शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

कल्याणमध्ये पाण्यासाठी नागरिकांचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2016 00:45 IST

कल्याण-डोंबिवली पालिकेच्या हद्दीत सध्या असलेल्या ३० टक्के पाणीकपातीमुळे आधीच नागरिक मेटाकुटीला आलेले असतानाच पत्रीपूल परिसरात गेल्या आठ

कल्याण : कल्याण-डोंबिवली पालिकेच्या हद्दीत सध्या असलेल्या ३० टक्के पाणीकपातीमुळे आधीच नागरिक मेटाकुटीला आलेले असतानाच पत्रीपूल परिसरात गेल्या आठ दिवसांपासून पाणी नसल्याने नागरिक रस्त्यावर उतरले. कल्याण-डोंबिवली महापालिका आणि औद्योगिक विकास महामंडळाकडे दाद मागूनही तोडगा निघत नसल्याने संतप्त नागरिकांनी कल्याण-शीळ रस्त्यावरील पत्रीपुलावर रास्ता रोको आंदोलन करत दीड तास वाहतूक रोखून धरली. शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक नवीन गवळी, काँग्रेसचे पदाधिकारी शकील शेख, माजी नगरसेविका प्रतिमा जाधव, त्यांचे पती सुरेश जाधव, स्थानिक पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते अशोक कांबळे यांच्यासह शेकडो नागरिक रस्त्यावर उतरल्याने वाहतूक पुरती कोलमडली. पत्रीपूल परिसराला औद्योगिक विकास महामंडळाकडून पाणीपुरवठा केला जातो. या परिसरातील नागरिक त्या पाण्याची बिले नियमितपणे महापालिकेत भरतात. त्यानंतरही पाणी मिळत नसल्याचा मुद्दा येथे सतत येतो. गेले आठ दिवस पाणी मिळत नसल्याने आधीच येथे संताप खदखदत होता. एमआयडीसीच्या ३० टक्के कपातीच्या धोरणामुळे आठवड्यातून दोन दिवस पाणी येत नाही. पण, उरलेले पाच दिवस कोणतेही कारण न देता पाणीपुरवठा बंद असल्याने नागरिकांनी आधी एमआयडीसीकडे आणि नंतर महापालिकेकडे दाद मागितली. पण, फरक न पडल्याने नागरिक रस्त्यावर उतरले. पिण्यासाठी पाणी नसल्याने, घरात वापरायला पाणी नसल्याने त्रासलेल्या महिला यात मोठ्या प्रमाणात होत्या. जेवण बनविण्यासाठीही ७० रुपये मोजून बाटलीबंद पाणी आणावे लागत होते. तो संताप मोर्चातून व्यक्त झाला. २७ गावांना पाणी महामंडळाकडून पुरविले जाते. ही गावे महापालिकेत समाविष्ट झालेली आहेत. त्यांना सुविधा पुरवण्याबाबत महामंडळाकडून हात वर केले जातात. काही दिवसांपूर्वी या भागातील नागरिकांचे शिष्टमंडळ आयुक्त व महापौरांना जाऊन भेटले होते. त्यांनी पाणीप्रश्नावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, परिस्थिती जैसे थे राहिली.