शहरं
Join us  
Trending Stories
1
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
3
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
4
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
5
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
6
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
7
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
8
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
9
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
10
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
11
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
12
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
13
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
14
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
15
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
16
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
17
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
18
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
19
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
20
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!

‘कथाकथन हे साहित्य प्रसाराचे सर्वोत्कृष्ट माध्यम आहे ’ – मकरंद जोशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 17:24 IST

स्त्री कल्याण संघटनेच्या शालेय वक्तृत्व आणि वाद विवाद स्पर्धा गेली पंचावन्न वर्षे सतत सुरू आहेत.

ठळक मुद्दे‘कथाकथन हे साहित्य प्रसाराचे सर्वोत्कृष्ट माध्यम आहे ’ – मकरंद जोशीपरिक्षक म्हणून काम संकलन करणे महत्वाचे असते : किरण बोरकर या स्पर्धेत प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरल्या दिपाली कुर्लेकर

ठाणे : ‘ आज डिजिटल माध्यमांमुळे पुस्तक वाचण्याची सवय कमी होत असताना, कथाकथनाच्या माध्यमातून पुन्हा एकदा लोकांना पुस्तकांकडे वळवता येऊ शकते. कथा कथनकार हा स्वतः उत्तम वाचक असतो, विविध साहित्यिकांच्या कथा वाचून तो कथनासाठीची कथा निवडतो आणि त्याच्या प्रभावी कथा कथनामुळे श्रोत्यांमधील अनेकांना त्या त्या लेखकाच्या आणखी कथा, इतर साहित्य वाचावेसे वाटते. म्हणूनच कथाकथन हे साहित्य प्रसाराचे सर्वोत्कृष्ट माध्यम आहे ’ असे प्रतिपादन मुक्त पत्रकार आणि लेखक मकरंद जोशी यांनी स्त्री कल्याण संघटनेच्या महिलांसाठी आयोजित केलेल्या कथाकथन स्पर्धेच्या बक्षिस समारंभाच्यावेळी केले.

     ठाण्यातील शतकपूर्ती केलेल्या श्री समर्थ सेवक मंड्ळातर्फे महिला आणि मुले ह्यांच्यासाठी काम करणारी स्त्री कल्याण संघटना १९५३ साली स्थापन करण्यात आली होती. गेली पासष्ट वर्षे स्त्री कल्याण संघटना अविरतपणे स्पर्धांपासून ते प्रदर्शनांपर्यंत विविध उपक्रम राबवित आली आहे. सात वर्षांपूर्वी स्त्री कल्याण संघटनेने फक्त महिलांसाठी कथा कथन स्पर्धा आयोजित करायला सुरवात केली. फक्त महिलांसाठी असलेली ही बहुदा महाराष्ट्रातील एकमेव कथा कथन स्पर्धा असावी. यावर्षीच्या स्पर्धेत कोसळणाऱ्या पावसाला न जुमानता विविध वयोगटातील बारा महिलांनी सहभाग घेतला होता. ज्येष्ठ रंगभूषाकार कृष्णा बोरकर यांचे सुपुत्र आणि लेखक किरण बोरकर यांनी परिक्षक म्हणून काम संकलन करणे महत्वाचे असते, स्पर्धेत कथा सादर करताना दिलेल्या वेळेत अपेक्षित परिणाम साधण्यासाठी ते आवश्यक असते’ असे सांगितले. कार्यक्रमाचे पाहुणे मकरंद जोशी यांनी बोलताना ‘ महिला या मुळतच उत्तम कथनकार असतात. श्रावणातल्या कहाण्यांपासून ते अगदी भाजी किती महाग झालेय पर्यंत विविध प्रकारे त्या रंजकपणे, रसाळपणे कथन करत असतात.या स्पर्धेमुळे महिलांच्या या कौशल्याला हक्काचे व्यासपिठ आणि बक्षिसाचे कौतुक लाभले आहे.हा उपक्रम असाच अविरतपणे सुरू रहावा ही आता ठाणेकर रसिकांची जबाबदारी आहे ’ असे उद्गार काढले.

या स्पर्धेत प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरल्या दिपाली कुर्लेकर , द्वितीय क्रमांक पटकावला गंधवती तांबे आणि तृतीय क्रमांक मिळाला निलिमा चाफेकर यांना. यावेळी श्री समर्थ सेवक मंडळाचे शास्ता अनिल हजारे, स्त्री कल्याण संघटनेच्या चिटणीस सरिता कळके आणि संघटनेचे अन्य पदाधिकारी, सभासद उपस्थित होते.   

टॅग्स :thaneठाणेliteratureसाहित्यcultureसांस्कृतिक