शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

झोपड्या पाडण्याच्या ठरावाविरोधात धडक मोर्चा

By admin | Updated: December 27, 2016 01:56 IST

ठाणे महानगर पालिकेने कळवा प्रभाग समितीच्या अंतर्गत येणाऱ्या झोपड्या पाडण्याचा ठराव पारीत केला आहे. या ठरावाच्या निषेधार्थ कळवा मुंब्रा येथील राष्ट्रवादीचे आमदार

ठाणे : ठाणे महानगर पालिकेने कळवा प्रभाग समितीच्या अंतर्गत येणाऱ्या झोपड्या पाडण्याचा ठराव पारीत केला आहे. या ठरावाच्या निषेधार्थ कळवा मुंब्रा येथील राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी सकाळी कळवा नाका येथे धडक मोर्चाचे आयोजन केले होते. या झोपड्यांवर कारवाई झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही यावेळी आव्हाड यांनी दिला.या ठरावाच्या निषेधार्थ सुमारे ३५ हजार झोपडीधारकांनी कळवा नाका येथे भव्य मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चाला उद्बबोधन करतांना आव्हाड यांनी शिवसेना- भाजपवर चांगलीच टीका केली.ठामपाने ठाण्यातील झोपड्यांवर कारवाईचा निर्णय घेतल्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी अधिवेशनामध्ये आवाज उठवून या कारवाईला स्थगिती मिळविली होती. मात्र, महासभेमध्ये सेना- भाजपने ठराव करु न या झोपड्यांवर कारवाईचा निर्णय घेतला आहे. त्याच निर्णयाच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला. मनिषा नगर, जानकीनगर, खारीगाव, घोलाईनगर, आतकोनेश्वर नगर येथील सुमारे ३० ते ३५ हजार नागरिक या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. मनिषा नगरमधून या मोर्चाला सुरु वात झाली. एकाचवेळी खारीगाव, मनिषानगर, कळवा या भागातून मोर्चात नागरिक सहभागी झाल्यामुळे नवी मुंबई आणि रेतीबंदरकडे जाणारी वाहतूक पूर्णत: ठप्प झाली होती. आव्हाड यांनी पालिका प्रशासनावर सडकून टीका केली. २००० पर्यंतच्या झोपड्यांना अभय देण्याचा कायदा असतांनाही ८० वर्षांपूर्वीच्या झोपड्या पाडण्याचा घाट घातला आहे. शहर सुंदर करण्याच्या नादात सत्ताधारी रहिवाशांना बेघर करीत आहेत. मात्र, या भागातील एकही झोपडी तोडण्याचा प्रयत्न केला तर आम्ही रस्त्यावर उतरु. गोरगरिबांना बेघर केले तर ते बंड केल्याशिवाय राहणार नाही, असे ते म्हणाले.