शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

मुक्त रिक्षापरवाने किमान दोन वर्षे बंद करा, ठाणे रिजन रिक्षा-टॅक्सी महासंघाने केली मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 03:48 IST

कल्याण : एमएमआर क्षेत्र आणि कोकण रिजनमध्ये मुक्त रिक्षा परवाने देण्यास सरकारने सुरुवात केल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे.

कल्याण : एमएमआर क्षेत्र आणि कोकण रिजनमध्ये मुक्त रिक्षा परवाने देण्यास सरकारने सुरुवात केल्याने वाहतूककोंडीत भर पडत आहे. रिक्षाचा व्यवसाय हा रेल्वेस्थानक केंद्रित असल्याने तेथे वाहतुकीचा प्रश्न सगळ्यात जास्त आहे. रेल्वेस्थानकात पुरेसे स्टॅण्ड तसेच पार्किंगची सोय नाही. त्यामुळे मुक्त परवानेपद्धती किमान दोन वर्षांकरिता स्थगित करावी, अशी मागणी ठाणे रिजन रिक्षा-टॅक्सी महासंघाच्या कोकण विभागाने केली आहे.महासंघाचे अध्यक्ष प्रकाश पेणकर म्हणाले, कल्याण आरटीओ क्षेत्रात सध्या २७ हजार रिक्षा आहेत. त्यात कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा परिसर येतो. त्यापैकी केवळ कल्याणमध्ये नऊ हजार रिक्षा आहेत. कल्याण पूर्वेला यार्ड असल्याने रिक्षा रेल्वेस्थानकापर्यंत येत नाही. त्यामुळे कल्याण पूर्वेतून रिक्षा प्रवाशांना कल्याण पश्चिमेला सोडतात. कल्याण पश्चिमेतील रिक्षा स्टॅण्डमध्ये एका वेळेस ४५० रिक्षा उभ्या राहू शकतात. शहरातील नऊ हजार रिक्षांच्या तुलनेत स्टॅण्ड अपुरे आहेत. तसेच स्थानक परिसरात अन्य खाजगी वाहनांसाठी पार्किंगची सक्षम सुविधा नाही. त्यामुळे रिक्षाचालकांमुळे स्थानक परिसरात कोंडी होते, असा होणारा आरोप योग्य आहे.कल्याण शहरात १५० रिक्षा स्टॅण्ड आहेत. आणखी १०० रिक्षा स्टॅण्ड प्रस्तावित आहेत. मात्र, त्यांची अंमलबजावणी अजूनही झालेली नाही. स्थानक परिसरात आता मोक्याच्या जागा नाहीत. त्यामुळे नव्याने रिक्षा स्टॅण्ड कुठे उभे करणार, असा प्रश्न महापालिकेला पडला आहे. हा प्रश्न केवळ कल्याणपुरता नसून तो मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रासाठी आहे. प्राधिकरणाच्या क्षेत्रात ठाणे, रायगड आणि पालघर हे जिल्हे येतात. आमची संघटना कोकण विभागाचे नेतृत्व करते. त्यामुळे ठाणे, पालघर, वसई, विरार, भार्इंदर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कोकण विभागाचा विचार केला, तर आजमितीस या कोकण परिसरात दीड लाख रिक्षा व्यवसाय करतात. ठाणे शहरात ३२ हजार, पनवेलमध्ये साडेआठ हजार रिक्षाचालक तर वाशी परिसरात आठ हजार रिक्षाचालक आहेत. परमिट देण्याचे धोरण सरकारने अवलंबले आहे. आॅनलाइन परमिट मुक्त केल्याने अनेकांनी इरादापत्रे आरटीओकडे सादर केली आहे. कल्याण आरटीओ क्षेत्रात साडेसहा हजार लोकांनी मुक्त परवानापद्धतीत इरादापत्रे दिली आहे. मुक्त परवानेपद्धती ही सर्वांसाठी खुली असल्याने प्रत्येक जण परमिटसाठी नावनोंदणी करून इरादापत्र देत आहे. आधीच रिक्षांची संख्या जास्त आहे. त्यात मुक्त परवानापद्धतीमुळे रिक्षांची संख्या वाढणार आहे, असे पेणकरपुढे म्हणाले.>परिवहनमंत्र्यांना पत्रकल्याण-डोंबिवलीत पार्किंगची व्यवस्था नाही. रिक्षास्टॅण्ड नाहीत. त्यामुळे भर पडणाºया नवीन रिक्षांमुळे वाहतूककोंडीत अधिक भर पडणार आहे. मुक्त परवानापद्धती सरकारने किमान दोन वर्षे स्थगित करावी, अशी मागणी पेणकर यांनी परिवहन आयुक्तांकडे केली आहे. या आशयाचे पत्र परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याकडे दिले आहे.

टॅग्स :kalyanकल्याण