शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'
3
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
4
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
5
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
6
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
7
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
8
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
9
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
10
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
11
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
12
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

लसीकरणाचा खो-खो थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:40 IST

कल्याण : केडीएमसी प्रशासनाकडून लसीकरणाचा खो-खो सुरू आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांचे हाल होत असल्याने लसीकरणात सुसूत्रता आणावी, अशी मागणी ...

कल्याण : केडीएमसी प्रशासनाकडून लसीकरणाचा खो-खो सुरू आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांचे हाल होत असल्याने लसीकरणात सुसूत्रता आणावी, अशी मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

राज्यात कोरोनाची पहिली लाट आली तेव्हा आरोग्याच्या सोयी-सुविधा अपुऱ्या होत्या. केडीएमसी हद्दीत जंबो कोविड सेंटर, चाचणीसाठी लॅब सुरू करण्यात आली. दुसऱ्या लाटेत रुग्णालयात खाटा, ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शन तुटवडा भासला, तर, दुसरीकडे लसीकरण सुरू झालेले असताना केंद्राकडून राज्याला लस कमी प्रमाणात मिळत आहे. मनपा हद्दीची लोकसंख्या २० लाखांच्या आसपास असताना, मनपास दररोज एक हजार डोस मिळतात. अशी स्थिती असेल, तर कोरोनाशी मुकाबला कसा करणार, असा प्रश्न पाटील यांनी विचारला आहे.

४५ पेक्षा अधिक वयोगटाचे लसीकरण सुरू असतानाच, सरकारने १८ ते ४५ वयोगटाचे लसीकरण सुरू केले. मात्र, लसीच्या तुटवड्यामुळे दुसरा डोस घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना गर्दीचा सामना करावा लागतो. तर, तरुणांना लसीकरणासाठी एकच केंद्रे असून, तेथे ऑनलाइन नोंदणीशिवाय लसीकरण केले जात नाही. सध्या मनपा हद्दीतील १७ केंद्रांपैकी केवळ तीन केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. त्यामुळे अशा गतीने लसीकरण केल्यास तिसरी लाट येऊन गेली, तरी लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण होणार नाही. लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी राज्य सरकारने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे पाटील म्हणाले.

... हे राजकारण नाही, तर काय?

- ठाणे मनपास गुरुवारी लसीकरणासाठी तीन हजार डोस मिळाले आहेत, तर दुसरीकडे केडीएमसी हद्दीत एकाच केंद्रावर लसीकरण होणार आहे.

- कल्याण पूर्व आणि डोंबिवलीला एकही डोस मिळालेला नाही. एकीकडे राजकारण करू नका, असा सल्ला देतात. मग हे राजकारण नाही, तर काय? असा टोला पाटील यांनी लगावला आहे. या संदर्भातील ट्वीट त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कार्यालय, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि पालकमंत्र्यांना केले आहे.

-----------