शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
3
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
4
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
5
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
6
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
7
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
8
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
9
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
10
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
11
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
12
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
13
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
14
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
15
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
16
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
17
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
18
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
19
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
20
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 

शेअर रिक्षा डोंबिवलीत महागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 00:29 IST

२ ते १० रुपये वाढ; लवकरच अंमलबजावणी

डोंबिवली : शहरातील सर्वच मार्गांवरील शेअर रिक्षांचा प्रवास पुढील आठवड्यापासून किमान दोन रुपये ते कमाल १० रुपयांपर्यंत वाढणार आहे. जवळच्या अंतराचा प्रवास मात्र महागणार नाही. एकूणच या भाडेवाढीमुळे सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे.सीएनजी रिक्षांसाठी आरटीओने २०१५ मध्ये मंजूर केलेले दरपत्रक सोमवारपासून ठिकठिकाणी प्रसिद्ध करावे, जेणे करून रिक्षाचालक व प्रवाशांमध्ये वाद होणार नाहीत, असे संघटना आणि आरटीओ अधिकाऱ्यांमध्ये ठरवण्यात आले. तसेच भाडेवाढीनंतर चालकाशेजारी चौथा प्रवासी न घेण्याचेही यावेळी सर्वानुमते ठरवण्यात आले.पश्चिमेतील सुभाष रोडवरील रिक्षाचालकांनी प्रति प्रवासी दोन रुपयांची भाडेवाढ बेकायदा केली होती. या भाडेवाढीवरून रिक्षाचालक व प्रवाशांमध्ये संघर्ष सुरू होता. त्यापार्श्वभूमीवर कल्याणमधील आरटीओ अधिकाºयांनी गुरुवारी बैठक घेतली. यावेळी झालेल्या चर्चेनुसार चार वर्षांपूर्वीचे दरपत्रक आरटीओने रिक्षास्टॅण्डवर लावावे, चौथा प्रवासी घेऊ नये, असे निर्णय घेण्यात आले. ही भाडेवाढ प्रवासी स्वीकारतात का, हे बघावे लागणार आहे. प्रवाशांकडून नवीन दरानुसार भाडे मिळावे, यासाठी आरटीओ अधिकारी, वाहतूक नियंत्रण विभाग यांचे सहकार्य आवश्यक असल्याचे रिक्षा संघटनांचे मत आहे.दरम्यान, पश्चिमेतील मार्गांवरील भाडेवाढीसंदर्भात आरटीओ अधिकारी तातडीने पाहणी दौरा करतील. यावेळी ते नागरिकांशीही चर्चा करतील. त्यानुसार, आवश्यक ते बदल केले जातील. त्यानंतरच योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांनी सांगितले. दरवाढीसंदर्भात आणि रिक्षाचालकांच्या अन्य मागण्यांसंदर्भात एमएमआरटीएकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याचेही ससाणे म्हणाले.दरम्यान, ‘लोकमत’च्या ‘हॅलो ठाणे’मध्ये ‘रिक्षा प्रवास महागणार’ अशा आशयाचे वृत्त बुधवारी प्रसिद्ध झाले होते, ते खरे ठरल्याची चर्चा प्रवासी संघटनांमध्ये सुरू आहे.लांबच्या प्रवासात भाडेवाढ१.५ किमीसाठी १८ रुपये भाडे आकारण्यात येते. पुढे प्रत्येक किमीला ते ११ रुपयांनी वाढत जाते. त्यानुसार, जवळच्या अंतरासाठी सध्या जे भाडे आकारले जाते, ते तेवढेच असेल. परंतु, लांबच्या प्रवासामध्ये दोन ते १० रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते.

टॅग्स :auto rickshawऑटो रिक्षाdombivaliडोंबिवली