शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
2
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
3
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
4
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
5
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
6
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
7
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
8
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
9
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
10
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
11
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
12
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
13
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
14
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
15
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
16
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
17
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
18
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
19
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
20
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास

वॉटर फ्रन्ट डेव्हल्पमेंटच्या प्रकल्पांची कामे थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 23:56 IST

बफरझोन निर्माण करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर ठाणे महापालिकेचे खाडी किनारी सुरू असलेल्या वॉटर फ्रन्ट सारखे प्रकल्प आधीच अडचणीत आले होते. परंतु, आता त्यांना आणखी एक धक्का बसला आहे.

ठाणे : खारफुटींपासून ५० मीटर अंतरापर्यंत जर काही बांधकामे झाली असतील तर त्यांच्यावर कारवाई करून बफरझोन निर्माण करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर ठाणे महापालिकेचे खाडी किनारी सुरू असलेल्या वॉटर फ्रन्ट सारखे प्रकल्प आधीच अडचणीत आले होते. परंतु, आता त्यांना आणखी एक धक्का बसला आहे.परवानगीशिवाय या प्रकल्पांचे काम सुरू असून सीआरझेडचेही उल्लघंन केले जात असल्याने तेथील काम तत्काळ बंद करावे, असे आदेश एमसीझेडसीएम अर्थात महाराष्टÑ किनारपट्टी व्यवस्थापन नियामक मंडळाने ठामपाला दिले आहेत. त्यामुळे हे प्रकल्प तर अडचणीत आले आहेतच शिवाय या प्रकल्पांवर केलेला खर्चही वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.ठाणे शहराला ३२ किमीचा खाडी किनारा लाभला आहे. त्यांचा विकास करण्याचा कार्यक्रम ठाणे महापालिकेने हाती घेतला होता. त्यानुसार १३ ठिकाणी खाडी किनाऱ्यांचा विकास केला जाणार होता. त्यानुसार पहिल्या टप्यात ७ ठिकाणच्या वर्क आॅडर्रही दिल्या आहेत. त्यातील प्रत्यक्षात चार ठिकाणी कामही सुरूकेले आहे. खारेगाव, नागलाबंदर, कोपरी, साकेत आणि बाळकुम येथील खाडी किनारा विकसित करण्यासाठी ठाणे महापालिकेने नियोजन केले आहे. या प्रकल्पांसाठी २२२ कोटींचा खर्च केला जाणार आहे. त्यानुसार येथील कामांनासुद्धा सुरुवात झाली आहे. तर, कोलशेत, वाघबीळ, कळवा येथील काम दुसºया टप्यात सुरू होणार आहे. मात्र, खाडी किनाºयावरील जागा पाणथळभूमी असून पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असल्याने या ठिकाणी उद्यान, जॅगिंग ट्रॅक सारख्या सोयी देताना पर्यावरणाची हानी होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पामुळे भविष्यात पाणी साचून परिसरामध्ये हानी होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यानुसार एक हजार चौरस मीटरपेक्षा जास्त घनता असलेल्या खारफुटीच्या क्षेत्राभोवती ५० मीटर बफर झोन निर्माण करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. यामुळे पालिकेने प्रस्तावित केलेले वॉटरफ्रन्ट डेव्हलपमेंटचे प्रकल्प अडचणीत आले आहेत. त्यात हा एक मोठा धक्का बसला आहे. महाराष्टÑ किनारपट्टी व्यवस्थापन नियामक मंडळाने प्रकल्पांची कामे थांबविण्याचे आदेश दिल्याची माहिती जोशी यांनी दिली..कुठल्याही परवानग्या न घेतल्याने काम थांबवण्याच्या सूचनाठामपाला २०१५ मध्ये बाळकुम येथील खाडीकिनारा विकसित करण्यासाठी मंडळाकडून तत्त्वत: मंजुरी दिली होती; परंतु त्या जोरावर त्यांनी इतर ठिकाणीसुद्धा कोणत्याही स्वरुपाची परवानगी न घेता, कांदळवन नष्ट होणार आहे, हे माहीत असूनही काम सुरू केल्याचे समोर आले आहे.न्यायालयीन आदेशानुसार झालेल्या चौकशीदरम्यान गायमुख येथे खारफुटीची कत्तल आणि भराव टाकल्याचे सिद्ध झाल्यानंतर संबंधित ठेकेदाराविरोधात गुन्हाही दाखल झाला आहे; परंतु आता त्या ठिकाणी कांदळ नव्हतेच हे सिद्ध करण्यासाठी पालिकेची धडपड सुरूअसल्याची माहिती आहे. एकूणच आता मंडळानेच या कामात सीआरझेड नियमांचे उल्लंघन झाल्याचे दिसत असून ठामपाने कुठल्याही परवानग्या घेतल्या नसल्याने काम थांबविण्याबाबत सूचना केल्या आहेत. त्यामुळे खाडी किनाºयांचा विकास करण्याचा प्रयत्न करणाºया ठाणे महापालिकेला हा मोठा धक्का मानला जात आहे.