शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

उल्हासनगरातील बाजारपेठा नियमित सुरू करा; मनसेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 17:16 IST

उल्हासनगरात फर्निचर, बॅग, गाऊन, जिन्स, इले्ट्रॉनिक्स व जपानी व गजानन कपडा मार्केट प्रसिध्द आहे.

उल्हासनगर : व्यापारी केंद्र असलेल्या शहरातील बाजारपेठ शासनाच्या अटीशर्ती नुसार पुर्ण वेळ नियमित सुरू करण्याची मागणीचे निवेदन मनसेने महापालिका आयुक्तांना केली. दुकाने पूर्ण वेळ सुरू करण्यास परवानगी दिली नाहीतर, आंदोलन करण्याचा इशारा शहराध्यक्ष बंडू देशमुख यांनी दिला. 

उल्हासनगरात फर्निचर, बॅग, गाऊन, जिन्स, इले्ट्रॉनिक्स व जपानी व गजानन कपडा मार्केट प्रसिध्द आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या सहा महिन्यापासून बाजारपेठा बंद होत्या. तर अनलॉक दरम्यान बाजारपेठा मर्यादित वेळेत खुल्या आहेत. मात्र ग्राहक येत नसल्याचा सूर व्यापाऱ्यांनी काढला आहे. व्यापारी संघटनेने यापूर्वी महापालिका आयुक्तांना निवेदन देऊन सकाळी ९ ते रात्री ९ वाजे पर्यंत दुकानें सुरू ठेवण्याला परवानगी मागितली आहे. कोरोणाच्या पार्दुभावामुळे शहरातील बाजारपेठ नियमित सुरू नसल्यामुळे जवळपास सर्वच व्यापाऱ्यानां मोठ आर्थिक नुकसान झाले असून दुकानात काम करणारे शेकडो कामगार व मजुर बेरोजगार झाले. महापालिका आयुक्तांनी याबाबत सहानुभूती पूर्वक विचार करावा. असे बंडू देशमुख यांचे म्हणणे आहे. 

शासनाने हॉटेलसह इतर अस्थापना पूर्ण वेळ सुरु करण्याची परवागी दिली आहे. त्यानुसार कोरोणाचा प्रादुर्भाव कमी झालेल्या उल्हासनगर महापालिका आयुक्तांनी शहरातील सर्व बाजारपेठा काही अटीशर्ती नुसार पूर्णवेळ सुरू करण्याची परवानगी द्यावी. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना व्यापाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आपल्या पध्दतीने आंदोलन करेल असा ईशाराही मनसेच्या शिष्टमंडळाने दिला. शिष्टमंडळात शालिग्राम सोनवणे, सचिन बेंडके, मुकेश सेठपलानी, तन्मेश देशमुख, हितेश मेहरा यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरthaneठाणे