शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘कथाकथन हे साहित्य प्रसाराचे सर्वोत्कृष्ट माध्यम आहे ’ – मकरंद जोशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 17:24 IST

स्त्री कल्याण संघटनेच्या शालेय वक्तृत्व आणि वाद विवाद स्पर्धा गेली पंचावन्न वर्षे सतत सुरू आहेत.

ठळक मुद्दे‘कथाकथन हे साहित्य प्रसाराचे सर्वोत्कृष्ट माध्यम आहे ’ – मकरंद जोशीपरिक्षक म्हणून काम संकलन करणे महत्वाचे असते : किरण बोरकर या स्पर्धेत प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरल्या दिपाली कुर्लेकर

ठाणे : ‘ आज डिजिटल माध्यमांमुळे पुस्तक वाचण्याची सवय कमी होत असताना, कथाकथनाच्या माध्यमातून पुन्हा एकदा लोकांना पुस्तकांकडे वळवता येऊ शकते. कथा कथनकार हा स्वतः उत्तम वाचक असतो, विविध साहित्यिकांच्या कथा वाचून तो कथनासाठीची कथा निवडतो आणि त्याच्या प्रभावी कथा कथनामुळे श्रोत्यांमधील अनेकांना त्या त्या लेखकाच्या आणखी कथा, इतर साहित्य वाचावेसे वाटते. म्हणूनच कथाकथन हे साहित्य प्रसाराचे सर्वोत्कृष्ट माध्यम आहे ’ असे प्रतिपादन मुक्त पत्रकार आणि लेखक मकरंद जोशी यांनी स्त्री कल्याण संघटनेच्या महिलांसाठी आयोजित केलेल्या कथाकथन स्पर्धेच्या बक्षिस समारंभाच्यावेळी केले.

     ठाण्यातील शतकपूर्ती केलेल्या श्री समर्थ सेवक मंड्ळातर्फे महिला आणि मुले ह्यांच्यासाठी काम करणारी स्त्री कल्याण संघटना १९५३ साली स्थापन करण्यात आली होती. गेली पासष्ट वर्षे स्त्री कल्याण संघटना अविरतपणे स्पर्धांपासून ते प्रदर्शनांपर्यंत विविध उपक्रम राबवित आली आहे. सात वर्षांपूर्वी स्त्री कल्याण संघटनेने फक्त महिलांसाठी कथा कथन स्पर्धा आयोजित करायला सुरवात केली. फक्त महिलांसाठी असलेली ही बहुदा महाराष्ट्रातील एकमेव कथा कथन स्पर्धा असावी. यावर्षीच्या स्पर्धेत कोसळणाऱ्या पावसाला न जुमानता विविध वयोगटातील बारा महिलांनी सहभाग घेतला होता. ज्येष्ठ रंगभूषाकार कृष्णा बोरकर यांचे सुपुत्र आणि लेखक किरण बोरकर यांनी परिक्षक म्हणून काम संकलन करणे महत्वाचे असते, स्पर्धेत कथा सादर करताना दिलेल्या वेळेत अपेक्षित परिणाम साधण्यासाठी ते आवश्यक असते’ असे सांगितले. कार्यक्रमाचे पाहुणे मकरंद जोशी यांनी बोलताना ‘ महिला या मुळतच उत्तम कथनकार असतात. श्रावणातल्या कहाण्यांपासून ते अगदी भाजी किती महाग झालेय पर्यंत विविध प्रकारे त्या रंजकपणे, रसाळपणे कथन करत असतात.या स्पर्धेमुळे महिलांच्या या कौशल्याला हक्काचे व्यासपिठ आणि बक्षिसाचे कौतुक लाभले आहे.हा उपक्रम असाच अविरतपणे सुरू रहावा ही आता ठाणेकर रसिकांची जबाबदारी आहे ’ असे उद्गार काढले.

या स्पर्धेत प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरल्या दिपाली कुर्लेकर , द्वितीय क्रमांक पटकावला गंधवती तांबे आणि तृतीय क्रमांक मिळाला निलिमा चाफेकर यांना. यावेळी श्री समर्थ सेवक मंडळाचे शास्ता अनिल हजारे, स्त्री कल्याण संघटनेच्या चिटणीस सरिता कळके आणि संघटनेचे अन्य पदाधिकारी, सभासद उपस्थित होते.   

टॅग्स :thaneठाणेliteratureसाहित्यcultureसांस्कृतिक