झाले आहेत. यांची पोकळी भरून काढण्यासाठी पालिकेने आतापर्यंत ६३९ पदे ही सरळसेवेने भरली आहेत. तसेच काहींना पदोन्नतीदेखील दिली आहे. परंतु, शहराची वाढणारी लोकसंख्या आणि वाढता कामाचा व्याप लक्षात घेता ही संख्या अपुरी ठरत आहे. त्यातही अनेक वरिष्ठ अधिकाºयांना किंबहुना सहायक आयुक्त, उपायुक्त दर्जाच्या अधिकाºयांना अनेक विभागांचे अतिरिक्त कार्यभार देण्यात आले आहे. त्यामुळे एक ना धड भाराभार चिंध्या, अशी परिस्थिती होऊन ठाणेकरांना हे अधिकारी वेळेत उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे. त्यातच, ज्या पद्धतीने कर्मचारी सेवानिवृत्त होत आहे, त्यागतीने भरती मात्र होताना दिसत नाही. त्यामुळे ठाणे महापालिकेने २० जुलै २०१६ रोजी आकृतीबंधाचा ठराव महासभेत मंजूर करून १ आॅक्टोबर २०१६ रोजी तो शासनाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवला होता. परंतु, दीड वर्ष उलटूनही त्याला मंजुरी मिळालेली नाही. महापालिकेने याबाबत शासनाकडे वारंवार पत्रव्यवहारही केला आहे. परंतु, अद्यापही शासनाने याची दखल घेतलेली नाही.असा आहे आकृतीबंधमहापालिकेत सद्य:स्थितीत ९५७५ पदे मंजूर असून नव्याने ५२३५ पदे भरण्याचे निश्चित करून तशी मागणी केली आहे. तर, ४५५ पदे ही व्यपगत केली जाणार आहेत.ही पदे मंजूर झाली, तर महापालिकेत १४ हजार ३५५ पदे होणार आहेत. शिक्षण विभागातदेखील १४३१ पदे मंजूर असून नव्याने ९३३ पदे मागितली आहेत. ती मिळाल्यास शिक्षण विभागातदेखील पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे.या महिन्यात हा आकृतीबंध मंजूर होणार, अशी आशा पालिकेला वाटत होती. परंतु, कोकण पदवीधर मतदारसंघाच्या लागलेल्या आचारसंहितेमुळे हा आकृतीबंध लांबल्याचे पालिकेच्या सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :tmcठाणे महापालिकाnewsबातम्या