शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

अरबी समुद्रातील वादळामुळे मच्छीमारांना किनाऱ्यावर परतण्याचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2020 21:11 IST

भाईंदरच्या उत्तन भागातील अनेक बोटी मासेमारीसाठी गेल्याने त्या वादळा आधी परतण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. 

मीरारोड - हवामान खात्याने समुद्रात 31 मे ते 4 जून दरम्यान वादळाचा इशारा दिल्याने हंगामाची शेवटची मासेमारी करण्यासाठी समुद्रात गेलेल्या बोटींना परतण्यास सांगण्यात आले आहे. भाईंदरच्या उत्तन भागातील अनेक बोटी मासेमारीसाठी गेल्याने त्या वादळा आधी परतण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. 

हवामान खात्याने ठाणे , मुंबई व पालघर  आदी अरबी समुद्र किनाऱ्यावरील जिल्ह्याना 31 मे ते 4 जून या दरम्यान समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होऊन वादळ व वादळी वारे वाहण्याचा इशारा दिला आहे . त्या अनुषंगाने मच्छीमारांना समुद्रात मासेमारी साठी जाऊ नये व जे मासेमारी साठी गेले असतील त्यांनी त्वरित परत यावे त्यासाठी मच्छीमार संस्थांना कळवण्यात आले आहे . वेळेत परंतु न शकणाऱ्या मच्छीमार बोटींनी जवळच्या बंदरात वादळ जाई पर्यंत आश्रय घ्यावा असे सांगण्यात आले आहे . मच्छीमार संस्थांनी देखील मच्छीमाराना वादळाची माहिती देऊन समुद्रात जाऊ नये तसेच गेलेल्या मच्छीमारांशी संपर्क करून परतण्यास सांगितले आहे . 

आधीच मच्छीमारांचा यंदाचा हंगाम सुरवाती पासूनच पाऊस व वादळांमुळे वाया गेला. मासेमारी कुठे नीट सुरू होईल, असे वाटत असताना गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनामुळे मोठे नुकसान झाले. 31 मेपासून अशीपण मासेमारी बंद होणार आहे. पण निदान हंगामाच्या शेवटच्या फेरीत मासे मिळतील अशी आशा मच्छीमारांना होती. पण आता वादळाच्या इशाऱ्याने हंगामाचा शेवट देखील निराशाजनक ठरल्याचे मच्छीमार नेते बर्नड डिमेलो म्हणाले.  यंदाचा मासेमारी हंगाम अतिशय नुकसानीचा गेला आहे. पण सरकार कडून मदत मिळाली नाही.  मच्छीमारांना कोणी वाली नाही अशीच भावना बळावली असल्याचे त्यांनी सांगितले.