शहरं
Join us  
Trending Stories
1
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
2
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
3
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
4
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
5
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
6
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
7
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...
8
तो कोहलीमुळं खचला! खरंच हेच असेल का पाकचा 'बब्बर शेर' प्रत्येक मॅचमध्ये 'ढेर' होण्यामागचं कारण?
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
10
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
11
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
12
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
13
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
14
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
15
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
16
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
17
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
18
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
19
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
20
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका

अरबी समुद्रातील वादळामुळे मच्छीमारांना किनाऱ्यावर परतण्याचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2020 21:11 IST

भाईंदरच्या उत्तन भागातील अनेक बोटी मासेमारीसाठी गेल्याने त्या वादळा आधी परतण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. 

मीरारोड - हवामान खात्याने समुद्रात 31 मे ते 4 जून दरम्यान वादळाचा इशारा दिल्याने हंगामाची शेवटची मासेमारी करण्यासाठी समुद्रात गेलेल्या बोटींना परतण्यास सांगण्यात आले आहे. भाईंदरच्या उत्तन भागातील अनेक बोटी मासेमारीसाठी गेल्याने त्या वादळा आधी परतण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. 

हवामान खात्याने ठाणे , मुंबई व पालघर  आदी अरबी समुद्र किनाऱ्यावरील जिल्ह्याना 31 मे ते 4 जून या दरम्यान समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होऊन वादळ व वादळी वारे वाहण्याचा इशारा दिला आहे . त्या अनुषंगाने मच्छीमारांना समुद्रात मासेमारी साठी जाऊ नये व जे मासेमारी साठी गेले असतील त्यांनी त्वरित परत यावे त्यासाठी मच्छीमार संस्थांना कळवण्यात आले आहे . वेळेत परंतु न शकणाऱ्या मच्छीमार बोटींनी जवळच्या बंदरात वादळ जाई पर्यंत आश्रय घ्यावा असे सांगण्यात आले आहे . मच्छीमार संस्थांनी देखील मच्छीमाराना वादळाची माहिती देऊन समुद्रात जाऊ नये तसेच गेलेल्या मच्छीमारांशी संपर्क करून परतण्यास सांगितले आहे . 

आधीच मच्छीमारांचा यंदाचा हंगाम सुरवाती पासूनच पाऊस व वादळांमुळे वाया गेला. मासेमारी कुठे नीट सुरू होईल, असे वाटत असताना गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनामुळे मोठे नुकसान झाले. 31 मेपासून अशीपण मासेमारी बंद होणार आहे. पण निदान हंगामाच्या शेवटच्या फेरीत मासे मिळतील अशी आशा मच्छीमारांना होती. पण आता वादळाच्या इशाऱ्याने हंगामाचा शेवट देखील निराशाजनक ठरल्याचे मच्छीमार नेते बर्नड डिमेलो म्हणाले.  यंदाचा मासेमारी हंगाम अतिशय नुकसानीचा गेला आहे. पण सरकार कडून मदत मिळाली नाही.  मच्छीमारांना कोणी वाली नाही अशीच भावना बळावली असल्याचे त्यांनी सांगितले.