शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
2
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
3
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
4
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
5
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
6
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
7
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
8
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
9
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
10
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
11
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
12
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
13
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
14
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
15
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
16
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
17
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
18
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
19
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
20
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!

'विस्तारित ठाणे रेल्वेस्थानकासाठी जागा हस्तांतरण प्रक्रियेला गती मिळावी'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 23:24 IST

राज्यपालांना साकडे; खा. विचारेंनी घेतली भेट, कामाचे महत्त्व केले विशद

ठाणे : ठाणे शहराची लोकसंख्या मागील दोन दशकांमध्ये प्रचंड वाढल्यामुळे दररोज रेल्वेतून पडून प्रवासी मृत्युमुखी पडत असल्याच्या घटना ऐतिहासिक ठाणे रेल्वेस्थानकात घडतात. तसेच, रेल्वे प्रवाशांना पुरेशा सोयीसुविधाही मिळत नाहीत. त्यामुळे ठाणे महानगरपालिकेने या रेल्वेस्थानकाच्या विस्तारासाठी ठाणे-मुलुंडदरम्यान असलेल्या ठाणे प्रादेशिक मनोरु ग्णालयाच्या जागेवर नवीन रेल्वेस्थानकाच्या निर्मितीसाठी सार्वजनिक आरोग्य विभागाची जागा महापालिकेस हस्तांतरित करण्याच्या प्रक्रि येला गती मिळावी, यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी शनिवारी रात्री राजभवनावर भेट घेतली.ऐतिहासिक रेल्वेस्टेशनला १६६ वर्षे पूर्ण झाली आहेत. या रेल्वेस्थानकातून दररोज सात ते आठ लाख प्रवासी येजा करतात. ठाणे-मुलुंडदरम्यान दिवसाला चार ते पाच प्रवासी गर्दीमुळे रेल्वेतून पडून मृत्युमुखी पडतात. मध्य रेल्वेवर दिवसाला १२ जण मृत्युमुखी पडतात. गेल्या पाच वर्षांत अंदाजे तीन हजार प्रवासी मृत्युमुखी पडलेले आहेत. त्यामध्ये ठाणे-मुलुंडदरम्यान प्रवासी मृत्युमुखी पडण्याच्या घटना अधिक असल्याने ठाणे-मुलुंडदरम्यान नवीन विस्तारित ठाणे रेल्वेस्थानकाच्या निर्मितीसाठी ठामपाने रेल्वेरु ळांलगत असलेल्या ठाणे प्रादेशिक मनोरु ग्णालयाच्या ६३ एकर जागेपैकी १४.८३ एकर जागा ठामपास सार्वजनिक आरोग्य विभागाकडून हस्तांतरित करण्यास विलंब लागत असल्याने यासंदर्भात मुख्य सचिवांमार्फत ही जागा लवकर हस्तांतरित करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी खासदार राजन विचारे यांनी राज्यपालांकडे केली. राज्यपालांशी चर्चा करताना खासदारांनी सांगितले की, या प्रस्तावाला तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू तसेच मध्य रेल्वे महाव्यवस्थापक यांच्याकडून २०१७ मध्येच मंजुरी मिळाली आहे. नवीन रेल्वेस्थानकासाठी मनोरु ग्णालयाची जागा मिळविण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाचीही मंजुरी मिळाली आहे. केंद्राच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत २८९ कोटी रुपये ठामपाच्या स्मार्ट सिटीकडे वर्गही करण्यात आले आहेत. ठामपाने निविदा काढून या स्थानकाच्या भूमी परीक्षणाचे कामही सुरू झाले आहे. परंतु जागा हस्तांतरण प्रक्रि येस विलंब लागत असल्याने रेल्वेरु ळांच्या कामासाठी रेल्वेकडे पैसे वर्ग करता येत नाहीत, याची खंतही यावेळी त्यांनी व्यक्त केली.एल्फिन्स्टन रोडवरील दुर्दैवी घटनेची पुनरावृत्ती ठाणे स्थानकात होऊ नये, यासाठी संपूर्ण ठाणेकर या नवीन रेल्वेस्थानकाच्या प्रतीक्षेत आहेत. हे स्थानक निर्माण झाल्यावर ठाणे रेल्वेस्थानकातील ३१ टक्के व मुलुंड रेल्वेस्थानकातील २४ टक्के प्रवाशांचा भार कमी होईल, असे खासदारांनी सांगितले.