शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
2
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
3
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
4
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
5
Technology: SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
6
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
7
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
8
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
9
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
10
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
11
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
12
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
13
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
14
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट
15
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
16
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
17
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
18
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
19
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
20
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन

राज्य सरकारच्या परवानगीकडे निर्मात्यांचे लागले लक्ष;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्य सरकारने महाराष्ट्रात शूटिंगवर बंदी आणल्याने सध्या अनेक वाहिन्यांवरील लोकप्रिय मालिकांच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्य सरकारने महाराष्ट्रात शूटिंगवर बंदी आणल्याने सध्या अनेक वाहिन्यांवरील लोकप्रिय मालिकांच्या निर्मात्यांनी गुजरात, हैदराबाद येथे मोर्चा वळवला आहे. ठाणे हे अनेक मालिकांच्या शूटिंगचे आवडते डेस्टिनेशन आहे. मुंबई, ठाण्यात कोरोनाचे रुग्ण कमी होत असल्याने राज्य सरकार केव्हा शूटिंगवरील बंदी उठवते आणि पुन्हा ठाण्यात शूटिंग सुरू करतो, याकडे निर्मात्यांचे लक्ष लागले आहे.

कोरोनाचा प्रकोप सुरू होताच सरकारने शूटिंगवर बंदी आणली. त्यामुळे निर्माते, वाहिन्यांची पंचाईत झाली. ‘मेरे साई, अहिल्या, गणेश, जिजाऊ’ या मालिकांनी गुजरातमधील उंबरगाव हे महाराष्ट्राच्या सीमेलगतचे गाव गाठून तेथे मालिकांचे शूटिंग सुरू केले. काही मालिकांचे शूटिंग वलसाड, दमण, सिल्वासा येथे सुरू आहे. ‘शुभमंगल ऑनलाईन’ व ‘सूर नवा-ध्यास नवा’ यांसारख्या मालिका व कार्यक्रमांचे शूटिंग गोव्यात सुरू होते. एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा यांच्या निमंत्रणावरून निर्मात्यांनी गोवा गाठले होते. मात्र गोव्यात कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढू लागल्याने गोव्यात शूटिंगवर बंदी आली. हैदराबाद येथील रामोजी फिल्म सिटीतही काही मालिकांचे शूटिंग सुरू आहे.

सुप्रसिद्ध निर्माते नितीन वैद्य म्हणाले की, शेतकरी जसा पावसाची वाट पाहतो, तसे सर्व कलाकार, तंत्रज्ञ हे महाराष्ट्र सरकार केव्हा शूटिंगला परवानगी देते याची वाट पाहत आहेत. आम्ही सारेच कुटुंबापासून दूर वेगवेगळ्या राज्यांत सध्या शूटिंग करीत आहोत. काही कलाकार, कामगार, तंत्रज्ञ यांच्या कुटुंबातील सदस्यांना कोरोना झाला. त्यांना इस्पितळात दाखल करावे लागले. काहींचे निधन झाले. यामुळे घरापासून दूर असलेल्यांच्या जिवाची घालमेल झाली. काहींनी शूटिंग सोडून परतण्याचा निर्णय घेतला. कुटुंबाच्या काळजीमुळे सारेच चिंतेत आहेत. त्यामुळे सरकारने लवकर शूटिंगला परवानगी द्यावी.

गतवर्षी मे महिन्यात सरकारने शूटिंगला परवानगी दिली. तेव्हापासून दर आठवड्याला सेटवरील प्रत्येकाची कोरोना चाचणी केली जात आहे. सर्वांचा दोन लाखांचा कोविड विमा उतरवला होता. यंदा पाच लाखांचा विमा उतरवला आहे. जर एखाद्याचे निधन झाले, तर कुटुंबाला २५ लाख रुपये मिळतील, अशी व्यवस्था केली आहे. महाराष्ट्रात व विशेष करून मुंबई, ठाण्यात मालिकांची शूटिंग ही बंदिस्त ठिकाणी होतात. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरणाऱ्यांमुळे संसर्ग पसरू नये याकरिता काही कामगार, तंत्रज्ञ यांची निवासाची व्यवस्था केली जाते. जेथे शूटिंग सुरू असते, तेथे व कपडेपटाचे निर्जंतुकीकरण केले जाते. कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांचे मार्गदर्शन घेऊन कलाकार, कामगार यांनी कोविड प्रसार टाळण्याकरिता काय खबरदारी घ्यावी, याचे मार्गदर्शन केले असून त्याचे पालन केले जात आहे. एवढी काळजी घेतल्याने दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रात शूटिंगला परवानगी मिळेल, असे वाटत होते. मात्र काही काळ रुग्णवाढ असल्याने शूटिंग बंद केले असले तरी, लवकरच परवानगी मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

.........