शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
3
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
4
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
5
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
6
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
7
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
8
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
9
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
10
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
11
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
12
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
13
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
14
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?
15
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
16
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
17
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
18
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
19
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
20
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह

पहिल्या टप्प्यातील भात लावणी हंगामाला प्रारंभ

By admin | Updated: July 2, 2017 05:32 IST

डहाणू तालुक्यातील काही भागात भात लावणीला प्रारंभ झाला आहे. पहिल्या टप्यातील हंगामात पावसाची साथ लाभत असून मजुरांची

अनिरु द्ध पाटील/ लोकमत न्यूज नेटवर्कबोर्डी : डहाणू तालुक्यातील काही भागात भात लावणीला प्रारंभ झाला आहे. पहिल्या टप्यातील हंगामात पावसाची साथ लाभत असून मजुरांची उपलब्धता सहज होत असल्याने शेतकरी सुखावला आहे. या वर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाने हजेरी लावली. त्या काळात भात पेरणी केलेली रोपे पंचवीस पेक्षा अधिक दिवसांची झाली आहेत. २१ दिवसानंतरची रोपं लावणी योग्य असतात. शिवाय बागायती शेतकऱ्यांकडून धूळपेरणी केली जात असल्याने दरवर्षी पहिल्या टप्यातील लावणीचा प्रारंभ हे शेतकरी करतात. दरम्यान जून महिन्यात नेहमी प्रमाणे सततचा आठवडाभर पडणारा पाऊस न झाल्याने तालुक्यात अनुकूल परिस्थिती निर्माण झाली नाही. या काळात दिवसातील काही वेळ पाऊस उघडीपही देत होता, त्यामुळे भात रोपांच्या वाढीला अनुकूल वातावरण मिळाल्याने काही भागात लावणीला प्रारंभ झाला आहे अशा ठिकाणी चिखलणीसाठी पॉवरटिलर आणि लावणीकरिता मजुरांची सहज उपलब्धता होत आहे. मात्र पुढील आठवड्यात निम्म्यापेक्षा अधिक क्षेत्रावर लावणीला सुरुवात होणार असल्याने स्पर्धा दिसून येईल. साधारणत: तालुक्यात तीन टप्यात लावणी केली जाते सुरुवातीच्या टप्प्याला प्रारंभ झाला असून नागपंचमी ते गोपाळकाल्यापर्यंत दुसरा टप्पा आणि त्यानंतर शेवटच्या टप्यात पाणथळ शेत जमीनीवरची लावणी केली जाते. डहाणू तालुका पंचायत समितीच्या कृषी विभागामार्फत खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर कर्जत ३ या भाताच्या वाणांचे वाटप करण्यात आले होते. शिवाय तालुका कृषी विभागामार्फत उन्नत कृषी समृद्ध शेतकरी अभियान डहाणू, कासा आणि वाणगाव या तीन मंडळात राबवून ७० टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. डहाणू तालुक्यातील भात लागवडीखालील क्षेत्र १५ हजारहेक्टर क्षेत्र आहे. ४ जून रोजी भात पेरणी केली असल्याने दोन दिवसांपूर्वी लावणीला प्रारंभ केला आहे. योग्य पाऊस तसेच लावणीचा पहिला टप्पा असल्याने मजूर आणि चिखलणी यंत्राची उपलब्धता झाली आहे. -विजय गोविंद किणी, चिखले गावातील भात उत्पादक शेतकरी