शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

‘ऐका ऐकवते शेतकऱ्याची कहाणी, उभं राहील तुमच्या डोळ्यांत पाणी’

By admin | Updated: January 8, 2017 02:39 IST

‘ऐका ऐकवते एका शेतकऱ्याची कहाणी, उभं राहील क्षणभर तुमच्या डोळ्यांत पाणी...’ सुभेदारवाडा शाळेतील इयत्ता आठवीतील विद्यार्थिनी नूपुर गुप्ते हिने कर्जबाजारीपणाला

कल्याण : ‘ऐका ऐकवते एका शेतकऱ्याची कहाणी, उभं राहील क्षणभर तुमच्या डोळ्यांत पाणी...’ सुभेदारवाडा शाळेतील इयत्ता आठवीतील विद्यार्थिनी नूपुर गुप्ते हिने कर्जबाजारीपणाला कंटाळून मृत्यूला कवटाळणाऱ्या बळीराजाची व्यथा कवितेमधून मांडली आणि उपस्थितांचे मन हेलावले.कल्याणमधील विद्यार्थी साहित्य संमेलनानिमित्त आयोजित विद्यार्थी कविता सादरीकरण स्पर्धेत अनेक विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या विषयांवरील कविता सादर केल्या. नूपुरची कविता सगळ्यांनाच अंतर्मुख करणारी ठरली. राजश्री माने या विद्यार्थिनीने ‘माझ्या स्वप्नातील भारत’ ही कविता सादर केली. स्वप्नातील भारतात मुली सुरक्षित असतील, तो स्वच्छ असेल, ही कल्पना मांडली होती. सध्या ‘स्वच्छ भारत’ आणि ‘बेटी बचाव अभियान’ सुरू आहे. हे अभियान प्रत्यक्षात यावे, ते केवळ स्वप्न ठरू नये, अशी भावना राजश्री हिच्या कवितेतून व्यक्त झाली. पूर्वा या विद्यार्थिनीने ‘तुझ्याविना आई माझी भूक भागायची नाही, पोरके करून गेलीस, खरंच इतकी कच्ची होती का तुझ्यामाझ्यातील नाळ’ ही कविता सादर करून आईविना पोरक्या मुलीच्या खडतर जीवनाचे भावोत्कट वर्णन केले. इयत्ता चौथीच्या वर्गात शिकणारी मेहरूफ शेख या विद्यार्थिनीने ‘शेतावरती जाऊ या, संगतीने गाऊ या’ ही कविता अत्यंत धीटपणे बोलून दाखवली. के.सी. गांधी विद्यालयातील अस्मी जोशी हिने ‘आमच्या गल्लीत आला एक पोपट, करू लागला सारखी वटवट’ ही कविता सादर करून आपली पक्षिनिरीक्षण शक्ती किती दांडगी आहे, याचा प्रत्यय दिला. अस्मी कल्याणच्या बारावे जलशुद्धीकरण केंद्राजवळ राहते. त्याठिकाणी पाणी पिण्याकरिता दररोज अनेक पक्षी येतात. त्यांचे निरीक्षण करताना तिला हे काव्य स्फुरले. हर्षवर्धन माने या विद्यार्थ्याने ‘माणूस शेवटी सारंच सोडून जातो’ ही कविता सादर केली, तर सायली सुरोसे या विद्यार्थिनीने ‘पाऊस’ ही कविता सादर केली. ‘माझ्या कवितेला दिले पावसाचे नाव, पानाफुलांना कळाले पावसाचे भाव..’,असे पावसाचे शब्दचित्र रेखाटले होते. अस्मिता जगताप याने ‘शोध’ या कवितेद्वारे ‘माणूस हरवतोय, मागे उरलाय फक्त त्याचा शोध...’या कवितेत शहरीकरणातील माणसाच्या हरवलेपणावर प्रकाश टाकला. सोमनाथ चौरसिया याने विज्ञानवादी विचारांचा संदेश दिला. यावेळी विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी कथाकथन केले. ‘श्वास’च्या कथालेखिका माधवी घारपुरे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांसह शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. प्रा. विसूभाऊ बापट यांनी काव्यवाचन सादर केले. (प्रतिनिधी)