शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

लसीकरणाचा खो-खो थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:40 IST

कल्याण : केडीएमसी प्रशासनाकडून लसीकरणाचा खो-खो सुरू आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांचे हाल होत असल्याने लसीकरणात सुसूत्रता आणावी, अशी मागणी ...

कल्याण : केडीएमसी प्रशासनाकडून लसीकरणाचा खो-खो सुरू आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांचे हाल होत असल्याने लसीकरणात सुसूत्रता आणावी, अशी मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

राज्यात कोरोनाची पहिली लाट आली तेव्हा आरोग्याच्या सोयी-सुविधा अपुऱ्या होत्या. केडीएमसी हद्दीत जंबो कोविड सेंटर, चाचणीसाठी लॅब सुरू करण्यात आली. दुसऱ्या लाटेत रुग्णालयात खाटा, ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शन तुटवडा भासला, तर, दुसरीकडे लसीकरण सुरू झालेले असताना केंद्राकडून राज्याला लस कमी प्रमाणात मिळत आहे. मनपा हद्दीची लोकसंख्या २० लाखांच्या आसपास असताना, मनपास दररोज एक हजार डोस मिळतात. अशी स्थिती असेल, तर कोरोनाशी मुकाबला कसा करणार, असा प्रश्न पाटील यांनी विचारला आहे.

४५ पेक्षा अधिक वयोगटाचे लसीकरण सुरू असतानाच, सरकारने १८ ते ४५ वयोगटाचे लसीकरण सुरू केले. मात्र, लसीच्या तुटवड्यामुळे दुसरा डोस घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना गर्दीचा सामना करावा लागतो. तर, तरुणांना लसीकरणासाठी एकच केंद्रे असून, तेथे ऑनलाइन नोंदणीशिवाय लसीकरण केले जात नाही. सध्या मनपा हद्दीतील १७ केंद्रांपैकी केवळ तीन केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. त्यामुळे अशा गतीने लसीकरण केल्यास तिसरी लाट येऊन गेली, तरी लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण होणार नाही. लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी राज्य सरकारने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे पाटील म्हणाले.

... हे राजकारण नाही, तर काय?

- ठाणे मनपास गुरुवारी लसीकरणासाठी तीन हजार डोस मिळाले आहेत, तर दुसरीकडे केडीएमसी हद्दीत एकाच केंद्रावर लसीकरण होणार आहे.

- कल्याण पूर्व आणि डोंबिवलीला एकही डोस मिळालेला नाही. एकीकडे राजकारण करू नका, असा सल्ला देतात. मग हे राजकारण नाही, तर काय? असा टोला पाटील यांनी लगावला आहे. या संदर्भातील ट्वीट त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कार्यालय, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि पालकमंत्र्यांना केले आहे.

-----------