शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
2
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
3
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
4
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
5
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
6
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
7
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
8
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
9
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
10
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
11
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
12
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
13
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
14
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
15
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
16
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
17
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
18
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
19
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
20
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..

महाविकास आघाडीने घातलेल्या घोळाचे ठाण्यात जोरदार हादरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 01:56 IST

आयुक्तांचे दबावतंत्र : कमी महत्त्वाच्या बदलीस विरोध

ठाणे : राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील तीन पक्षांच्या ‘तीन तिघाडा काम बिघाडा’ कार्यशैलीमुळे वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये घोळ सुरू असून त्याचे हादरे आता ठाणे महापालिकेत बसू लागले आहेत. आयुक्त संजीव जयस्वाल यांनी महापालिकेत केलेल्या बदल्या, त्या रद्द करण्याचा निर्णय हे सर्व अन्यत्र चांगल्या पदावर बदली मिळवण्याच्या दबावतंत्राचा भाग आहे की, कमी महत्त्वाच्या पदावरील बदलीची कुणकुण लागल्याने व्यक्त केलेली नाराजी आहे, याची चर्चा मंत्रालयात रंगली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सूत्रे स्वीकारल्यावर दीर्घ काळानंतर वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू केले. मात्र, घाऊक बदल्या न करता मोजक्या बदल्या ते करीत आहेत. याचे कारण राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या दोन मित्रपक्षांचा बदल्यांमध्ये हस्तक्षेप व दबाव आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मागील भाजप सरकारमधील मंत्र्यांच्या निकटवर्तीय अधिकाºयांना मुख्य जबाबदाºया द्यायच्या नाहीत, तर काँग्रेसच्या काही मंत्र्यांना त्यांच्या मर्जीतील अधिकारी हवे आहेत. त्यामुळे मुंबई महापालिका आयुक्तपदाकरिता जवळपास नक्की झालेले नितीन करीर यांचे नाव अचानक रद्द झाले व त्यांना महसूल खात्याची जबाबदारी दिली जाणार आहे. साहजिकच, प्रवीण परदेशी यांना तूर्त मुंबई महापालिकेतून हलवले जाणार नाही.जयस्वाल हे म्हाडा, गृहनिर्माण अथवा झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण यापैकी एका विभागात जाण्यास उत्सुक आहेत. गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकरिता अनुकूल आहेत. मात्र, उपमुख्यमंत्री पवार यांच्या मनात जयस्वाल हे मागील सत्ताधाºयांच्या जवळचे असल्याची अढी असल्याचे बोलले जाते.समजा, राष्ट्रवादी काँग्रेसमधील वादविवादामुळे वरील विभागात बदली होत नसेल, तर शिवसेनेने हस्तक्षेप करून हा तिढा सोडवावा, अशी जयस्वाल यांची अपेक्षा असल्याचे समजते. मात्र, तसे होताना दिसत नसल्याने जयस्वाल यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तीय अधिकाºयांच्या घाऊक बदल्या केल्या. लागलीच त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली. या नाराजीची दखल सरकारने घ्यावी, हा तर जयस्वाल यांचा हेतू नाही ना, अशी चर्चा यानिमित्ताने पालिका वर्तुळात सुरू आहे.समजा, मनाजोगे खाते मिळत नसेल व तुलनेने कमी महत्त्वाच्या विभागात बदली होत असल्याची कुणकुण लागली असेल, तर त्याबाबत नाराजी प्रकट करणे, हाही यामागील हेतू असू शकतो, असे मंत्रालयातील उच्चपदस्थ अधिकाºयांच्या वर्तुळात बोलले जाते.सत्तासंघर्षाचा परिपाकमागील सरकारमध्ये बाजूला ठेवलेल्या व काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांशी उत्तम संबंध असलेल्या काही वरिष्ठ सनदी अधिकाºयांना भाजप सरकारमधील काही प्रभावशाली अधिकाºयांनी मंत्रालयात महत्त्वाच्या पदांवर येऊ नये, असे वाटते. अधिकाºयांमधील रस्सीखेच आणि एकूणच सत्तासंघर्ष याचाही हा परिपाक असल्याचे बोलले जाते. 

 

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका