शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

पावसाळ्यातील साथरोगांचा सामना करण्यासाठी ठामपा सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : कोरोनाचे सावट असताना दुसरीकडे काही दिवसांवर पावसाळा येऊन ठेपला आहे. पावसाळ्यात उद‌्भवणाऱ्या साथरोगांचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : कोरोनाचे सावट असताना दुसरीकडे काही दिवसांवर पावसाळा येऊन ठेपला आहे. पावसाळ्यात उद‌्भवणाऱ्या साथरोगांचा सामना करण्यासाठी ठाणे महापालिकेची आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. पावसाळ्यात नागरिकांनीही काळजी घ्यावी, असे आवाहन मनपाने केले आहे.

पावसाळ्यात ताप आल्यास तत्काळ नजीकच्या मनपा रुग्णालयात, आरोग्य केंद्रांत जाऊन रक्त तपासणी करावी. स्वत:च्या घरातील अथवा आजूबाजूची व्यक्ती हिवताप, डेंग्यू ताप, कावीळ, हगवण, विषमज्वर (टायफाइड), लेप्टोस्पायरोसिस आदी साथीच्या रोगांनी आजारी झाल्याचे निदर्शनास आल्यास त्याची माहिती तत्काळ नजीकच्या मनपा दवाखान्यात अथवा आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यालयात देऊन वेळीच उपाययोजना करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन मनपाने केले आहे.

सात दिवसांपेक्षा जास्त दिवस साठविलेल्या अथवा साचलेल्या स्वच्छ पाण्यात, धुणी भांडी करण्यासाठी वापरण्यात येणारे पाण्याचे उघडे ड्रम, घराच्या आसपास पडलेल्या नारळाच्या करवंट्या, बांधकामासाठी वापरण्यात येणारे पाण्याचे हौद, हवाबंद झाकण नसलेल्या घरातील पाणी साठवण टाक्या आदींमध्ये पाणी साचून डासांची निर्मिती होऊन त्यापासून मलेरिया होण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी पाणी गाळून व उकळून प्यावे. ते शुद्ध करण्यासाठी क्लोरीन वापरावे. इमारतींमधील व घरातील पाण्याच्या टाक्या साफ कराव्यात. शिळे, उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नयेत. साचलेल्या पाण्यात चालणे टाळावे. सात दिवसांपर्यंत पाणी साठवू नये, साठविलेल्या पाण्याच्या ड्रमवर घट्ट झाकण बसवावे, सोसायटीच्या आवारात, टेरेसवर अथवा घराभोवती नारळाच्या करवंट्या, वाहनांचे टायर, रिकामे डबे असल्यास त्याची योग्य ती विल्हेवाट लावावी, सेप्टिक टँक त्वरित दुरुस्त करून घ्यावेत आणि सोसायटीचा परिसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहनही मनपाने केले आहे.

पावसाळ्यात दुकानदारांनी दुकानाबाहेर उघड्यावर ठेवलेल्या निकाम्या टायरमध्ये किंवा पाण्याच्या पिंपांमध्ये पावसाचे पाणी साचून त्यात डास-अळी आढळल्यास तसेच यामुळे आजूबाजूच्या परिसरात, चिकुन गुन्या तसेच डेंग्यू तापाचे डास आढळल्यास महापालिका अधिनियम १९४९ मधील तरतुदीनुसार संबंधित दुकानदारांवर मनपाच्या आरोग्य विभागाकडून कारवाई करण्यात येईल.

अधिकारी, कर्मचारी ठेवणार विशेष लक्ष

- पावसाळ्यातील साथरोगांचा सामना करण्यासाठी ठामपाचा आरोग्य विभाग सज्ज असून, फायलेरिया विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि प्रत्येक आरोग्य केंद्रांतील कर्मचाऱ्यांचा ताफा पावसाळ्यात विशेष लक्ष ठेवणार आहेत. याशिवाय भित्तीपत्रके प्रत्येक सोसायटीला दिली जाणार आहेत.

- याबाबत ठामपाचे उपायुक्त संदीप माळवी म्हणाले की, पावसाळ्यातील साथीच्या रोगांचा मुकाबला करण्यासाठी आम्ही सर्व तयारी केली आहे. परंतु, नागरिकांनी काळजी घेऊन सहकार्य करावे.

--------------------