शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

...तरीही शर्यत जिंकण्याची आस

By admin | Updated: January 9, 2016 02:09 IST

सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनासह सार्वजनिक शौचालयांचा पुरता बट्ट्याबोळ झाला असतानाही उंटावरून शेळ्या हाकणाऱ्या ठाणे महापालिकेने केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत

अजित मांडके, ठाणेसांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनासह सार्वजनिक शौचालयांचा पुरता बट्ट्याबोळ झाला असतानाही उंटावरून शेळ्या हाकणाऱ्या ठाणे महापालिकेने केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानात स्वच्छतेच्या बाबतीत देशातील ७५ पैकी पहिल्या १० शहरांमध्ये क्रमांक पटकावण्याचा दावा केला आहे. याअंतर्गत केंद्राच्या एका त्रिसदस्यीय समितीने सलग तीन दिवस संपूर्ण शहराचा दौरा करून शहरातील शौचालये, सांडपाणी व्यवस्थापन आणि घनकचरा व्यवस्थापनाची माहिती घेऊन त्याचे आॅडिट केले आहे. त्यानुसार, पालिकेला स्वच्छतेबाबत ही रँक दिली जाणार आहे. त्यानुसार, प्रशासनाने हा दावा केला आहे.महापालिकेने स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरात विविध प्रकारच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. अभियानात शहरातील शौचालये, साफसफाई, कचऱ्याची वाहतूक आणि विल्हेवाटीवर भर दिला आहे. त्यानुसार, महापालिकेची सध्याची स्थिती पाहता शहरात आजघडीला सुमारे ५४ हजारांच्या आसपास सार्वजनिक, वैयक्तिक आणि सामूहिक शौचालये आहेत. परंतु, यातील हाताच्या बोटांवर मोजता येतील इतक्याच शौचालयांची अवस्था चांगली असून उर्वरितांची दैना झाली आहे. दरवाजे नसणे, कडी नसणे, विजेची सोय नाही, दुर्गंधी आणि साफसफाईचा उडालेला बोजवारा यातूनच त्यांच्या खऱ्या अवस्थेचा विचार होऊ शकतो.दुसरीकडे घनकचरा व्यवस्थापनाचाही बोजवारा उडाला आहे. महापालिका हद्दीत आजच्या घडीला ६५० मेट्रीक टन कचऱ्याची निर्मिती होते. परंतु, गेल्या अनेक वर्षांत पालिकेला अद्यापही हक्काचे डम्पिंग मिळविता आलेले नाही. कचरा संकलन, वाहतूक जरी योग्य रीतीने होत असली तरी त्याची विल्हेवाट लावणे हा महत्त्वाचा प्रश्न आजही सोडविता आलेला नाही. एकूणच शौचालये आणि शहरातील कचऱ्याची अवस्था पाहता या दोन्ही यंत्रणांत पालिका सपशेल फेल ठरली आहे.दरम्यान, पालिकेने आता स्वच्छ भारत अभियानाचा एक भाग म्हणून अत्यंत घाईने कचऱ्याच्या शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाटीसाठी विविध प्रयोग हाती घेतले आहेत. यामध्ये वूडवेस्ट, बायोवेस्ट, गांडुळ खत प्रकल्प, मेडिकल वेस्ट, कम्पोस्टिंगसह विविध प्रकारचे प्रकल्प हाती घेतले आहेत. तर, संपूर्ण शहर हगणदारीमुक्त करण्यासाठी सामूहिक १५००, वैयक्तिक १२००० आणि सार्वजनिक ५०० शौचालये उभारली आहेत. बायोटॉयलेटही उभारली जाणार आहेत. सांडपाणी व्यवस्थापनही लंगडे असून अनेक भागांत मलनि:सारण वाहिन्या टाकलेल्या नाहीत. तसेच अनेक ठिकाणचे सांडपाणी प्रक्रिया न करताच ठाणे खाडीत सोडले जात असल्याने ती कमालीची प्रदूषित झाली आहे.