शहरं
Join us  
Trending Stories
1
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
2
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
3
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
4
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
5
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
6
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
7
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
8
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
9
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
10
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
11
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
12
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
13
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
14
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
15
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
16
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
17
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
18
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
19
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
20
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र

मजूरीसाठी महामार्ग रोखला

By admin | Updated: April 6, 2016 01:55 IST

पालघर जिल्ह्यात १ जानेवारी ते ३ मार्च या गेल्या तीन महिन्यात रोजगार हमी योजनेतून ९ हजार ०२४ कामे करण्यात आली.

वसई : पालघर जिल्ह्यात १ जानेवारी ते ३ मार्च या गेल्या तीन महिन्यात रोजगार हमी योजनेतून ९ हजार ०२४ कामे करण्यात आली.या कामांसाठी मजुरांना १३ कोटी ४८ लाख २८ हजार रुपये मिळणे आवश्यक होते.त्यासाठी मजुरांनी अनेकदा हेलपाटे घालूनही त्यांना कष्टाचे पैसे मिळाले नाही. म्हणून पालघर, ठाणे, रायगड आणि नाशीक या तीन जिल्ह्यात एकाचवेळी रास्ता रोको करण्यात आला. रास्ता रोकोच्या या दणक्यामुळे जव्हार येथील मजुरांचे १ कोटी ९ लाख रुपये त्यांच्या खात्यात तात्काळ जमा करण्यात आले. पालघर, ठाणे जिल्ह्यासह राज्यातील आदिवासी क्षेत्रात दारिद्रय, कुपोषण, भूकबळी, रोजगार न मिळाल्यामुळे होणाऱ्या आत्महत्या होत आहेत. त्यातच आदिवासींनी केलेल्या कष्टाचे पैसेही त्यांना मिळेनासे झाले आहेत. सरकारी तिजोरीत खडखडाट असल्याचे त्यांना सांगण्यात आले आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावरिल शिरसाड फाटा येथे ११ वाजता रास्ता रोकोला सुरवात झाली. त्यात आत्माराम ठाकरे, गणेश उंबरसाडा, निलेश वाघ, पुजा काकड, स्रेहा साठे यांच्या नेतृत्वाखाली १५०० मजुरांनी भाग घेतला होता. यावेळी रामभाऊ वारणा, केशन नानकर, विमल परेड, किसन चौरे, दिनेश म्हात्रे आदि पदाधिकारी उपस्थित होते.वाडा येथे खंडेश्वरी नाका, विक्रमगड येथे शिवाजी चौक,जव्हार येथे शिवनेरी ढाबा, अंबाडी, घोडबंदरनाका, कल्याण-गावेली नाका, मुरबाड-तीनहात नाका, शहापूर-वासींद, रायगड-पनवेल येथेही याचवेळी रास्ता रोको करण्यात आला. रोजगार निर्मिती, कुपोषण निर्मूलन, आरोग्य व शिक्षणावरील तरतूदी कमी करणाऱ्या सरकारने समाजहिताविरोधी भूमिका जर बदलली नाही तर राज्यभर उग्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा श्रमजीवींचे संस्थापक अध्यक्ष विवेक पंडीत यांनी दिला. (प्रतिनिधी)