शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
2
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
3
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
6
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
7
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
8
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
9
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
10
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
11
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
12
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
13
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
14
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
15
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
16
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
17
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
18
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
19
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
20
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला

'विस्तारित ठाणे रेल्वेस्थानकासाठी जागा हस्तांतरण प्रक्रियेला गती मिळावी'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 23:24 IST

राज्यपालांना साकडे; खा. विचारेंनी घेतली भेट, कामाचे महत्त्व केले विशद

ठाणे : ठाणे शहराची लोकसंख्या मागील दोन दशकांमध्ये प्रचंड वाढल्यामुळे दररोज रेल्वेतून पडून प्रवासी मृत्युमुखी पडत असल्याच्या घटना ऐतिहासिक ठाणे रेल्वेस्थानकात घडतात. तसेच, रेल्वे प्रवाशांना पुरेशा सोयीसुविधाही मिळत नाहीत. त्यामुळे ठाणे महानगरपालिकेने या रेल्वेस्थानकाच्या विस्तारासाठी ठाणे-मुलुंडदरम्यान असलेल्या ठाणे प्रादेशिक मनोरु ग्णालयाच्या जागेवर नवीन रेल्वेस्थानकाच्या निर्मितीसाठी सार्वजनिक आरोग्य विभागाची जागा महापालिकेस हस्तांतरित करण्याच्या प्रक्रि येला गती मिळावी, यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी शनिवारी रात्री राजभवनावर भेट घेतली.ऐतिहासिक रेल्वेस्टेशनला १६६ वर्षे पूर्ण झाली आहेत. या रेल्वेस्थानकातून दररोज सात ते आठ लाख प्रवासी येजा करतात. ठाणे-मुलुंडदरम्यान दिवसाला चार ते पाच प्रवासी गर्दीमुळे रेल्वेतून पडून मृत्युमुखी पडतात. मध्य रेल्वेवर दिवसाला १२ जण मृत्युमुखी पडतात. गेल्या पाच वर्षांत अंदाजे तीन हजार प्रवासी मृत्युमुखी पडलेले आहेत. त्यामध्ये ठाणे-मुलुंडदरम्यान प्रवासी मृत्युमुखी पडण्याच्या घटना अधिक असल्याने ठाणे-मुलुंडदरम्यान नवीन विस्तारित ठाणे रेल्वेस्थानकाच्या निर्मितीसाठी ठामपाने रेल्वेरु ळांलगत असलेल्या ठाणे प्रादेशिक मनोरु ग्णालयाच्या ६३ एकर जागेपैकी १४.८३ एकर जागा ठामपास सार्वजनिक आरोग्य विभागाकडून हस्तांतरित करण्यास विलंब लागत असल्याने यासंदर्भात मुख्य सचिवांमार्फत ही जागा लवकर हस्तांतरित करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी खासदार राजन विचारे यांनी राज्यपालांकडे केली. राज्यपालांशी चर्चा करताना खासदारांनी सांगितले की, या प्रस्तावाला तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू तसेच मध्य रेल्वे महाव्यवस्थापक यांच्याकडून २०१७ मध्येच मंजुरी मिळाली आहे. नवीन रेल्वेस्थानकासाठी मनोरु ग्णालयाची जागा मिळविण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाचीही मंजुरी मिळाली आहे. केंद्राच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत २८९ कोटी रुपये ठामपाच्या स्मार्ट सिटीकडे वर्गही करण्यात आले आहेत. ठामपाने निविदा काढून या स्थानकाच्या भूमी परीक्षणाचे कामही सुरू झाले आहे. परंतु जागा हस्तांतरण प्रक्रि येस विलंब लागत असल्याने रेल्वेरु ळांच्या कामासाठी रेल्वेकडे पैसे वर्ग करता येत नाहीत, याची खंतही यावेळी त्यांनी व्यक्त केली.एल्फिन्स्टन रोडवरील दुर्दैवी घटनेची पुनरावृत्ती ठाणे स्थानकात होऊ नये, यासाठी संपूर्ण ठाणेकर या नवीन रेल्वेस्थानकाच्या प्रतीक्षेत आहेत. हे स्थानक निर्माण झाल्यावर ठाणे रेल्वेस्थानकातील ३१ टक्के व मुलुंड रेल्वेस्थानकातील २४ टक्के प्रवाशांचा भार कमी होईल, असे खासदारांनी सांगितले.