शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

मतदान न करण्याचा उर्मटपणा येतो कुठून?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2024 08:11 IST

आर्थिक संकट पूर्णपणे टळले नसले तरी ते गहिरे नक्कीच झालेले नाही. असे असताना मतदारांनी इतकी निराशा का दाखवावी, याचे आश्चर्य साऱ्यांनाच वाटते.

संदीप प्रधान, वरिष्ठ सहायक संपादक

देशात लोकसभा निवडणूक सुरू आहे आणि पहिल्या दोन टप्प्यांचे मतदान झाले आहे. या मतदानाच्या आकडेवारीकडे पाहिले तर ती निराशाजनक आहे. मागील निवडणुकीत जे मतदान झाले होते त्याच्यापेक्षा चार टक्के ते नऊ टक्क्यांपर्यंत कमी मतदान देशातल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये, वेगवेगळ्या मतदारसंघात झाले आहे. याची अर्थातच काही कारणे आहेत. याचे एक कारण हे देशात सध्या असलेली उष्णतेची लाट हे दिले जाते. पण, याखेरीज आणखीन महत्त्वाचे कारण म्हणजे मतदारांचा वेगवेगळ्या कारणांमुळे झालेला भ्रमनिरास हेही कारण असू शकते.

खरे तर देशात गेली दहा वर्षे स्थिर सरकार आहे. या सरकारने अनेक निर्णय घेतले आहेत. गोरगरिबांच्या खात्यांमध्ये पैसे जमा करणे, त्यांना अन्नधान्य मोफत पुरविणे यासह अनेक विकासकामांची उभारणी सरकारने केली. कोरोनाच्या सावटातून आता आपण बाहेर पडलो आहोत. आर्थिक संकट पूर्णपणे टळले नसले तरी ते गहिरे नक्कीच झालेले नाही. असे असताना मतदारांनी इतकी निराशा का दाखवावी, याचे आश्चर्य साऱ्यांनाच वाटते.

पाचव्या टप्प्यात ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण आणि भिवंडी या तीन मतदारसंघात मतदान होणार आहे. या तिन्ही मतदारसंघात यापूर्वी झालेल्या दोन निवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी ही ५० टक्क्यांच्या पुढे गेलेली नाही. ४२ ते ४८ टक्क्यांपर्यंतच या मतदारसंघात मतदान झाले आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली या शहरात अत्यंत सुशिक्षित नोकरदार वर्ग राहतो. फेसबूक, इंस्टाग्राम, ट्विटर यासारख्या सोशल मीडियावर सक्रिय असलेला उच्च मध्यमवर्गीय आणि मध्यमवर्गीय याच भागात वास्तव्याला आहे. मात्र, तरीही तो मतदान करत नाही. ४५ टक्के मतदान होणे याचा अर्थ ५५ टक्के मतदारांनी मतदानापासून दूर राहणे. झालेल्या ४५ टक्के मतदानामधील २५ ते ४० टक्के मते मिळवून उमेदवार विजयी होतो. याचा अर्थ ६० ते ७० टक्के मतदारांनी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष नाकारलेला उमेदवार पाच वर्षांसाठी जनतेने आपल्याला कौल दिला, असा दावा करतो. मागील पाच वर्षांत राज्यात सर्वच राजकीय पक्षांनी तडजोडी केल्या. सत्तेकरिता केलेल्या या तडजोडी मतदारांना फारशा रुचलेल्या नाहीत. त्यामुळे मतदारांमध्ये एक सार्वत्रिक निराशा असू शकते.

लोकांनी मतदान करावेच यासाठी काय केले जाऊ शकते? यावर अनेक वेळा चर्चा झाल्या. मतदान न केल्याबद्दल मतदारांना दंड लावावा का? त्यांच्याकडून दुप्पट कर वसुली करावी का? त्यांना काही सुविधा नाकाराव्या का? अशी अनेक मते व्यक्त झाली. परंतु मतदान हे उत्स्फूर्तपणे झाले पाहिजे हेच शेवटी सर्वानुमते मान्य केले गेले. नाराजीचे कारण काहीही असले तरीसुद्धा मतदान करणे ही गरज आहे. अनेकदा सुशिक्षितांच्या या शहरातील लोक सोशल मीडियावर सरकार, प्रशासन, माध्यमे यावर कठोर टीका करतात.

पण त्यावेळी त्यांना याचा विसर पडतो की, ज्या दिवशी मतदान होते त्या दिवशी शनिवार, रविवारला जोडून आलेली सुट्टी घेऊन आपण मतदान न करताच बाहेरगावी निघून गेलो होतो. त्यामुळे सरकार, प्रशासन यावर टीका करण्याचा नैतिक अधिकार या देशाचे नागरिक व मतदार या नात्याने आपण त्याचवेळी गमावला. अर्थात नैतिकता कुणी कुणाला शिकवायची व राजकीय नेत्यांपेक्षा आम्ही अधिक नैतिक आहोत, असा दावा मतदान न करणारे हे मतदार करू शकतात. परंतु मतदान न करण्यामुळे प्रश्न सुटत नाहीत, उलट ते अधिक गंभीर होतात. मतदारांच्या नाकर्तेपणामुळे लोकांचा कौल नसतानाही अनेक जण तुटपुंज्या मतांनी निवडून येतात. तुमच्या छाताडावर सत्ता गाजवतात. त्यामुळे मतदान न करण्याचा उर्मटपणा करण्यापूर्वी चार वेळा विचार करा.

टॅग्स :Electionनिवडणूक