शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

भीमकोकिळेच्या नशिबी उपेक्षितांचे जीणे, बुलंद आवाज प्रसिद्धीपासून कोसो दूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2020 01:20 IST

भीम चळवळींना एकेकाळी बुलंद साथ देणाऱ्या, भीमकोकिळा म्हणून संबोधल्या जाणा-या गायिका सुषमादेवी यांचा आवाज प्रसिद्धीपासून दूरवर फेकला गेला आहे.

- मुरलीधर भवारकल्याण : भीम चळवळींना एकेकाळी बुलंद साथ देणाऱ्या, भीमकोकिळा म्हणून संबोधल्या जाणा-या गायिका सुषमादेवी यांचा आवाज प्रसिद्धीपासून दूरवर फेकला गेला आहे. उतारवयात त्या अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जगत आहे. त्यांना हवा आहे मदतीचा हात. त्यांच्याकडे उरल्या आहेत केवळ त्यांच्या सुवर्णकाळातील आठवणी. दोन दिवसांपूर्वीच त्यांचे पती संगीतकार विश्वकांत महेशकर यांचे निधन झाले. त्या पार्श्वभूमीवर त्यांची हलाखीची परिस्थिती प्रकर्षाने समोर आली आहे.सुषमादेवी यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील जामखेडनजीकच्या एका खेड्यात झाला. वडील जगन्नाथ जावळे आणि आई वंचलाबाई यांना गाण्याची आवड होती. गाणी गाऊन ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. त्यांचे आईवडील तबलापेटी सोबत घेऊन गाणी गात कुटुंबासोबत फिरस्ती करायचे. लहानपणी गायनाचे धडे आईवडिलांकडूनच मिळाले. वयात आल्यावर त्यांच्या आईवडिलांनी त्यांचा विवाह केला आणि त्या जावळेच्या सुषमादेवी मोटघरे झाल्या. पुढे काही कारणास्तव त्या पतीपासून विभक्त झाल्या.१९७९ साली सुषमादेवी मुंबईला आल्या. त्यावेळी कश्मीरा कॅसेटस्टोन कंपनीने माझ्या भीमाच्या नावाचा कुंकू लाविला रमाने हे गाणे ध्वनिमुद्रित केल्यावर सुषमादेवी सर्वांना परिचित झाल्या. त्यानंतर, त्यांना अनेक गाणी मिळत गेली. या गाण्याच्या कार्यक्रमात वादक, गीतकार आणि संगीतकार विश्वकांत महेशकर यांच्याशी संपर्क आला. त्यांची गायनातील साथ आयुष्याच्या सोबतीत बदलली. सुषमादेवी व महेशकर यांनी लग्न केल्यानंतर ते कल्याणला राहण्यास आले.दरम्यान, सुषमादेवी यांचे अनेक संगीत कार्यक्रम विविध ठिकाणी होऊ लागले. कव्वाली हा प्रकार त्यांना चांगला अवगत आहे. भीमगीतांच्या कव्वालीचा सामना त्या रंगवू लागल्या. त्या काळातील गोविंद म्हशीलकर, प्रल्हाद शिंदे, नवनीत खरे, भीकू भंडारे यासारख्या आघाडीच्या कव्वाली गायकांसोबत त्यांचे संगीत कार्यक्रम होत होते. १९७९ ते १९९० हा सुषमादेवी यांचा सुवर्णकाळ होता. १९९५ नंतर त्यांची परिस्थिती खालावत गेली. त्यांचा एक मुलगा ब्रिजेश हा तबलावादक आहे. कार्यक्रमच मिळत नसल्याने त्यालाही आर्थिक चणचणीचा सामना करावा लागतो. कपिल नावाचा दुसरा मुलगा रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह कसाबसा करत आहे.सरकारकडून सुषमादेवींना केवळ १८०० रुपयांचे मानधनपर पेन्शन मिळते. मात्र, त्यातही सातत्य नसते. कल्याण पश्चिमेतील सिद्धार्थनगर रिक्षास्टॅण्डजवळ लहानशा खोलीत सुषमादेवींचा संसार कसाबसा सुरू आहे. ज्या समाजाच्या चळवळीसाठी त्यांनी आपल्या बुलंद आवाजात गाणी गायली, त्या सुषमादेवींकडे समाजाने पाठ फिरवणे कितपत योग्य आहे, असा सवाल त्यांची परिस्थिती पाहून उपस्थित होतो.गायनामुळे शिक्षणावर फेरले पाणीगायनाचे शास्त्रोक्त शिक्षण नसले तरी सुषमादेवींचा आवाज बुलंद होता. त्यांच्या पहाडी आणि स्पष्ट आवाजाला वळण मिळाले ते रोजच्या गाण्यातूनच. आईवडिलांचे औरंगाबाद, नागपूर येथे भीमगीतांचे कार्यक्रम नेहमी होत होते. त्यांच्यासोबत त्याही गात होत्या. गायनामुळे नियमित फिरस्ती असल्याने सुषमादेवी शिक्षण घेऊ शकल्या नाही.

टॅग्स :kalyanकल्याणthaneठाणे