शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
4
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
5
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
6
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
7
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
8
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
9
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
10
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
11
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
12
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
13
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
14
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
15
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
17
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
18
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
19
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
20
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर

‘कथाकथन हे साहित्य प्रसाराचे सर्वोत्कृष्ट माध्यम आहे ’ – मकरंद जोशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 17:24 IST

स्त्री कल्याण संघटनेच्या शालेय वक्तृत्व आणि वाद विवाद स्पर्धा गेली पंचावन्न वर्षे सतत सुरू आहेत.

ठळक मुद्दे‘कथाकथन हे साहित्य प्रसाराचे सर्वोत्कृष्ट माध्यम आहे ’ – मकरंद जोशीपरिक्षक म्हणून काम संकलन करणे महत्वाचे असते : किरण बोरकर या स्पर्धेत प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरल्या दिपाली कुर्लेकर

ठाणे : ‘ आज डिजिटल माध्यमांमुळे पुस्तक वाचण्याची सवय कमी होत असताना, कथाकथनाच्या माध्यमातून पुन्हा एकदा लोकांना पुस्तकांकडे वळवता येऊ शकते. कथा कथनकार हा स्वतः उत्तम वाचक असतो, विविध साहित्यिकांच्या कथा वाचून तो कथनासाठीची कथा निवडतो आणि त्याच्या प्रभावी कथा कथनामुळे श्रोत्यांमधील अनेकांना त्या त्या लेखकाच्या आणखी कथा, इतर साहित्य वाचावेसे वाटते. म्हणूनच कथाकथन हे साहित्य प्रसाराचे सर्वोत्कृष्ट माध्यम आहे ’ असे प्रतिपादन मुक्त पत्रकार आणि लेखक मकरंद जोशी यांनी स्त्री कल्याण संघटनेच्या महिलांसाठी आयोजित केलेल्या कथाकथन स्पर्धेच्या बक्षिस समारंभाच्यावेळी केले.

     ठाण्यातील शतकपूर्ती केलेल्या श्री समर्थ सेवक मंड्ळातर्फे महिला आणि मुले ह्यांच्यासाठी काम करणारी स्त्री कल्याण संघटना १९५३ साली स्थापन करण्यात आली होती. गेली पासष्ट वर्षे स्त्री कल्याण संघटना अविरतपणे स्पर्धांपासून ते प्रदर्शनांपर्यंत विविध उपक्रम राबवित आली आहे. सात वर्षांपूर्वी स्त्री कल्याण संघटनेने फक्त महिलांसाठी कथा कथन स्पर्धा आयोजित करायला सुरवात केली. फक्त महिलांसाठी असलेली ही बहुदा महाराष्ट्रातील एकमेव कथा कथन स्पर्धा असावी. यावर्षीच्या स्पर्धेत कोसळणाऱ्या पावसाला न जुमानता विविध वयोगटातील बारा महिलांनी सहभाग घेतला होता. ज्येष्ठ रंगभूषाकार कृष्णा बोरकर यांचे सुपुत्र आणि लेखक किरण बोरकर यांनी परिक्षक म्हणून काम संकलन करणे महत्वाचे असते, स्पर्धेत कथा सादर करताना दिलेल्या वेळेत अपेक्षित परिणाम साधण्यासाठी ते आवश्यक असते’ असे सांगितले. कार्यक्रमाचे पाहुणे मकरंद जोशी यांनी बोलताना ‘ महिला या मुळतच उत्तम कथनकार असतात. श्रावणातल्या कहाण्यांपासून ते अगदी भाजी किती महाग झालेय पर्यंत विविध प्रकारे त्या रंजकपणे, रसाळपणे कथन करत असतात.या स्पर्धेमुळे महिलांच्या या कौशल्याला हक्काचे व्यासपिठ आणि बक्षिसाचे कौतुक लाभले आहे.हा उपक्रम असाच अविरतपणे सुरू रहावा ही आता ठाणेकर रसिकांची जबाबदारी आहे ’ असे उद्गार काढले.

या स्पर्धेत प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरल्या दिपाली कुर्लेकर , द्वितीय क्रमांक पटकावला गंधवती तांबे आणि तृतीय क्रमांक मिळाला निलिमा चाफेकर यांना. यावेळी श्री समर्थ सेवक मंडळाचे शास्ता अनिल हजारे, स्त्री कल्याण संघटनेच्या चिटणीस सरिता कळके आणि संघटनेचे अन्य पदाधिकारी, सभासद उपस्थित होते.   

टॅग्स :thaneठाणेliteratureसाहित्यcultureसांस्कृतिक