शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाच्या कल्याण उपकेंद्राच्या हेतूलाच हरताळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 00:20 IST

अभाविपने वेधले लक्ष : शैैक्षणिक कागदपत्रे मिळण्याची सुविधा नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय

- जान्हवी मोर्येडोंबिवली : जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना त्यांची शैक्षणिक कागदपत्रे व कामासाठी मुंबईतील विद्यापीठात जावे लागू नये, यासाठी विद्यापीठाचे कल्याण येथे उपकेंद्र स्थापन करण्यात आले आहे. मात्र, या केंद्राच्या उद्घाटनानंतरही येथे विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कागदपत्रे मिळण्याची सोय अद्याप करण्यात आली नाही. त्यामुळे उपकेंद्राच्या मुख्य उद्देशालाच हरताळ फासला गेला आहे, याकडे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने लक्ष वेधले आहे.विद्यापीठ उपकेंद्राचा शुभारंभ ११ जुलैला युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाला. ‘स्कूल आॅफ इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड अप्लाइड सायन्सेस’ या अभ्यास शाखेची सुरुवात येथे केली जाणार आहे. या उपकेंद्रात एम.टेक इन कॉम्प्युटर इंजिनीअरिंग, एम.टेक इन केमिकल इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी, एम.टेक इन ट्रान्सपोर्टेशन इंजिनीअरिंग, एम.टेक इन आर्टिफि शिअल इंटेलिजन्स अ‍ॅण्ड मशीन लर्निंग, मास्टर इन ओशोनोग्राफी, पीएच.डी. इन कॉम्प्युटर इंजिनीअरिंग, पीएच.डी. इन केमिकल सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी हे अभ्यासक्रम या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे कागदपत्रे मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना पुन्हा मुंबईलाच धाव घ्यावी लागणार आहे, याकडे विद्यार्थी परिषदेने लक्ष वेधले आहे. विद्यापीठ उपकेंद्र सुरू करण्यासाठी आधीच विलंब झाला आहे. मात्र, तरीही उपकेंद्रातून खरा उद्देश साध्य होणार नाही, यासाठी विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी शुभारंभाच्या कार्यक्रमात निषेधाच्या घोषणा देत कुलगुरूंसह प्रशासनाचा निषेध व्यक्त केला होता.विद्यार्थी परिषदेतर्फे विद्यापीठाच्या कल्याण येथील उपकेंद्राची कार्यशीलता वाढवणे, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, जेणेकरून ठाणे-पालघर जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांना त्यांची शैक्षणिक कागदपत्रे व कामासाठी मुंबईत वारंवार जावे लागणार नाही, यासाठी दक्षता घेतली जाणार आहे.महाविद्यालयात तक्रार निवारण केंद्र आणि हेल्पलाइनची सुविधा व्हावी, यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) २०१५ मध्ये सुचवलेली ‘चॉइस बेस क्रेडिट सिस्टीम’ परिणामकारकरीत्या विद्यापीठात लागू करावी, यासाठी आगामी काळात प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती अभाविपचे डोंबिवलीतील कार्यकर्ते मिहीर देसाई यांनी दिली.लवकरच सेवा उपलब्ध करून देऊ - विद्यापीठविद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवा पुरविण्याच्या सक्षमीकरणाचे काम विद्यापीठाने केले आहे. विद्यार्थ्यांना हॉल तिकीट देणे, प्रवेश अर्ज उपलब्ध करून देणे हे काम आॅनलाइनद्वारे केले जाते. निकाल महाविद्यालयांना पाठविले जातात. या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना जे काही गरज लागेल ते लवकरात लवकर मिळेल असे पाहू. ठाण्यात ही सेवा उपलब्ध आहे. कल्याणला ही लवकरच सेवा उपलब्ध करून देऊ, अशी माहिती उपकुलसचिव व विद्यापीठ जनसंपर्क अधिकारी डॉ. लीलाधर बनसोड यांनी दिली.

टॅग्स :Mumbai Universityमुंबई विद्यापीठ