शहरं
Join us  
Trending Stories
1
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
2
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
3
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
4
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
5
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
6
Satish Shah Death: 'साराभाई वर्सेस साराभाई' फेम अभिनेते सतीश शाह यांचं निधन, ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
7
सतीश शाह यांच्या निधनानंतर आर माधवनची भावुक पोस्ट, 'या' विनोदी मालिकेत केलं होतं एकत्र काम
8
बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'
9
Virat Kohli: वनडे + टी-२० मध्ये सर्वाधिक धावा; कोहलीच्या डोक्यावर ताज, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
10
मुंबईत शिंदेसेना फक्त ६५ ते ७० जागाच लढवणार?; भाजपानं कंबर कसली, 'अबकी बार १५० पार'चा नारा
11
AUS W vs SA W : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; Alana King नं ७ विकेट्स घेत रचला इतिहास
12
कोण आहे सतीश शाह यांची पत्नी? दोघांना नव्हते मूल; जोडीदाराच्या निधनाने बसला धक्का
13
सामनावीर अन् मालिकावीर! रोहित शर्मा दुहेरी सन्मानावर म्हणाला- "मालिका हरलो असलो तरीही..."
14
Virat Kohli: 'रन मशीन' विराटची गगनभरारी! संगकाराला पछाडलं, आता फक्त सचिन तेंडुलकर पुढे
15
IND vs AUS: रोहितच्या सेंच्युरीसह किंग कोहलीची फिफ्टी; ऑस्ट्रेलिया विरुद्ध अखेरच्या वनडेत अविस्मरणीय शो!
16
मंगळ गोचर २०२५: २७ ऑक्टोबर रोजी मंगळ गोचर; पुढचे दोन महिने 'या' ५ राशींसाठी असणार खास!
17
देशभरात इन्व्हेस्टमेंट स्कॅमचे जाळे; सहा महिन्यांत 30 हजार लोकांची फसवणूक, ₹1500 कोटी लुटले
18
पश्चिम सीमेवर भारताचे तिन्ही सैन्य दल पाकिस्तानची झोप उडवणार; NOTAM जारी, १२ दिवस काय घडणार?
19
LIC वर अदानी समूहात गुंतवणुकीसाठी सरकारी दबाव? वॉशिंग्टन पोस्टच्या दाव्याचे कंपनीने केले खंडन
20
Rohit Sharma Century: रोहितचा मोठा धमाका! सिडनीच्या मैदानात साजरं केलं शतकांचं 'अर्धशतक'

राज्य सरकारच्या परवानगीकडे निर्मात्यांचे लागले लक्ष;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्य सरकारने महाराष्ट्रात शूटिंगवर बंदी आणल्याने सध्या अनेक वाहिन्यांवरील लोकप्रिय मालिकांच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्य सरकारने महाराष्ट्रात शूटिंगवर बंदी आणल्याने सध्या अनेक वाहिन्यांवरील लोकप्रिय मालिकांच्या निर्मात्यांनी गुजरात, हैदराबाद येथे मोर्चा वळवला आहे. ठाणे हे अनेक मालिकांच्या शूटिंगचे आवडते डेस्टिनेशन आहे. मुंबई, ठाण्यात कोरोनाचे रुग्ण कमी होत असल्याने राज्य सरकार केव्हा शूटिंगवरील बंदी उठवते आणि पुन्हा ठाण्यात शूटिंग सुरू करतो, याकडे निर्मात्यांचे लक्ष लागले आहे.

कोरोनाचा प्रकोप सुरू होताच सरकारने शूटिंगवर बंदी आणली. त्यामुळे निर्माते, वाहिन्यांची पंचाईत झाली. ‘मेरे साई, अहिल्या, गणेश, जिजाऊ’ या मालिकांनी गुजरातमधील उंबरगाव हे महाराष्ट्राच्या सीमेलगतचे गाव गाठून तेथे मालिकांचे शूटिंग सुरू केले. काही मालिकांचे शूटिंग वलसाड, दमण, सिल्वासा येथे सुरू आहे. ‘शुभमंगल ऑनलाईन’ व ‘सूर नवा-ध्यास नवा’ यांसारख्या मालिका व कार्यक्रमांचे शूटिंग गोव्यात सुरू होते. एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा यांच्या निमंत्रणावरून निर्मात्यांनी गोवा गाठले होते. मात्र गोव्यात कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढू लागल्याने गोव्यात शूटिंगवर बंदी आली. हैदराबाद येथील रामोजी फिल्म सिटीतही काही मालिकांचे शूटिंग सुरू आहे.

सुप्रसिद्ध निर्माते नितीन वैद्य म्हणाले की, शेतकरी जसा पावसाची वाट पाहतो, तसे सर्व कलाकार, तंत्रज्ञ हे महाराष्ट्र सरकार केव्हा शूटिंगला परवानगी देते याची वाट पाहत आहेत. आम्ही सारेच कुटुंबापासून दूर वेगवेगळ्या राज्यांत सध्या शूटिंग करीत आहोत. काही कलाकार, कामगार, तंत्रज्ञ यांच्या कुटुंबातील सदस्यांना कोरोना झाला. त्यांना इस्पितळात दाखल करावे लागले. काहींचे निधन झाले. यामुळे घरापासून दूर असलेल्यांच्या जिवाची घालमेल झाली. काहींनी शूटिंग सोडून परतण्याचा निर्णय घेतला. कुटुंबाच्या काळजीमुळे सारेच चिंतेत आहेत. त्यामुळे सरकारने लवकर शूटिंगला परवानगी द्यावी.

गतवर्षी मे महिन्यात सरकारने शूटिंगला परवानगी दिली. तेव्हापासून दर आठवड्याला सेटवरील प्रत्येकाची कोरोना चाचणी केली जात आहे. सर्वांचा दोन लाखांचा कोविड विमा उतरवला होता. यंदा पाच लाखांचा विमा उतरवला आहे. जर एखाद्याचे निधन झाले, तर कुटुंबाला २५ लाख रुपये मिळतील, अशी व्यवस्था केली आहे. महाराष्ट्रात व विशेष करून मुंबई, ठाण्यात मालिकांची शूटिंग ही बंदिस्त ठिकाणी होतात. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरणाऱ्यांमुळे संसर्ग पसरू नये याकरिता काही कामगार, तंत्रज्ञ यांची निवासाची व्यवस्था केली जाते. जेथे शूटिंग सुरू असते, तेथे व कपडेपटाचे निर्जंतुकीकरण केले जाते. कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांचे मार्गदर्शन घेऊन कलाकार, कामगार यांनी कोविड प्रसार टाळण्याकरिता काय खबरदारी घ्यावी, याचे मार्गदर्शन केले असून त्याचे पालन केले जात आहे. एवढी काळजी घेतल्याने दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रात शूटिंगला परवानगी मिळेल, असे वाटत होते. मात्र काही काळ रुग्णवाढ असल्याने शूटिंग बंद केले असले तरी, लवकरच परवानगी मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

.........